AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बलसागर भारत होवोः सुवर्ण महोत्सवी मशालचे नाशिकमध्ये जंगी स्वागत!

देशभरात स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त जंगी कार्यक्रम सुरू आहेत. यानिमित्त निघालेल्या विजयी मशालचे नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलमध्ये गुरुवारी भव्य स्वागत करण्यात आले.

बलसागर भारत होवोः सुवर्ण महोत्सवी मशालचे नाशिकमध्ये जंगी स्वागत!
नाशिकमध्ये सुवर्णमहोत्सवी विजय मशालचे जोरदार स्वागत करण्यात आले.
| Edited By: मनोज कुलकर्णी | Updated on: Nov 04, 2021 | 11:42 AM
Share

नाशिकः देशभरात स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त जंगी कार्यक्रम सुरू आहेत. यानिमित्त निघालेल्या विजयी मशालचे नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलमध्ये गुरुवारी भव्य स्वागत करण्यात आले.

डिसेंबर 1971 मध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानला धूळ चारली. या विजयाला 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल देशभरात स्वर्णिम विजय वर्ष साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने नाशिक येथील तोफखाना केंद्रात येत्या नऊ तारखेपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात 1 नोव्हेंबर रोजी तोफखाना केंद्र ते पांडवलेणी पर्यंत सायकल रॅली काढण्यात आली. 2 नोव्हेंबर रोजी ओझर एअरफोर्स रॅली काढली. आज गुरुवारी 4 नोव्हेंबर रोजी भोसला स्कूलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या विजयी मशालचे भोसला मिलिटरी स्कूलमध्ये भव्य स्वागत करण्यात आले. भोसला मिलिटरी स्कूलमधील विद्यार्थ्यांनी संचलन करत विजयी मशालीला मानवंदना दिली. यावेळी ए. बी. बी. सर्कल, भोसला भवन, टी. ए. कुलकर्णी सर्कल, कॉलेज रोड असे संचलन करत गंगापूररोडवरील शहीद स्मारक चौकात नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी मानवंदना दिली. दरम्यान, उद्या 5 नोव्हेंबर रोजी पोलीस अकॅडमीत कार्यक्रम होईल, तर 6 नोव्हेंबर रोजी योद्ध्यांचा गौरव केला जाणार आहे. 8 नोव्हेंबर रोजी आर्टिलरी म्युझियम येथे सांस्कृतिक कार्यक्रम, तर 9 नोव्हेंबर रोजी विजयी मशाल नाशिकहून महूकडे रवाना होणार आहे.

ऑगस्ट 2023 पर्यंत कार्यक्रम

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित होणाऱ्या विविध शासकीय कार्यक्रमांच्या तसेच शासनाच्या द्विवर्षपूर्ती निमित्ताने विभागीय आणि जिल्हास्तरावरून प्रसिद्धीचे व्यापक नियोजन करण्याच्या सूचना माहिती व जनसंपर्कचे सचिव तथा महांसचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी दिल्या आहेत. डॉ. दिलीप पांढरेपट्टे म्हणाले, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सावाच्या निमित्ताने आपल्या जिल्ह्यात होणाऱ्या विविध शासकीय कार्यक्रमांना व्यापक प्रसिद्धी द्यावी. जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांवर लेख लिहिणे, स्वातंत्र्य सैनिकांच्या कामगिरीवर आधारित पुस्तिका अथवा कॉफीटेबल बुक तयार करण्याबाबत जिल्हा प्रशासनासोबत चर्चा करण्यात यावी, जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मारकांबाबत लेख लिहून प्रसिद्धी देताना जिल्हा स्वातंत्र्य सैनिक संघटनांचे सहकार्य घ्यावे. जिल्ह्यात स्वातंत्र्य संग्रामाशी निगडीत काही घटना, आंदोलने, मेळावे अथवा लढे उभारले असतील त्याविषयीचा इतिहास जाणून घेवून त्याबाबत देखील लेखांना व्यापक प्रमाणात प्रसिद्धी देण्याचे नियोजन ऑगस्ट 2023 पर्यंत करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. (Welcome to Golden Jubilee Vijay Mashal in Nashik)

इतर बातम्याः

दिवाळीच्या मुहूर्तावर मोठा दिलासा; गोडतेल लिटरमागे 7 रुपयांनी स्वस्त

दिवाळीनंतर नाशिकमध्ये पाडापाडी; सोमवारपासून अतिक्रमणांवर महापालिकेचे बुलडोझर!

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली