AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गावकऱ्यांनी गाव विकायला काढलं होतं, प्रशासकीय अधिकारी थेट गावात पोहचले, नंतर काय घडलं ?

नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील गावकऱ्यांनी अजब निर्णय घेत सरकारचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर आता प्रशासनाने दखल घेतली असून गावकऱ्यांनी गावकऱ्यांची भेट घेतली आहे.

गावकऱ्यांनी गाव विकायला काढलं होतं, प्रशासकीय अधिकारी थेट गावात पोहचले, नंतर काय घडलं ?
Image Credit source: Google
| Updated on: Mar 08, 2023 | 4:55 PM
Share

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील फुलेमाळवाडी ( Fule Malwadi ) या गावातील गावकऱ्यांनी गावच विकायला काढलं होतं. त्यावरून थेट गावात प्रशासकीय अधिकाऱ्यानी धाव घेत गाव विकण्यामागील कारण जाणून घेतलं आहे. त्यामध्ये गावकऱ्यांनी केलेला प्रस्तावाच नायब तहसीलदार ( Tahsildar Deola ) यांच्या हातात ठेवत गावकऱ्यांनी गाऱ्हाणे मांडले आहे. संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले होते. शेतकऱ्यांची थट्टा केली जात असून ही थट्टा थांबवा, आमचा निरोप सरकार पर्यन्त पोहचवा अशी मागणी करत गावकऱ्यांनी निवेदन दिले आहे.

देवळा तालुक्यातील फुले माळवाडी येथील गावकऱ्यांनी शेतीमालाला भाव मिळत नाही म्हणून आक्रमक झाले होते. त्यावरून गावकऱ्यांनी एकत्र येऊन थेट गाव विकण्याचा प्रस्ताव तयार करत सरकारचे लक्ष वेधून घेतले होते.

संपूर्ण राज्यात फुले माळवाडी येथील गावकऱ्यांनी घेतलेल्या अजब निर्णयाची चर्चा झाली असून गावकऱ्यांनी यावेळेला त्यांच्या व्यथा मांडल्या आहे. गेल्या काही वर्षांपासून कांदा पीकासह भाजीपाल्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक झाले होते.

फुलेमाळवाडी हे गाव जवळपास 95 टक्के शेती व्यवसाय करणारे आहे. त्यामुळे शेतकरी असलेल्या गावकऱ्यांनी संताप व्यक्त करून निदर्शने व्यक्त करून सरकार लक्ष देत नसल्याने आक्रमक भूमिका घेतली आहे.

संपूर्ण गाव विकून त्यातून येणाऱ्या पैशावर जीवन जगू असे म्हणत गावकऱ्यांनी हाती घेतलेल्या धोरणापुढे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला होता. यावेळी एकमताने गावकऱ्यांनी प्रस्ताव करण्यास संमती दर्शवली होती.

त्यानंतर संपूर्ण राज्यात या फुलेमाळीवाडी गाव विकण्याची चर्चा असल्याने प्रशासकीय अधिकारींनी गावाकडे धाव घेलती. यावेळी नायब तहसीलदार यांच्यासह काही महसूल विभागातील कर्मचारी गावात पोहचले होते.

प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यावेळेला संपूर्ण गावकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले होते. त्यानंतर तुमच्या भावना शासणाकडे पोहचू असे सांगत निवेदन स्वीकारले होते. त्यामुळे शासकीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे.

एकूणच प्रशासकीय पातळीवर गावकऱ्यांच्या भूमिकेची दखल घेण्यात आली असली तरी दुसरीकडे मूळ मागणीवर अंमलबजावणी होते का ? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. शेतीमाला योग्य भाव द्या ही प्रमुख मागणी गावकऱ्यांची आहे.

नुकतेच नाशिक जिल्ह्यातील शेती मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कांदा, गहू, हरभरा आणि द्राक्ष बागा यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून भरपाईची मागणी केली जात आहे. त्यात अद्यापही पंचनामे सुरू न झाल्याने शेतकरी नाराज आहे.

Follow Us
हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष
हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष.
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार.
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले....
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले.....
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत.
त्यामागे अदृश्य शक्ती? शंभुराज देसाई हल्ला प्रकरणी सुळेंचा मोठा दावा
त्यामागे अदृश्य शक्ती? शंभुराज देसाई हल्ला प्रकरणी सुळेंचा मोठा दावा.
जागतिक संकटांमध्येही भारत ठरतोय आशेचा किरण – रामू राव जुपल्ली
जागतिक संकटांमध्येही भारत ठरतोय आशेचा किरण – रामू राव जुपल्ली.
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी.
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले.
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने.
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण..
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण...