AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Washim Crime | पती-पत्नीचा वाद, बाप मुले घेऊन आला; रेल्वेस्थानकावर चिमुकल्यांना सोडले, पोलिसांकडून वडिलांचा शोध

बायकोशी भांडण झाले म्हणून त्यानं मुलांना रेल्वेस्ठेशनवर आणले. तिथं त्यांना खाऊ आणून देतो. तुम्ही इथंच थांबा, असं सांगितलं. मुलं थांबली पण बाप तिथून मुलांना वाऱ्यावर सोडून पळून गेला. थोड्या वेळानं मुलं रडायला लागली. एकीकडं त्यांच्या आईशी बापाचं झालेलं भांडण. दुसरीकडं बापानंही त्यांना वाऱ्यावर सोडलं.

Washim Crime | पती-पत्नीचा वाद, बाप मुले घेऊन आला; रेल्वेस्थानकावर चिमुकल्यांना सोडले, पोलिसांकडून वडिलांचा शोध
रेल्वेस्थानकावर बापाने चिमुकल्यांना सोडलेImage Credit source: t v 9
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: May 26, 2022 | 12:59 PM
Share

वाशिम : वाशिम जिल्ह्यातील जऊळका रेल्वे (Jaulka Railway) येथे निर्दयी बापानं चिमुकल्या दोन मुलांना वाऱ्यावर सोडले. सखाराम जाधव (Sakharam Jadhav) रा. धोत्रा जिल्हा हिंगोली येथील एका निर्दयी बापाचे नाव. उपाशी पोटी असलेल्या आपल्या पोटच्या दोन लहान चिमुकल्यांना मी तुमच्यासाठी काही तरी खायला घेऊन येतो म्हणून चक्क रेल्वेस्टेशनच्या प्लॅट फॉर्मवर सोडून पळ काढल्याची धक्कादायक घटना घडली. मालेगाव तालुक्यातील वरदरी (Vardari in Malegaon taluka) येथे सासरवाडी असलेला व्यक्ती आपल्या दोन चिमुकल्यांना सोबत घेऊन आला. पत्नीसोबत भांडण करून पुणे येथून घरी धोत्रा आला. तेथून आज सकाळी पूर्णा अकोला पॅसेंजरने आपल्या दोन चिमुकल्यासह जऊळका रेल्वे स्टेशनवर उतरून आपल्या दोन्ही लहान मुलांना प्लॅटफॉर्मवर बसवले. लहान मुलांना खाऊ आणण्यासाठी जातो म्हणून निघून गेला. मात्र तब्बल 5 तास उलटून सुद्धा वडील न आल्याने लहान मुलांना अश्रू अनावर झाले.

5 तासातच वडिलांचा शोध

या घटनेची माहिती निर्भया पथकाला व गावातील पोलीस पाटील विजय सरोदे यांना मिळाली. रेल्वे स्टेशनवर दाखल होऊन मुलांची शहानिशा करून ताब्यात घेतले. उपाशी असलेल्या मुलांना पाणी व जेवण दिले. त्यानंतर माणुसकीला काळिमा फासणाऱ्या संभाव्य घटना टाळण्यास निर्भया पथकाच्या पोलीस महिला कर्मचारी शितल सरनाईक व पोलीस निरीक्षक अजिनाथ मोरे यांनी अवघ्या 5 तासातच वडिलांचा शोध घेतला. मुलांना वडील व मामांच्या स्वाधीन करण्यात आले. या प्रेरणादायी कार्याचे वाशिम पोलीस अधीक्षक बच्चनसिंह यांनी कौतुक केले. अशी माहिती पोलीस निरीक्षक अजिनाथ मोरे यांनी दिली.

बापाला नाही आली दया

दोन्ही मुले सहा ते आठ वर्षे वयोगटातील आहेत. बायकोशी भांडण झाले म्हणून त्यानं मुलांना रेल्वेस्ठेशनवर आणले. तिथं त्यांना खाऊ आणून देतो. तुम्ही इथंच थांबा, असं सांगितलं. मुलं थांबली पण बाप तिथून मुलांना वाऱ्यावर सोडून पळून गेला. थोड्या वेळानं मुलं रडायला लागली. एकीकडं त्यांच्या आईशी बापाचं झालेलं भांडण. दुसरीकडं बापानंही त्यांना वाऱ्यावर सोडलं. आता कुठं जावं, असा प्रश्न त्यांच्या मनात आला. काहीच सुचत नव्हतं. अशात पोलिसांनी मदत केली. दोन्ही मुलांना जवळ घेतले. त्यांच्या वडिलांचा शोध घेतला. पाच तासातच निर्दयी बाप सापडला. त्यानं शेवटी मुलांना घरी नेलं.

Follow Us
पुन्हा चर्चा रंगल्या! सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीने...
पुन्हा चर्चा रंगल्या! सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीने प्रवास, भाजप नेता म्हणाला...
शिंदेंच्या अनुपस्थितीमुळे एमएमआरडीएच्या कार्यक्रमावर चर्चांना उधाण
मुंबईतील एमएमआरडीएच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनुपस्थित
आमसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष
सिंधुदुर्गातील दोडामार्ग आमसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष
विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर आश्रमशाळा व्यवस्थापनावर उईके संतापले
साप चावल्याने विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर आश्रमशाळा व्यवस्थापनावर मंत्री उईके संतापले
मांसाहार करत असाल तर... भावेश कावरे यांच्या व्हिडिओने मुंबईत खळबळ
Tardeo Estate Agent | मांसाहार करत असाल तर... भावेश कावरे यांच्या व्हिडिओने मुंबईत खळबळ, नेमकं प्रकरण काय?
'बावनकुळेंना चांगलं म्हणायचो, पण आता ते मनातून उतरले'
बावनकुळेंना चांगलं म्हणायचो, पण आता ते मनातून उतरले - जरांगे पाटलांचे खळबळजनक विधान.
पतीला गमावलं, महिनाभरात पत्नीनेही आयुष्य संपवलं; नेमकं काय घडलं?
पतीला गमावलं, महिनाभरात पत्नीनेही आयुष्य संपवलं; दोन मुलींवरून आई-वडिलांचं छत्र हरपलं, नेमकं काय घडलं?
विद्यार्थिनींचा अभिजीत दिपके यांनी शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल
नागपूरमधील विद्यार्थिनींचा संघर्ष: बस सेवेच्या मागणीचा अभिजीत दिपके यांनी शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल
मुंबईकडे येणाऱ्या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत: मुंबईकडे येणाऱ्या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने
राज ठाकरंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली अन् अचानक रद्द केली, काय घडलं?
राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली अन् अचानक रद्द केली, असं काय घडलं?