AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weather Update : पालघरला रेड ॲलर्ट, मुंबईसह कोकण ते उत्तर महाराष्ट्रात मुसळधार, IMD कडून नवा अंदाज जारी

पालघर, ठाणे, नवी मुंबई, मुंबई, रायगड, नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक येथे येत्या 24 तासात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

Weather Update : पालघरला रेड ॲलर्ट, मुंबईसह कोकण ते उत्तर महाराष्ट्रात मुसळधार, IMD कडून नवा अंदाज जारी
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Aug 31, 2021 | 5:41 PM
Share

मुंबई: हवामान विभाच्या इशाऱ्यानुसार महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि मुंबईत दमदार पावसानं हजेरी लावली. भारतीय हवामान विभागानं आता नवीन अंदाज जारी केला आहे. पालघर, ठाणे, नवी मुंबई, मुंबई, रायगड, नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक येथे येत्या 24 तासात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तर, पालघर आणि नाशिकमध्ये तीव्र मुसळधारचा पण इशारा आज भारतीय हवामान विभागाने दिला आहे. उद्या पावसाचा जोर जरी कमी असला तरी काही इशारे या भागात आहेत.

पालघर जिल्ह्याला रेड अ‌ॅलर्ट

भारतीय हवामान विभागांनं पालघर जिल्ह्याला रेड अ‌ॅलर्ट दिला आहे. ठाणे, नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्याला ऑरेंज अ‌ॅलर्ट दिला आहे. आज रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, पुणे ,औरंगाबाद, अहमदगर, जालना, परभणी, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली अमरावती आणि नागपूर जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आलाय.

1 सप्टेंबरला राज्यात पालघरला ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आला असून मुंबई, ठाणे, रायगड, नाशिक आणि नंदूरबार जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

पाहा व्हिडीओ

नागपूर जिल्ह्यात वीज पडून गुराखी व 5 बकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. हिंगणा तालुक्यातील रायपूर शिवारात घटना घडली. दलसिंह भाऊ राठोड़ असे मृत व्यक्तीचं नाव आहे. ते नेहमीप्रमाणे रायपूर शिवारात नाग नदीच्या काठावर बकऱ्या चरायला घेऊन गेले होते. पाऊस व विजेचा कडकडाट सुरूच होता,त्या परिसरात वीज पडली ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. दलसिंह राठोड़ रात्री उशिरा पर्यंत घरी न आल्याने त्यांचा शोध घेतला असता मृतदेह आढळून आला आहे.

गडचिरोलीत मुसळधार पाऊस

गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात सोमवार सांयकांळ पासून मुसळधार पाऊस सुरू झाला. गडचिरोली चामोर्शी आष्टी महामार्ग चामोशी हून गोविंदगाव गावापासून बंद झालेला आहे. या राष्ट्रीय महामार्गावर कच्चा रस्ता तयार करण्यात आला होता. त्या रस्त्यावर दीड ते दोन फूट पाणी वाहत असल्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर जड वाहनांची परवानगी बंद करण्यात आली. या महामार्गावर वाहतूक सध्या बंद आहे.

संबंधित बातम्या:

Weather Update : महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज, हवामान विभागाकडून जिल्ह्यांची यादी जारी

Weather Update today : राज्यात येत्या पाच दिवसात अतिमुसळधार पावसाचा अंदाज, मुंबईत पाऊस सुरु

Weather Update today IMD predicts heavy rainfall at Kokan and North Maharashtra issue red alert to Palghar

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.