AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Wardha Flood : वर्ध्यातील पुरात 5 दुचाकी 2 सायकली वाहून गेल्या, वाहने खोल खड्ड्यात जाऊन अडकली, शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली

सर्व मजूर रविवारपासून वाहनांचा शोध घेत होती. खड्ड्यातील गाळत फसलेल्या दोन दुचाकी व एक सायकल जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आली. तसेच इतर तीन दुचाकी व एका सायकलचा शोध सुरु आहे.

Wardha Flood : वर्ध्यातील पुरात 5 दुचाकी 2 सायकली वाहून गेल्या, वाहने खोल खड्ड्यात जाऊन अडकली, शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली
वर्ध्यातील पुरात 5 दुचाकी 2 सायकली वाहून गेल्या
| Edited By: | Updated on: Jul 11, 2022 | 9:43 PM
Share

वर्धा : मागील एका आठवड्यापासून जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातून गेलेल्या समृद्धी महामार्गाजवळून वाहणाऱ्या पाण्यात 5 दुचाकी वाहने आणि 2 सायकली पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या. ही वाहने खोल खड्ड्यात जाऊन अडकल्याने त्यावर महामार्गाचा गाळ पडल्याने वाहने गाळात दबली. ही वाहने जेसीबीच्या मदतीने दोन दुचाकी अन् एक सायकल काढण्यात आली. इतर वाहने अजूनही मिळाली नसल्याची माहिती आहे. वर्धा तालुक्यातील शेकापूर (Shekapur) आणि मांडवा (Mandwa) या दोन गावादरम्यान समृद्धी महामार्ग जातो. या महामार्गाच्या पुलाजवळ शनिवारी दुपारच्या सुमारास काम करणाऱ्या मजुरांनी पाच दुचाकी वाहने उभी करून ठेवली होती. त्याच ठिकाणी इतर दोन मजुरांच्या सायकल उभ्या होत्या. पुलाजवळ वाहने ठेवून हे सर्व समृद्धीच्या कामावर पायदळ गेले होते.

पुलाशेजारील वाहने वाहत गेली

दुपारी आलेल्या मुसळधार पावसामुळे समृद्धी मार्गावर पडणाऱ्या पावसाचे पाणी उंचावरून खाली वेगात वाहत आले. पाण्यासोबत समृद्धी मार्गाच्या कडेला असलेली माती दगड देखील खाली आले. पाण्याच्या प्रवाहात पुलाशेजारी उभी असलेली वाहने चक्क वाहत गेली. रस्त्यापासून काही दूर अंतरावर असलेल्या खोल भागात महामार्गाचे पाणी जाऊन साचले. त्या पाण्यात वाहत गेलेली वाहने खड्ड्यात जाऊन पडली. त्या वाहनांवर महामार्गाच्या पाण्यासोबत वाहत आलेली माती व दगड पडल्याने सर्व वाहने खड्ड्यात फसली. मजूर परत आले तेव्हा त्यांना त्यांची वाहने दिसून आली नाही.

शेतकऱ्यांची पिके खरडून निघाली

सर्व मजूर रविवारपासून वाहनांचा शोध घेत होती. खड्ड्यातील गाळत फसलेल्या दोन दुचाकी व एक सायकल जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आली. तसेच इतर तीन दुचाकी व एका सायकलचा शोध सुरु आहे. एवढंच नव्हे तर सतत येत असलेल्या पावसामुळे या परिसरातील अनेक शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली आली आहे. काही शेतकऱ्यांची पिके अक्षरशः खरडून निघाली आहेत.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.