AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठा आणि ओबीसी आरक्षणावर प्रकाश आंबेडकर यांचं मोठं विधान, म्हणाले, दोघांचं ताट…

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आणि ओबसींच्या आरक्षणाचे ताट वेगवेगळे असले पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका जाहीर केली आहे. दोघांनाही एकत्र आरक्षण देऊ नये आणि दोघांनाही भिडवत ठेवू नये, असंही प्रकाश आंबडेकर यांनी म्हटलं आहे. ओबीसी नेत्यांचं वडीगोद्री येथे उपोषण सुरू आहे. या उपोषणकर्त्यांची भेट घेतल्यानंतर ते बोलत होते.

मराठा आणि ओबीसी आरक्षणावर प्रकाश आंबेडकर यांचं मोठं विधान, म्हणाले, दोघांचं ताट...
मराठा आणि ओबीसी आरक्षणावर प्रकाश आंबेडकर यांचं मोठं विधानImage Credit source: social media
| Updated on: Jun 20, 2024 | 12:11 PM
Share

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आणि ओबीसीच्या आरक्षणावरून आज मोठं विधान केलं आहे. मराठा आणि ओबीसींचं ताट वेगळं असलं पाहिजे, असं मोठं विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. प्रकाश आंबेडकर यांनी आज वडीगोद्रीत जाऊन ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची भेट घेतली. हे दोन्ही नेते उपोषण करत आहेत. त्यामुळे आंबेडकर यांनी त्यांची विचारपूसही केली.

मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर त्यांचे ताट वेगळे ठेवले पाहिजे. मराठा आणि ओबीसींना एकमेकांसमोर भिडवत ठेवलं जात आहे. विधानसभेपर्यंत त्यांना भिडवत ठेवलं जाईल, अशी माझी धारणा आहे. कुटुंबाची सत्ता ठेवायची असेल तर आरक्षण मिळाले पाहिजे. पक्षाची सत्ता यावी असं वाटत असेल तर सलोख्याची भाषा वापरली गेली पाहिजे, असं प्रकाश आंबडेकर म्हणाले.

संविधान वाचलं तरच…

मराठा असो की ओबीसी… संविधान वाचलं तरच सर्वांना आरक्षण आहे. भाजप किती संविधान बदलणार? आता संविधानाच्या बाजूने निकाल लागला आहे. जनतेचा कौल महाविकास आघाडीकडे गेला आहे. ओबीसींनी संविधानावर विश्वास ठेवला तर आरक्षण वाचलं जाऊ शकतं, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.

सग्यासोयऱ्याची व्याख्या करा

मनोज जरांगे यांच्याशी माझं मागे बोलणं झालं होतं. त्यावेळी सगेसोयऱ्याची व्याख्या तुम्ही करा. किंवा कुणाकडून तरी करून घ्या, असं मी सांगितलं होतं. जोपर्यंत व्याख्या काय होते हे कळत नाही, व्याख्या काय आहे हे समजत नाही, तोपर्यंत नेमकं काय ते कळणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

परिस्थिती स्फोटक

राज्यात सामाजिक सलोखा राहिला पाहिजे. तुम्ही उपोषण सुरू ठेवायला हरकत नाही. पण पाणी घ्या. पाणी पिऊन उपोषण करा. तुम्ही पाणी घेत राहाल ही आशा आहे. सध्या तरी आरक्षणाच्या प्रश्नावर शासनाकडून कोणतंही पाऊल पडताना दिसत नाही. ओबीसी आणि मराठा समाज अनेकवेळा आमनेसामने आला आहे. परिस्थिती स्फोटक असल्याची जाणीव मी अनेकवेळा शासनाला करून दिली आहे. शाश्वत आरक्षण निघून जाते की काय अशी भीती भटक्या विमुक्तांनाही वाटत आहे. याबाबत शासनाने चर्चा केली पाहिजे. राजकीय पक्षांनी भूमिका घेतली पाहिजे. या परिस्थितीतून मार्ग काढला पाहिजे, असं सांगतानाच आरक्षणावर आम्ही आमची भूमिका आधीच जाहीर केली आहे, असंही त्यांनी सांगितलं.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.