AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Water Taxi: नवी मुंबई ते गेटवे ऑफ इंडिया अवघ्या 40 मिनिटांत, कसं घ्या जाणून ?

मुंबई आता लवकरच नवी मुंबई विमानतळाशी जलमार्गाने जोडली जाईल. नवी मुंबई विमानतळाला मुंबईशी जोडण्यासाठी वॉटर टॅक्सी सेवा सुरू केली जाईल, असे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले. ही सेवा सुरू झाल्यामुळे मुंबई ते नवी मुंबई विमानतळ हा प्रवास फक्त 40 मिनिटांत पूर्ण होऊ शकतो.

Mumbai Water Taxi: नवी मुंबई ते गेटवे ऑफ इंडिया अवघ्या 40 मिनिटांत, कसं घ्या जाणून ?
वॉटर टॅक्सीImage Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Jun 05, 2025 | 10:00 AM
Share

घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईकरांसाठी आता एका खुशखबर आहे. मुंबई आता लवकरत जलमार्गाद्वारे नवी मुंबईशी जोडली जाणार आहे. नवी मुंबई विमानतळाला मुंबईशी जोडण्यासाठी वॉटर टॅक्सी सेवा सुरू केली जाईल, असे मत्स्यव्यवसाय आणि बंदर मंत्री नितेश राणे यांनी सांगितले. आवश्यक ठिकाणी जेट्टी बांधण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. ही सेवा सुरू झाल्यावर मुंबई ते नवी मुंबई विमानतळ हा प्रवास फक्त 40 मिनिटांत पूर्ण होईल.

मंत्रालयात झाली बैठक

वॉटर टॅक्सी सुरू करण्यासंदर्भात मंत्रालयात एक बैठक झाली. या बैठकीसाठी वाहतूक, बंदरे आणि हवाई वाहतूक विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, नवी मुंबई विमानतळ प्राधिकरणाचे ब्रिजेश सिंघल आणि महाराष्ट्र सागर मंडळाचे प्रदीप बधी यांच्यासह अनेक विभागांचे अधिकारी उपस्थित होते. वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या सुविधांवरही या बैठकीत चर्चा करण्यात आली.

आत्ता कशी आहे व्यवस्था ?

वॉटर टॅक्सींसाठी टर्मिनल बांधण्याचे काम हळूहळू सुरू करावे, असे राणेंनी सांगितलं. यासंदर्भातील परवानगीसाठी विमानतळ प्राधिकरणाकडे प्रस्ताव सादर करावा लागेल. मालवाहतुकीसाठी जेट्टी बांधण्यासाठीही जागा निश्चित करावी. सध्या मुंबईहून नवी मुंबईला जाण्यासाठी सायन-पनवेल महामार्ग, विलासराव देशमुख ईस्टर्न फ्रीवे आणि हार्बर रेल्वे लाईन असे मार्ग आहेत.

वॉटर टॅक्सी मार्ग कुठून कुठपर्यंत ?

रेडिओ जेट्टी ते नवी मुंबई विमानतळापर्यंत वॉटर टॅक्सी चालवण्याची योजना आहे. या मार्गावरील इतर थांब्यांचीही तपासणी केली जात आहे. या प्रवासासाठी इलेक्ट्रिक बोटी वापरल्या जातील. यामुळे प्रदूषण कमी होईल आणि पर्यावरणासाठी एक नवीन मार्ग खुला होईल. तसेच, लोक वाहतूक कोंडीशिवाय नवी मुंबईला लवकर पोहोचू शकतील. यामुळे प्रवासाचा बराच वेळ वाचणार आहे.

नितेश राणे काय म्हणाले ?

मुंबईभोवती जलवाहतुकीचे अनेक पर्याय आहेत आणि त्यांचा वापर केला पाहिजे, असे नितेश राणे म्हणाले. हा मार्ग प्रवासी वाहतुकीसाठी तसेच मालवाहतुकीसाठी वापरता येतो. नवी मुंबई, ठाणे सारखी शहरे जलमार्गाने मुंबईशी जोडणे सोपे आहे. यासाठी चांगले नियोजन आणि इच्छाशक्तीची आवश्यकता आहे. राज्य सरकार यासाठी प्रयत्न करत आहे असेही त्यांनी नमूद केलं.

Follow Us
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच...
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच....
सरकार गुंडागर्दी करून घर पाडू शकते, पुन्हा घर बांधण्याची ताकद.....
सरकार गुंडागर्दी करून घर पाडू शकते, पुन्हा घर बांधण्याची ताकद......
अवघ्या 38 व्या वर्षी अखिलेश यादव यांच्या लहान भावाचं दुःखद निधन...
अवघ्या 38 व्या वर्षी अखिलेश यादव यांच्या लहान भावाचं दुःखद निधन....