इराण-अमेरिका युद्धात भारताने जे केले ते कोणीही करून शकले नाही… भारताचा मोठा विजय, थेट यूएईमधून…
अमेरिका आणि इराण युद्ध सुरू आहे. या युद्धाचा आज 17 वा दिवस आहे. यादरम्यान एक अत्यंत मोठी बातमी पुढे येत आहे. भारताने मोठे यश या युद्धादरम्यान मिळाले आहे. इतर कोणत्याही देशाला जे जमले नाही ते भारताने करून दाखवले आहे.

इराण आणि अमेरिका युद्धाचा आज 17 वा दिवस आहे. मात्र, युद्ध काही थांबण्याचे नाव घेत नाही. युद्ध अधिक पेटले आहे. पाकिस्तानसह अन्य काही देशांमध्ये गॅस आणि कच्च्या तेलाचा मोठा तुटवडा आहे. भारतातही एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा आहे. परिस्थिती अधिक बिकड होत आहे. इराणकडून भारताकरिता होर्मुज खाडी खुली ठेवण्यात आली असून भारताला सुरक्षित मार्ग इराण देत आहे. होर्मुज खाडीत मोठा जाम लागला असून अनेक हल्ले केले जात आहेत. दिसेल त्या जहाजाला उडवले जात आहे. इराणकडून होर्मुज खाडी बंद करून अमेरिकेची नाकेबंदी करण्यात आली. जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किंमती अस्थिर झाल्या असून याचा मोठा फटका अमेरिकेला बसत आहे. इराणसोबत युद्ध सुरू करून अमेरिका चांगलीच फसल्याचे दिसत आहे. होर्मुज खाडी बंद असल्याने अनेक देशांचा अमेरिकेवर मोठा दबाव आहे. इस्त्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे जगात हाहाकार उडाला.
भारत या युद्धाच्या स्थितीमध्ये आपली ताकद जगाला दाखवताना दिसत आहे. इराण युद्धामुळे होर्मुज सामुद्रधुनीतून होणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली. पण या मार्गाने भारताचे जहाज सुरक्षित येताना दिसत आहेत. इतर देशांसाठी हा मार्ग इराणकडून पूर्णपणे बंद करण्यात आला. होर्मुजची सामुद्रधुनी खुली ठेवणे भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त अरबच्या अमिरातीतील फुजेराह तेल टर्मिनलवर मोठा हल्ला झाला. विशेष म्हणजे ज्यावेळी हा हल्ला झाला त्यावेळी भारताचे तेलवाहू जहाज जग लाडकी तिथेच होते आणि यादरम्यान त्याला सुरक्षित काढण्यात आले. भारतात परतण्याचा प्रवास सुरू केला आहे. हल्ला सुरू असताना भारताचे जहाज तिथेच होते.
फुजैराह ऑइल टर्मिनलवर हल्ला झाला तेव्हा जग लाडकी हे भारतीय जहाज सिंगल पॉइंट मूरिंग येथे कच्चे तेल भरत होते. जहाज सुरक्षित असून सर्व भारतीय खलाशी सुरक्षित आहेत. रविवारी सकाळी भारतीय वेळेनुसार सुमारे 10.30 वाजता जहाज फुजैराहहून सुरक्षितपणे निघाले. जहाज अंदाजे 80,800 मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन भारताकडे येत आहे. पूर्ण सुरक्षेमध्ये भारताच्या दिशेने जहाजाला आणले जात आहे. हा भारताचा सर्वात मोठा विजय म्हणाला लागेल. कारण हे जहाज होर्मुजची खाडी ओलांडून पुढे निघाले आहे.
