AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“शेतकऱ्यांच्या आयुष्याची होळी व्हायला आली”; राष्ट्रवादीच्या आमदाराने बळीराजाची दुःखं सरकारला सांगितली

ताबडतोब पंचनामे करून त्यांची माहिती सरकारकडे जिल्हाधिकाऱ्यांनी पाठवली पाहिजे असंही छगन भुजबळ यांनी सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांची चारीबाजूनी कोंडी झाल्याने शेतकऱ्यांच्या आयुष्याचीच होळी व्हायला आली आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.

शेतकऱ्यांच्या आयुष्याची होळी व्हायला आली; राष्ट्रवादीच्या आमदाराने बळीराजाची दुःखं सरकारला सांगितली
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Mar 06, 2023 | 3:49 PM
Share

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून शेतकरी वेगवेगळ्या कारणामुळे संकटात सापडला आहे. त्यातच झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.काल सटाणा भागात पाऊस झाल्यामुळेही शेतीचे नुकसान झाले तर शहर परिसरातही झालेल्या पावसामुळे नागरिकांना त्याचा फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे द्राक्ष, गहू, हरभरा या पिकांचे मोठं नुकसान झाले आहे. एकीकडे अवकाळी पावसामुळे शेतकरी बेजार झाला आहे तर दुसरीकडे बाजारभावामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

त्यामुळे बिचाऱ्या शेतकऱ्यांनी करावं तरी काय ? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे.

सध्याच्या काळात शेतकरी चहूबाजूंनी अडचणीत सापडला आहे.एकीकडे अवकाळी पावसाचे संकट, तर दुसरीकडे आलेल्या पिकाला योग्य बाजारभाव मिळत नाही.

त्यामुळे अशा परिस्थितीत फक्त सरकारच शेतकऱ्यांना मदत करू शकते. 10 लाख कोटी रुपये उद्योगपतींना जर सरकार माफ करत असेल तर या शेतकऱ्यांकडेदेखील सरकारने लक्ष दिले पाहिजे असं स्पष्ट मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.

त्यामुळे सरकारने पहिल्यांदा शेतकऱ्यांना महत्व दिले पाहिजे असंही त्यांनी यावेळी सांगितले. शेतकरी संकटात सापडले असले तरी पीक विमावाले शेतकऱ्यांना कोणतीही मदत करत नाही. शब्दच्छंल करून शेतकऱ्यांना विम्याचे संरक्षण देण्यात येत नाही.

तर त्यामुळे ताबडतोब पंचनामे करून त्यांची माहिती सरकारकडे जिल्हाधिकाऱ्यांनी पाठवली पाहिजे असंही छगन भुजबळ यांनी सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांची चारीबाजूनी कोंडी झाल्याने शेतकऱ्यांच्या आयुष्याचीच होळी व्हायला आली आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.

त्र्यंबकेश्वर महिलेच्या प्रसूतीचे प्रकरण ताजे असल्यामुळे त्याच्यावरही छगन भुजबळ यांनी निशाणा साधला. त्याबाबतीत आपण जिल्हाधिकाऱ्यांबरोबर बोललो असून फक्त अत्याधुनिकतेचे दवाखाने फक्त मुंबईत काढून चालणार नाही तर ग्रामीण भागात पण चांगले दवाखाने आणि तज्ज्ञ डॉक्टर आले पाहिजे असंही त्यांनी सरकारला बोलून दाखवले आहे.

Follow Us
खरातवरील महाराष्ट्र एपस्टीन फाईल्समध्ये अनेक नेत्यांची व्यक्तिरेखा,
खरातवरील महाराष्ट्र एपस्टीन फाईल्समध्ये अनेक नेत्यांची व्यक्तिरेखा, शिंदे, चाकणकर अन्..
उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, नेमकं काय घडलं? थेट व्हिडीओ आ
उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, नेमकं काय घडलं? थेट व्हिडीओ आला समोर
विलास घुले प्रकरणात हे काय घडलं? 'पुरावे मिटवण्यासाठी 10 व्या आरोपीला
विलास घुले प्रकरणात हे काय घडलं? 'पुरावे मिटवण्यासाठी 10 व्या आरोपीला... बड्या नेत्याच्या दाव्याने राजकारणात खळबळ
प्रवाशांचा श्वास घुसमटला; तब्बल 20 मिनिटे... कोकण स्पेशल मांडवी एक्सप्
मोठी बातमी! प्रवाशांचा श्वास गुदमरला; तब्बल 20 मिनिटे... कोकण स्पेशल मांडवी एक्सप्रेस
ओमराजेंच्या निकवर्तीय नेत्याचं धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सभेआधीच मोठं
Omraje Nimbaklar | ओमराजेंच्या निकवर्तीय नेत्याने धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सभेआधीच केलं मोठं विधान, पुन्हा...
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री
CM Devendra Fadnavis | केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री कुटुंबीयांच्या भेटीला
लवकरच ठाकरे गटात मोठी चलबिचल दिसेल, त्यांचे आमदार शिंदेंकडे कैफियत...
लवकरच ठाकरे गटात मोठी चलबिचल दिसेल, त्यांचे आमदार शिंदेंकडे कैफियत... बड्या नेत्याने एक एक करत सगळंच सांगितलं
एकच खळबळ! सियानं लग्नासाठी नकार दिला होता? प्रकरणात आणखी एकाची एन्ट्री
खळबळ! सियानं लग्नासाठी नकार दिला होता? प्रकरणात आणखी एकाची एन्ट्री; त्याला सगळंच... डोकं चक्रावणारा खुलासा
भाजपमध्ये हे काय घडतंय? मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या कार्यक्रमातच दोन
भाजपमध्ये हे काय घडतंय? मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या कार्यक्रमातच दोन नेत्यांमध्ये रुसवारुसवी... कारण अत्यंत चकित करणार
शिवसेना मोठ्या तयारीत? उदय सामंतांकडून वडेट्टीवारांना पक्षप्रवेशाची
शिवसेना मोठ्या तयारीत? उदय सामंतांकडून वडेट्टीवारांना पक्षप्रवेशाची ऑफर?