AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…आता अवकाळी पावसानं सगळं पीकच मातीत घातलं; गहू, हरभरा, कांदा, मूग सगळं पीकच पाण्यात

इगतपुरी परिसरात सकाळ पासूनच वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत होता. संध्याकाळी आठ वाजल्यानंतर आकाशात विजा चमकत होते.

...आता अवकाळी पावसानं सगळं पीकच मातीत घातलं; गहू, हरभरा, कांदा, मूग सगळं पीकच पाण्यात
| Edited By: | Updated on: Mar 06, 2023 | 5:08 PM
Share

इगतपुरीः राज्यातील शेतकरी सध्या प्रचंड संकटात सापडला आहे. एकीकडे पिकवलेल्या शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही तर दुसरीकडे निसर्गाने रुद्रावतार दाखवत अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची दाणादाण उडवली आहे. इगतपुरी तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची रब्बी हंगामातील पीकं सगळी पाण्यात गेली आहेत. त्यामुळे एकीकडे बाजारभावामुळं शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटली आहे तर दुसरीकडे अवकाळी पावसानं हातातोंडाशी आलेला घासही निघून गेला आहे. त्यामुळे शेतकरी आता आर्थिक संकटात सापडला आहे.

त्यामुळेच आमदार छगन भुजबळ यांनीही अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

इगतपुरी तालुक्यात मध्यरात्री जोरदार सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह अवकाळी आणि त्याच बरोबर गारांच्या माऱ्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना जोरदार फटका बसला आहे.

रब्बी हंगामातील गहू,मूग, हरभऱ्यासह उन्हाळी कांद्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. अशा प्रकारे निसर्गामुळे एकीकडे नुकसान झाले आहे तर दुसरीकडे बाजारभाव गडगडल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

शेतात काढणी करुन पोळ लावून ठेवलेला हरभरा, काढणीसाठी आलेला गहू, मूग,कांदा पीक अवकाळी पावसात आणि गारांच्या माऱ्यामुळे हातातोंडाशी आलेली पिकं मातीत गेली आहेत.

यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. काही ठिकाणी अजूनही शेतात पाणी साचले असून आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना अवकाळीचा तडाखा बसल्याने निसर्गाने सगळी पीक हिरावून घेतली आहेत.यामुळं आता बळीराजा हवालदिल झाला आहे.

इगतपुरी परिसरात सकाळ पासूनच वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत होता. संध्याकाळी आठ वाजल्यानंतर आकाशात विजा चमकत होते.

तर या मध्यरात्रीच्या सुमारास अचानक मेघगर्जनेसह जोरदार सोसाट्याचा वारा सुटला आणि अवकाळी पाऊस आणि गारांचा मारा सुरु झाला.

मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील अस्वली स्टेशन, बेलगाव कुऱ्हे,नांदुरवैद्य, कुऱ्हेगाव,गोंदे दुमाला, मुंढेगाव परिसराला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे.

मध्यरात्रीच्या सुमारास आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.मात्र काढणीसाठी आलेल्या गहू,हरभरा,कांदा, मूग पिकांसह चाऱ्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.