AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Wardha Crime : गावोगावी जाऊन चप्पल विक्रीचा व्यवसाय करायचे, नागपूरहून गेले ते परतलेच नाही, पांढुर्ण्यात दाम्पत्याची आत्महत्या

खडतकर दाम्पत्य 27 जुलैला घरून गेले. सोबत चप्पल विक्रीचे सामान होते. नेहमीप्रमाणे ते व्यवसायासाठी बाहेर गेले. पण, ते परत आलेच नाही. त्यामुळं त्यांच्या मुलानं नागपूर शहर पोलिसांत मिसिंगची तक्रार नोंदविली होती.

Wardha Crime : गावोगावी जाऊन चप्पल विक्रीचा व्यवसाय करायचे, नागपूरहून गेले ते परतलेच नाही, पांढुर्ण्यात दाम्पत्याची आत्महत्या
पंजाबमध्ये स्कूल बसवर तलवारीने हल्ला
| Edited By: | Updated on: Aug 06, 2022 | 9:29 PM
Share

वर्धा : जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील (Ashti Taluka) पांढुर्णा परिसरामध्ये नागपूरच्या पारडी येथील पती-पत्नीने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना दुपारच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरामध्ये खळबळ निर्माण झाली आहे. नागपूर जिल्ह्यातील पारडी येथील रहिवासी रामकृष्ण खडतकर (वय 60) व त्यांची पत्नी शोभा रामकृष्ण खतकर (वय 53) यांनी पांढुर्णा परिसरात विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. 27 जुलैपासून हे दाम्पत्य एमएच 49 एटी 5796 क्रमांकाचे व्यावसायिक वाहन घेऊन भ्रमंती करत होते. शनिवारी 6 ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास पांढुर्णा परिसरात रामकृष्ण खडतकर (Ramakrishna Khatkar) आणि शोभा खडतकर (Shobha Khatkar) यांचा मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता पाठविण्यात आले. घटनास्थळावरून विषारी द्रव्याचे ग्लास, बॉटल, पिशवी आदी साहित्य जप्त करण्यात आले.

नागपूर शहर पोलिसांत मिसिंगची तक्रार

घटनेनंतर पोलिसांनी मिळालेल्या मोबाईल क्रमांकावरून मृतकाच्या मुलाशी संपर्क साधला. मृतक हे मूळचे पारडी नागपूर शहर येथील असल्याची माहिती मिळाली. ते गावोगावी जावून बाजाराच्या ठिकाणी चप्पल, बुट विक्रीचा व्यवसाय करायचे. 27 जुलै रोजी ते एमएमच 49 ए टी 5796 क्रमांकाच्या वाहनात चप्पल बुट विक्रीसाठी घेऊन गेले होते. तेव्हापासून ते घरी परतले नव्हते. त्यांच्या मुलाने याबाबत नागपूर शहर पोलीस ठाण्यात मिसींगची तक्रार केली होती.

नेमकं काय घडलं?

खडतकर दाम्पत्य 27 जुलैला घरून गेले. सोबत चप्पल विक्रीचे सामान होते. नेहमीप्रमाणे ते व्यवसायासाठी बाहेर गेले. पण, ते परत आलेच नाही. त्यामुळं त्यांच्या मुलानं नागपूर शहर पोलिसांत मिसिंगची तक्रार नोंदविली होती. आज या दाम्पत्यांच्या मृतदेह सापडला. त्यांनी विष पिऊन आत्महत्या केली असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी साहित्य जप्त केले आहे. तपासानंतर त्यांनी जीवन का संपविले याचा शोध घेतला जाईल. मृतकाच्या मुलाकडूनही माहिती घेतली जाईल. त्यानंतर जीवन का संपविले याचं कारण पुढं येण्याची शक्यता आहे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.