AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गावकऱ्यांनी गावच विकायला काढलं, कारण ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल, जाणून घ्या

नाशिक जिल्ह्यातील फुलेमाळवाडी येथील ग्रामस्थांनी गाव विकायला काढले आहे. गाव विकून आलेल्या पैशात सुखाने जीवन जगण्याचा त्यांनी निर्धार केला आहे.

गावकऱ्यांनी गावच विकायला काढलं, कारण ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल, जाणून घ्या
Image Credit source: Google
Kiran Balasaheb Tajne
Kiran Balasaheb Tajne | Updated on: Mar 07, 2023 | 7:40 AM
Share

नाशिक : नाशिकच्या देवळा तालुक्यातील फुलेमालवाडी ( Fulemalwadi ) गावचं गावकऱ्यांनी विकायला काढले आहे. गावकऱ्यांनी एकत्र येत याबाबत ठराव देखील केला आहे. शासनाकडे याबाबत गाव विकण्याबाबतचा ( Village Sell )  ठराव पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात या गावच्या निर्णयाची चर्चा होऊ लागली आहे. गावच्या या निर्णयामुळे शासकीय यंत्रणेसह लोकप्रतिनिधींची मोठी अडचण झाली आहे. मात्र, गावकऱ्यांवर गाव विकण्याची वेळ आली तरी का ? असा सवाल उपस्थित केला जात असतांना आश्चर्य वाटणारी ही बाब आहे. कुठल्याच शेतमालाला भाव मिळत नसल्याने वैतागलेल्या शेतकऱ्यांनी थेट शासनालाक गाव विकण्याचा निर्णय घेतला आहे.

खरंतर काही दिवसांपूर्वी गावात कुठल्याही सुविधा नाही म्हणून कर्नाटक आणि गुजरात मध्ये जाण्याचा काही गावकऱ्यांनी निर्धार केला होता. ग्रामपंचायतीचा ठरावही गावकऱ्यांनी करून शासनाकडे सुपूर्द केला. त्यामुळे संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरला होता.

आता पुन्हा असाच काहीसा पवित्रा नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील फुलेमाळवाडी गावाने निर्णय घेतला आहे. यामध्ये शासनाला ठराव करून गाव विकण्याचा प्रस्ताव पाठविला जाणार आहे. एकूणच यामुळे फुलेमाळवाडी गाव चर्चेत आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून शेतमालाला कवडीमोल भाव मिळत आहे. उत्पादन खर्चही निघत नसल्याने गावकरी हतबल झाले आहे. गावकरी टोकाचे पाऊल उचलण्याच्या तयारीत असतांना थेट सरकारलाच इशारा देण्यासाठी गावकऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे.

गावातील शेतकरी कांदा, गहू, हरभरा यांसह भाजीपाला आणि नगदी पीक घेत आहे. गेल्या काही वर्षांपासून कुठल्याही पिकाला योग्य दर मिळत नाही. त्यामुळे शेतकरी वर्गासह संपूर्ण गावात प्रचंट असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे अनोख्या पद्धतीने गावकऱ्यांनी सरकारपर्यन्त निषेध नोंदविण्याचे काम केले आहे.

फुलेमाळवाडी गावात साधारणपणे 534 हेक्टर क्षेत्र आहे. संपूर्ण गाव शेती व्यवसाय करते. त्यामुळे मुलांचे शिक्षण, आरोग्य आणि दैनंदिन गरजाही पूर्ण करणे कठीण झाले आहे. त्यात शेतीला लागणारे भांडवल उभे कसे करायचे असा प्रश्न निर्माण झाल्याने गावकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे.

सरकार शेतकाऱ्यांपेक्षा ग्राहक हिताला महत्व देत असल्याचा आरोप गावकरी करीत आहे. आणि त्याच कारणामुळे मेटाकुटीला आलेला शेतकरी आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलतो. त्यामुळे गाव विकून त्यातील पैशाने आम्हाला जगता येईल असा निर्णय घेत गावकऱ्यांनी गाव विकण्याचा निर्णय घेतला आहे.

गावातील शेतकरी प्रवीण बागूल, अमोल बागूळ, राकेश सोनवणे, अविनाश बागूळ आणि अक्षय शेवाळे यांनी पुढाकार घेतला होता. गावातील सभामंडपात यावेळी सर्व ग्रामस्थ एकत्रित जमले होते. चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला असून त्याबाबतचा ठराव करण्यात आला आहे.

Follow Us
खरातवरील महाराष्ट्र एपस्टीन फाईल्समध्ये अनेक नेत्यांची व्यक्तिरेखा,
खरातवरील महाराष्ट्र एपस्टीन फाईल्समध्ये अनेक नेत्यांची व्यक्तिरेखा, शिंदे, चाकणकर अन्..
उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, नेमकं काय घडलं? थेट व्हिडीओ आ
उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, नेमकं काय घडलं? थेट व्हिडीओ आला समोर
विलास घुले प्रकरणात हे काय घडलं? 'पुरावे मिटवण्यासाठी 10 व्या आरोपीला
विलास घुले प्रकरणात हे काय घडलं? 'पुरावे मिटवण्यासाठी 10 व्या आरोपीला... बड्या नेत्याच्या दाव्याने राजकारणात खळबळ
प्रवाशांचा श्वास घुसमटला; तब्बल 20 मिनिटे... कोकण स्पेशल मांडवी एक्सप्
मोठी बातमी! प्रवाशांचा श्वास गुदमरला; तब्बल 20 मिनिटे... कोकण स्पेशल मांडवी एक्सप्रेस
ओमराजेंच्या निकवर्तीय नेत्याचं धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सभेआधीच मोठं
Omraje Nimbaklar | ओमराजेंच्या निकवर्तीय नेत्याने धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सभेआधीच केलं मोठं विधान, पुन्हा...
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री
CM Devendra Fadnavis | केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री कुटुंबीयांच्या भेटीला
लवकरच ठाकरे गटात मोठी चलबिचल दिसेल, त्यांचे आमदार शिंदेंकडे कैफियत...
लवकरच ठाकरे गटात मोठी चलबिचल दिसेल, त्यांचे आमदार शिंदेंकडे कैफियत... बड्या नेत्याने एक एक करत सगळंच सांगितलं
एकच खळबळ! सियानं लग्नासाठी नकार दिला होता? प्रकरणात आणखी एकाची एन्ट्री
खळबळ! सियानं लग्नासाठी नकार दिला होता? प्रकरणात आणखी एकाची एन्ट्री; त्याला सगळंच... डोकं चक्रावणारा खुलासा
भाजपमध्ये हे काय घडतंय? मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या कार्यक्रमातच दोन
भाजपमध्ये हे काय घडतंय? मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या कार्यक्रमातच दोन नेत्यांमध्ये रुसवारुसवी... कारण अत्यंत चकित करणार
शिवसेना मोठ्या तयारीत? उदय सामंतांकडून वडेट्टीवारांना पक्षप्रवेशाची
शिवसेना मोठ्या तयारीत? उदय सामंतांकडून वडेट्टीवारांना पक्षप्रवेशाची ऑफर?