AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वक्फ बोर्डाची संपत्ती तुमच्या पप्पाची जहागीर नाही, काय म्हणाले की इम्तियाज जलील

केंद्र सरकारकडे आकडे आहेत म्हणून ते वक्फ बोर्डाचे बिल पास करून घेणार आहेत.परंतु आमची तयारी सुप्रीम कोर्ट जाण्याची आहे आणि कोर्टाने जर सांगितले हे बरोबर आहे तर ते आम्ही मान्य करू कारण न्याय प्रणालीवर मुसलमानांचा विश्वास आहे असेही इम्तियाझ जलील यांनी सांगितले.

वक्फ बोर्डाची संपत्ती तुमच्या पप्पाची जहागीर नाही, काय म्हणाले की इम्तियाज जलील
| Updated on: Apr 01, 2025 | 7:20 PM
Share

रमजान ईदच्या एक दिवस आधी बीडमधील एका मशिदीत स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली होती.यावर आता एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले की या मस्जिद स्फोटात बीड पोलिसांनी जी कारवाई केली आहे, त्यावर मी सुरुवातीला समाधानी होतो. परंतू पोलिसांनी एफआयआरमध्ये जी कलमे लावली आहेत त्यावर आपण समाधानी नाही असे त्यांनी म्हटले आहे.

इम्तियाज जलील पुढे म्हणाले की पोलिसांनी युएपीएनुसार गुन्हा दाखल केला आहे, त्यावर मी मात्र समाधानी नाही, त्या संदर्भात आधीही बोललो आहे, ज्या पध्दतीने स्फोट करणाऱ्यांनी सिगरेट पीत आणि इंस्टा रील्स करत मजिदमध्ये स्फोट घडवला. त्यावरून असे दिसते की त्यांना पोलीस आणि सरकारची भीती राहिलेली नाही. उत्तरप्रदेशामध्ये जे गुंडाराज सुरू आहे,ते गुंडाराज महाराष्ट्रामध्ये दिसता कामा नये, महाराष्ट्राची वेगळी एक संस्कृती आहे आणि महाराष्ट्राला शांती हवी आहे आणि आशा प्रकारच्या लोकांवर कारवाई केली पाहिजे अशी मागणी इम्तियाज जलील यांनी केली आहे.

औरंगजेबची कबर लोकांनी जाऊन बघावी

इतिहास कसाही असुद्या पण या देशावर औरंगजेबने राज्य केलेले आहे आणि औरंगजेबचा मोठा कार्यकाळ होता. आणि औरंगजेब जेव्हा मारणार होता तेव्हा त्याने साधी कबर असावी आणि त्या काळात तो राजा असतानाही आणि त्यांनी सांगितले होते की माझी कबर खुप मोठी, चांगली आणि सोन्याची करा असे म्हटले नाही,त्यामुळे त्यांच्या इच्छेप्रमाणे ती साधी कबर आहे.राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात जो मुद्दा सांगितला आहे, ती कबर काढू नये, तिथेच ठेवावी आणि इतिहास काय होता ते लोकांना कळू द्यावा ते योग्य आहे.ज्यांना पाहायची आहे ते लोक पाहातील आणि जे लोक धर्माच्या नावाखाली कबर उखडून टाकण्याची भाषा बोलतात, हे सर्व लोक छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेऊन घाणेरडे राजकारण करीत असतात.

एक ते दोन टक्के लोक हे प्रत्येक समाजात आहेत

शिवाजी महाराज यांनी अफजलखान याला ठार केले होते.त्याची कबर शिवाजी महाराजांनी बांधली आहे. आणि जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे संभाषण सांगते की, एकदा माणूस मेला की वैर संपते. तीनशे वर्षापूर्वी काय झाले होते ते इम्तियाज जलील यांनी सांगितले पाहिजे का..? तुमच्याकडे कुठले मुद्दे राहिलेले नाही म्हणून हे मुद्दे घेऊन तुम्हाला राजकारण करायचे आहे का? पण लोक आता खूप हुशार झाले आहे, एक ते दोन टक्के लोक हे प्रत्येक समाजात आहेत, ते हिंदू, मुसलमान आणि बौध्द समाजातही आहेत असेही इम्तियाज म्हणाले.

समितीचे निर्णय मान्यच नव्हते..? तर हे नाटक का केले?

वक्फ बोर्डा संदर्भात जॉईंट पार्लमेंटरी कमिटी तयार करण्यात आली होती आणि त्यामध्ये आमच्या पार्टीचे असदुद्दीन ओवैसी यांनी त्या ठिकाणी मोठी कामगिरी बजावली होती.जॉईंट पार्लमेंटरी समितीने आपला रिपोर्ट पार्लमेंटला सादर केलेला आहे. परंतु त्यापूर्वीच या सरकारने कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला. जे समितीने निर्णय घेतले आहे ते रद्द करण्यात आले आहेत. जर तुम्हाला समितीचे निर्णय मान्यच नव्हते..? तर हे नाटक का केले? लोकांचे पैसे आणि वेळ का वाया घातला. तुम्हाला तुमच्या पद्धतीने निर्णय घ्यायचा होता तर कशाला ही जॉईंट पार्लमेंटरी कमिटी( JPC) का तयार केली..?

वर्क्फ बोर्डावर इतर समाजाचे लोक येणार तर…

सरकारकडे आकडे आहेत आणि म्हणूनच आणि वक्फ बोर्डाच्या या बिलाला चंद्रबाबू नायडू, नितेश कुमार आणि अजित पवार यांनी या बिलाला उघड सपोर्ट केलेला आहे. आम्ही त्या बिलाला विरोध केलेला आहे आणि वक्त बोर्डाची जी संपत्ती आहे.ती मुस्लिम समाजाची संपत्ती आहे.मुस्लिम समाजाने दान केलेली ही सर्व मालमत्ता आहे. ही काही तुमची जहागीर नाही. म्हणजे माझ्या भाषेत बोललो तरी पप्पाची जागीर नाही. बोर्डावर तुमचे लोक येत असतील तर इतर जाती धर्माचे जे बोर्ड आहेत त्यांच्यातही आमचे लोक टाका अशी मागणी जलील यांनी केली आहे.

Follow Us
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही.
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?.
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा.
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान.
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना...
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना....
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प.
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?.
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या....
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या.....
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय.