Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Wardha Crime : गावोगावी जाऊन चप्पल विक्रीचा व्यवसाय करायचे, नागपूरहून गेले ते परतलेच नाही, पांढुर्ण्यात दाम्पत्याची आत्महत्या

खडतकर दाम्पत्य 27 जुलैला घरून गेले. सोबत चप्पल विक्रीचे सामान होते. नेहमीप्रमाणे ते व्यवसायासाठी बाहेर गेले. पण, ते परत आलेच नाही. त्यामुळं त्यांच्या मुलानं नागपूर शहर पोलिसांत मिसिंगची तक्रार नोंदविली होती.

Wardha Crime : गावोगावी जाऊन चप्पल विक्रीचा व्यवसाय करायचे, नागपूरहून गेले ते परतलेच नाही, पांढुर्ण्यात दाम्पत्याची आत्महत्या
पंजाबमध्ये स्कूल बसवर तलवारीने हल्ला
Follow us
| Updated on: Aug 06, 2022 | 9:29 PM

वर्धा : जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील (Ashti Taluka) पांढुर्णा परिसरामध्ये नागपूरच्या पारडी येथील पती-पत्नीने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना दुपारच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरामध्ये खळबळ निर्माण झाली आहे. नागपूर जिल्ह्यातील पारडी येथील रहिवासी रामकृष्ण खडतकर (वय 60) व त्यांची पत्नी शोभा रामकृष्ण खतकर (वय 53) यांनी पांढुर्णा परिसरात विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. 27 जुलैपासून हे दाम्पत्य एमएच 49 एटी 5796 क्रमांकाचे व्यावसायिक वाहन घेऊन भ्रमंती करत होते. शनिवारी 6 ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास पांढुर्णा परिसरात रामकृष्ण खडतकर (Ramakrishna Khatkar) आणि शोभा खडतकर (Shobha Khatkar) यांचा मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता पाठविण्यात आले. घटनास्थळावरून विषारी द्रव्याचे ग्लास, बॉटल, पिशवी आदी साहित्य जप्त करण्यात आले.

नागपूर शहर पोलिसांत मिसिंगची तक्रार

घटनेनंतर पोलिसांनी मिळालेल्या मोबाईल क्रमांकावरून मृतकाच्या मुलाशी संपर्क साधला. मृतक हे मूळचे पारडी नागपूर शहर येथील असल्याची माहिती मिळाली. ते गावोगावी जावून बाजाराच्या ठिकाणी चप्पल, बुट विक्रीचा व्यवसाय करायचे. 27 जुलै रोजी ते एमएमच 49 ए टी 5796 क्रमांकाच्या वाहनात चप्पल बुट विक्रीसाठी घेऊन गेले होते. तेव्हापासून ते घरी परतले नव्हते. त्यांच्या मुलाने याबाबत नागपूर शहर पोलीस ठाण्यात मिसींगची तक्रार केली होती.

नेमकं काय घडलं?

खडतकर दाम्पत्य 27 जुलैला घरून गेले. सोबत चप्पल विक्रीचे सामान होते. नेहमीप्रमाणे ते व्यवसायासाठी बाहेर गेले. पण, ते परत आलेच नाही. त्यामुळं त्यांच्या मुलानं नागपूर शहर पोलिसांत मिसिंगची तक्रार नोंदविली होती. आज या दाम्पत्यांच्या मृतदेह सापडला. त्यांनी विष पिऊन आत्महत्या केली असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी साहित्य जप्त केले आहे. तपासानंतर त्यांनी जीवन का संपविले याचा शोध घेतला जाईल. मृतकाच्या मुलाकडूनही माहिती घेतली जाईल. त्यानंतर जीवन का संपविले याचं कारण पुढं येण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

भिकारी 1 रूपया घेत नाही पण सरकार..., कृषीमंत्री भिकारी कोणाला म्हणाले?
भिकारी 1 रूपया घेत नाही पण सरकार..., कृषीमंत्री भिकारी कोणाला म्हणाले?.
आधी हल्लाबोल आता धनंजय मुंडेंचीच घेतली भेट,सुरेश धसांची गुप्त सेटिंग?
आधी हल्लाबोल आता धनंजय मुंडेंचीच घेतली भेट,सुरेश धसांची गुप्त सेटिंग?.
दादा पवार मुंडेंच्या पाठिशी, तूर्तास मंत्रिपद शाबूत, कोअर कमिटीत स्थान
दादा पवार मुंडेंच्या पाठिशी, तूर्तास मंत्रिपद शाबूत, कोअर कमिटीत स्थान.
भेटायला जायला ते काय आयसीयूत गेले होते की कोमात? मनोज जरांगे संतापले
भेटायला जायला ते काय आयसीयूत गेले होते की कोमात? मनोज जरांगे संतापले.
संतोष देशमुख लढा आणि मुंडेंची तब्येत वेगळी...,' काय म्हणाले सुरेश धस
संतोष देशमुख लढा आणि मुंडेंची तब्येत वेगळी...,' काय म्हणाले सुरेश धस.
वाल्मिक कराडची बी टीम सक्रीय आहे..,' काय म्हणाले धनंजय देशमुख
वाल्मिक कराडची बी टीम सक्रीय आहे..,' काय म्हणाले धनंजय देशमुख.
आरबीआयने आणले या बँकेवर निर्बंध, मुलांचे लग्न, घराचे हप्ते सर्वच रखडले
आरबीआयने आणले या बँकेवर निर्बंध, मुलांचे लग्न, घराचे हप्ते सर्वच रखडले.
आता क्रिकेटमध्येही पदवीधर होता येणार... लवकरच कोर्स सुरू होणार
आता क्रिकेटमध्येही पदवीधर होता येणार... लवकरच कोर्स सुरू होणार.
मनोज जरांगे पाटील यांचा मोठा निर्णय; सरकारला दिलासा की घाम फुटणार?
मनोज जरांगे पाटील यांचा मोठा निर्णय; सरकारला दिलासा की घाम फुटणार?.
अजितदादांकडून मुंडेंची पाठराखण, दमानिया म्हणाल्या, यांना कोर्टातूनच...
अजितदादांकडून मुंडेंची पाठराखण, दमानिया म्हणाल्या, यांना कोर्टातूनच....