शिवसेना, पक्ष अन् चिन्हाचा निकाल कधी लागणार? असीम सरोदेंची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

आज सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचं? यावर सुनावणी पार पडली. यावर आता ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

शिवसेना, पक्ष अन् चिन्हाचा निकाल कधी लागणार? असीम सरोदेंची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
Asim Sarode
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 06, 2026 | 5:54 PM

बुधवारी शिवसेना पक्षाचं चिन्ह आणि नाव यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली होती. यावेळी शिवसेना ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. दरम्यान त्यानंतर आज देखील सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. आज देखील शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. यावर आता ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

नेमकं काय म्हणाले सरोदे? 

धनुष्यबाण चिन्हावर सुनावणी झाली आहे. राजकीय पक्ष श्रेष्ठ आहे, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.  तीन न्यायाधीशांनी स्पष्ट केलं की राजकीय पक्षाला डावललं जाऊ शकतं नाही. निवडून आलेल्या सदस्यांना मत मांडण्यासाठी संधी असावी. उद्धव ठाकरे यांच्याकडून आक्षेप आहे की पक्ष आणि चिन्ह याबबतीत मर्यादा ओलंडली आहे.  भारतीय जनता पक्षाच्या सांगण्यानुसार ही बाब झालीये असं माझं मत आहे. बहुमताच्या जीवावर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला सूट देण्यात आली हे चूक आहे. राज्यपाल यांनी दिलेला निर्णय चुकीचा आहे, असं यावेळी सरोदे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान ते पुढे बोलताना म्हणाले की, पुढच्या सुनावणीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला बाजू मांडण्याची संधी मिळेल, मात्र आम्हाला देखील मतं मांडण्यासाठी संधी मिळेल. आम्हाला अपेक्षा आहे की आमच्या बाजूने निर्णय लागेल, लोकशाही संविधानिक मार्गाने टिकण्यासाठी निर्णय लागणे गरजेचे आहे. राजकीय आणि विधिमंडळ ही बाब वेगळी आहे.  राजकीय पक्षाला डावलून विधिमंडळ पक्षाला महत्त्व देता येणार नाही, कारण राजकीय पक्ष हा कायमस्वरूपी असतो. तर विधिमंडळ पक्ष हा पाच वर्षासाठी असतो. चिन्ह आणि पक्ष यांचा निर्णय एक वर्षात लागू शकतो, असं सरोदे यांनी म्हटलं आहे.

मुळात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने सिब्बल हे युक्तिवाद करत आहेत. त्यांचा युक्तिवाद ताकदीचा आहे. सत्य कायमच शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाबरोबर राहील.  राजकीय पक्षावर वर्चस्व कोणाचं आहे हे महत्त्वाचे ठरते. केवळ निवडून आलेल्या आमदारांना पक्ष बहाल करण हे बरोबर नाही, असंही यावेळी सरोदे यांनी म्हटलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us