AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वक्फ बोर्डाची संपत्ती तुमच्या पप्पाची जहागीर नाही, काय म्हणाले की इम्तियाज जलील

केंद्र सरकारकडे आकडे आहेत म्हणून ते वक्फ बोर्डाचे बिल पास करून घेणार आहेत.परंतु आमची तयारी सुप्रीम कोर्ट जाण्याची आहे आणि कोर्टाने जर सांगितले हे बरोबर आहे तर ते आम्ही मान्य करू कारण न्याय प्रणालीवर मुसलमानांचा विश्वास आहे असेही इम्तियाझ जलील यांनी सांगितले.

वक्फ बोर्डाची संपत्ती तुमच्या पप्पाची जहागीर नाही, काय म्हणाले की इम्तियाज जलील
| Updated on: Apr 01, 2025 | 7:20 PM
Share

रमजान ईदच्या एक दिवस आधी बीडमधील एका मशिदीत स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली होती.यावर आता एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले की या मस्जिद स्फोटात बीड पोलिसांनी जी कारवाई केली आहे, त्यावर मी सुरुवातीला समाधानी होतो. परंतू पोलिसांनी एफआयआरमध्ये जी कलमे लावली आहेत त्यावर आपण समाधानी नाही असे त्यांनी म्हटले आहे.

इम्तियाज जलील पुढे म्हणाले की पोलिसांनी युएपीएनुसार गुन्हा दाखल केला आहे, त्यावर मी मात्र समाधानी नाही, त्या संदर्भात आधीही बोललो आहे, ज्या पध्दतीने स्फोट करणाऱ्यांनी सिगरेट पीत आणि इंस्टा रील्स करत मजिदमध्ये स्फोट घडवला. त्यावरून असे दिसते की त्यांना पोलीस आणि सरकारची भीती राहिलेली नाही. उत्तरप्रदेशामध्ये जे गुंडाराज सुरू आहे,ते गुंडाराज महाराष्ट्रामध्ये दिसता कामा नये, महाराष्ट्राची वेगळी एक संस्कृती आहे आणि महाराष्ट्राला शांती हवी आहे आणि आशा प्रकारच्या लोकांवर कारवाई केली पाहिजे अशी मागणी इम्तियाज जलील यांनी केली आहे.

औरंगजेबची कबर लोकांनी जाऊन बघावी

इतिहास कसाही असुद्या पण या देशावर औरंगजेबने राज्य केलेले आहे आणि औरंगजेबचा मोठा कार्यकाळ होता. आणि औरंगजेब जेव्हा मारणार होता तेव्हा त्याने साधी कबर असावी आणि त्या काळात तो राजा असतानाही आणि त्यांनी सांगितले होते की माझी कबर खुप मोठी, चांगली आणि सोन्याची करा असे म्हटले नाही,त्यामुळे त्यांच्या इच्छेप्रमाणे ती साधी कबर आहे.राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात जो मुद्दा सांगितला आहे, ती कबर काढू नये, तिथेच ठेवावी आणि इतिहास काय होता ते लोकांना कळू द्यावा ते योग्य आहे.ज्यांना पाहायची आहे ते लोक पाहातील आणि जे लोक धर्माच्या नावाखाली कबर उखडून टाकण्याची भाषा बोलतात, हे सर्व लोक छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेऊन घाणेरडे राजकारण करीत असतात.

एक ते दोन टक्के लोक हे प्रत्येक समाजात आहेत

शिवाजी महाराज यांनी अफजलखान याला ठार केले होते.त्याची कबर शिवाजी महाराजांनी बांधली आहे. आणि जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे संभाषण सांगते की, एकदा माणूस मेला की वैर संपते. तीनशे वर्षापूर्वी काय झाले होते ते इम्तियाज जलील यांनी सांगितले पाहिजे का..? तुमच्याकडे कुठले मुद्दे राहिलेले नाही म्हणून हे मुद्दे घेऊन तुम्हाला राजकारण करायचे आहे का? पण लोक आता खूप हुशार झाले आहे, एक ते दोन टक्के लोक हे प्रत्येक समाजात आहेत, ते हिंदू, मुसलमान आणि बौध्द समाजातही आहेत असेही इम्तियाज म्हणाले.

समितीचे निर्णय मान्यच नव्हते..? तर हे नाटक का केले?

वक्फ बोर्डा संदर्भात जॉईंट पार्लमेंटरी कमिटी तयार करण्यात आली होती आणि त्यामध्ये आमच्या पार्टीचे असदुद्दीन ओवैसी यांनी त्या ठिकाणी मोठी कामगिरी बजावली होती.जॉईंट पार्लमेंटरी समितीने आपला रिपोर्ट पार्लमेंटला सादर केलेला आहे. परंतु त्यापूर्वीच या सरकारने कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला. जे समितीने निर्णय घेतले आहे ते रद्द करण्यात आले आहेत. जर तुम्हाला समितीचे निर्णय मान्यच नव्हते..? तर हे नाटक का केले? लोकांचे पैसे आणि वेळ का वाया घातला. तुम्हाला तुमच्या पद्धतीने निर्णय घ्यायचा होता तर कशाला ही जॉईंट पार्लमेंटरी कमिटी( JPC) का तयार केली..?

वर्क्फ बोर्डावर इतर समाजाचे लोक येणार तर…

सरकारकडे आकडे आहेत आणि म्हणूनच आणि वक्फ बोर्डाच्या या बिलाला चंद्रबाबू नायडू, नितेश कुमार आणि अजित पवार यांनी या बिलाला उघड सपोर्ट केलेला आहे. आम्ही त्या बिलाला विरोध केलेला आहे आणि वक्त बोर्डाची जी संपत्ती आहे.ती मुस्लिम समाजाची संपत्ती आहे.मुस्लिम समाजाने दान केलेली ही सर्व मालमत्ता आहे. ही काही तुमची जहागीर नाही. म्हणजे माझ्या भाषेत बोललो तरी पप्पाची जागीर नाही. बोर्डावर तुमचे लोक येत असतील तर इतर जाती धर्माचे जे बोर्ड आहेत त्यांच्यातही आमचे लोक टाका अशी मागणी जलील यांनी केली आहे.

Follow Us
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच...
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच....