AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वसतिगृहातील भोजनात सापडल्या अळ्या, निकृष्ट भोजन मिळत असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप

विद्यार्थ्यांना मागील दोन-तीन महिन्यांपासून मेसबाबत समस्या येत असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे.

वसतिगृहातील भोजनात सापडल्या अळ्या, निकृष्ट भोजन मिळत असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप
निकृष्ट भोजन मिळत असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप Image Credit source: tv 9
| Updated on: Oct 16, 2022 | 3:50 PM
Share

महेश मुंजेवार, TV9 मराठी, प्रतिनिधी, वर्धा : वर्ध्याच्या महात्मा गांधी (Mahatma Gandhi) आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयातील (Hindi University)वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या जेवणात अळ्या निघाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. रात्रीच्या जेवणात अळ्या निघाल्यानं काही विद्यार्थ्यांना उलट्या झाल्याची माहिती आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांनी रात्रीच्यावेळी नारे देत कारवाईची मागणी केलीय. हिंदी विश्वविद्यालयातील वसतिगृहातील (in hostel) विद्यार्थ्यांच्या जेवणात अळ्या दिसल्यानं विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. तसे फोटोही व्हायरल झालेत.

विद्यार्थ्यांना मागील दोन-तीन महिन्यांपासून मेसबाबत समस्या येत असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. विद्यापीठ प्रशासनानं मध्यरात्री विद्यार्थ्यांशी चर्चा केली. तोडगा काढला असल्याचं बोललं जातंय.

गेल्या चार महिन्यांपासून आम्ही चांगल्या अन्नाची मागणी करत आहोत. बैठकाही होत आहेत. पण, त्यात कोणत्याही प्रकारची सुधारणा झालेली दिसत नाही.

हे हिंदी विश्वविद्यालय देशात प्रसिद्ध आहे. देशभरातील विद्यार्थी येथे शिकण्यासाठी येतात. अशावेळी अन्न चांगलं मिळत नसेल, तर विद्यार्थ्यांची पंचाईत होते.

विशेष म्हणजे गेल्या चार महिन्यांपासून विद्यार्थी मेसबाबत तक्रारी करत आहेत. परंतु, प्रशासनानं याची दखल न घेणे ही अतिशय गंभीर बाब आहे.

यावेळी तर चक्क अळ्याचं सापडल्या. असं अन्न महाविद्यालयीन विद्यार्थी कसं खातील, असा प्रश्न निर्माण होत आहे.

Follow Us
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना...
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना....
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प.
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?.
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या....
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या.....
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय.
अशोक खरात प्रकरणात नवे खुलासे; भोंदू खरातची नवीन मोडस ऑपरेंडी समोर
अशोक खरात प्रकरणात नवे खुलासे; भोंदू खरातची नवीन मोडस ऑपरेंडी समोर.
आता रेशनकार्डवर मिळणार रॉकेल, पण या शहरातील ग्राहक राहणार वंचित....
आता रेशनकार्डवर मिळणार रॉकेल, पण या शहरातील ग्राहक राहणार वंचित.....
2029 मध्ये उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होतील का?
2029 मध्ये उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होतील का?.
खरातच्या भोंदूगिरीला बळी पडलेल्या राजेंद्र जासूद यांचा खळबळजनक खुलासा
खरातच्या भोंदूगिरीला बळी पडलेल्या राजेंद्र जासूद यांचा खळबळजनक खुलासा.
चंद्रकांत खैरे यांचा अघोरी पूजेबाबत धक्कादायक दावा, राजकीय वर्तुळात...
चंद्रकांत खैरे यांचा अघोरी पूजेबाबत धक्कादायक दावा, राजकीय वर्तुळात....