AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाण्यात आधी 16 पक्षांचा मृत्यू, आता पुन्हा गिधाडं आणि बगळे मृत सापडल्याने धाकधूक वाढली

दोन दिवसांपूर्वी घोडबंदर वाघबीळ परिसरात 14 पाणबगळे आणि 2 पोपट मृतावस्थेत आढळेलले असताना आता त्याच भागात एक गिधाड मृतावस्थेत सापडले आहे. त्यासोबतच काही पांढरे बगळे आणि पाणबगळेसुद्धा पुन्हा आज (9 जानेवारी) मृतावस्थेत आढळले आहेत.

ठाण्यात आधी 16 पक्षांचा मृत्यू, आता पुन्हा गिधाडं आणि बगळे मृत सापडल्याने धाकधूक वाढली
| Updated on: Jan 09, 2021 | 2:28 PM
Share

ठाणे : दोन दिवसांपूर्वी घोडबंदर वाघबीळ परिसरात 14 पाणबगळे आणि 2 पोपट मृतावस्थेत आढळेलले असताना आता त्याच भागात एक गिधाड मृतावस्थेत सापडले आहे. त्यासोबतच काही पांढरे बगळे आणि पाणबगळेसुद्धा पुन्हा मृतावस्थेत आढळले आहेत. पक्षांच्या या अचानक मृत्यूमुळे येथील नागरिक घाबरले असून पक्षांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अजून समोर आले नाही. पक्षांमध्ये आढळणारा बर्ड फ्लू या आजाराने पुन्हा एकादा डोके वर काढल्यानंतर गिधाड आणि बगळे मृतावस्थेत सापड्यामुळे अनेक तर्क लावले जात आहेत. (vulture and heron has found dead in thane possibility of bird flu disease infection)

मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी (8 जानेवरी) घोडबंदर वाघबीळ परिसरात एक गिधाड मृतावस्थेत आढळले. हे गिधाड अत्यंत दुर्माळ प्रजातीचे असून याला युरेशियन गिधाड म्हटलं जातं. हे गिधाड नागरिकांना घोडबंदर वाघबीळ या भागात मृत आवस्थेत पडेलेले आढळले. त्यासोतबच आज ( 9 डिसेंबर) याच परिसरात काही पांढरे बगळे आणि पाणबगळेसुद्धा मृतावस्थेत आढळले. याआधी मेलेल्या 16 पक्षांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाला नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता पुन्हा बगळे आणि गिधाड मृतावस्थेत सापडल्यामुळे नागरिकांत पुन्हा एकदा भीती निर्माण झाली आहे. तसेच, मेलेले गिधाड अत्यंत दुर्मीळ प्रजातीचे असल्यामुळे प्राणीप्रेमींकडून चिंता व्यक्त होत आहे.

सध्या बर्ड फ्लूच्या केसेस मध्यप्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश आणि केरळमध्ये आठळल्या आहेत. महाराष्ट्रात अद्याप कोणत्याही पक्षाला बर्ड फ्लू झाल्याचे आढळलेले नाही. मात्र बर्ड फ्लूच्या भीतीने देशातील चिकन आणि अंड्याची मागणी जवळपास 60 टक्क्यांनी कमी झालीय. त्यामुळे या दोन्ही गोष्टींचे दरही कोसळले आहेत.

दरम्यान यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे. विशेष म्हणजे या काळात पोल्ट्री व्यवसायाशी संबंधित कंपन्यांच्या शेअर देखील कोसळत आहेत. मागील काही दिवसांपासून चिकन आणि अंड्यांच्या मागणीत 60 टक्क्याने घट झालीय. त्यामुळेच त्याच्या किमतीवरही परिणाम झालाय. मागील आठवड्यात एका पक्षाची म्हणजेच कोंबड्याची किंमत 100 रुपये किलो होती, तिथं आता घट होऊन 60 रुपये प्रति किलो दर झाल्याचे चिकन व्यावसायिक म्हणत आहे.

संबंधित बातम्या :

Bird Flu | कोंबडीचे मांस आणि अंडी खाल्ल्याने ‘बर्ड फ्लू’चा धोका? वाचा संशोधन काय म्हणतेय…

Bird Flu | बर्ड फ्लू नेमका काय?, लक्षणे कोणती?, औषध काय?, सर्व प्रश्नांची उत्तरं!

आधी कोरोनाचा फटका, आता नवं संकट, थंडीतही अंडे आणि चिकनच्या किमती कमी होण्याचं कारण काय?

(vulture and heron has found dead in thane possibility of bird flu disease infection)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.