मनोज जरांगे पाटलांना भेटलेली ती व्यक्ती कोण? भेटीनंतर सूत्रं फिरले, बड्या नेत्याच्या गौप्यस्फोटाने मोठी खळबळ

मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलनाची हाक दिली आहे. ते येत्या 30 मे पासून उपोषणाला बसणार आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर राज्यातील बड्या नेत्यानं मोठा गौप्यस्फोट केला आहे.

मनोज जरांगे पाटलांना भेटलेली ती व्यक्ती कोण? भेटीनंतर सूत्रं फिरले, बड्या नेत्याच्या गौप्यस्फोटाने मोठी खळबळ
manoj jarange patil
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 16, 2026 | 4:08 PM

मोठी बातमी समोर येत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. ते येत्या 30 मे पासून आंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर त्यांनी आज बैठक बोलावली होती, या बैठकीमध्ये त्यांनी आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आता मराठा आरक्षणाचा प्रश्न तापण्याची शक्यता आहे.

मराठा समाजाला सरसकट कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळावं, त्यांचा समावेश हा ओबीसी प्रवर्गात व्हावा, हैदराबाद गॅझेटचा निर्णय पूर्णपणे आमलात आणावा, मराठा आंदोलकांवरील गुन्हे सरसकट मागे घेण्यात यावेत, या मागण्या सरकारने 29 मे पर्यंत पूर्ण कराव्यात असं मनोज जरांगे पाटील यांनी या बैठकीमध्ये म्हटलं आहे. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची तारीख जाहीर करताच आता त्यावर समिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या घोषणेवर प्रतिक्रिया देताना भाजप नेते प्रसाद लाड यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. जरांगे पाटील यांची कुणीतरी भेट घेतली आणि त्यानंतर त्यांनी उपोषणाचा इशारा दिला, असा गौप्यस्फोट प्रसाद लाड यांनी केला आहे. दरम्यान प्रसाद लाड यांच्या या गौप्यस्फोटामुळे मनोज जरांगे पाटील यांना भेटलेली ती व्यक्ती नेमकी कोण? अशा चर्चेला उधाण आलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत रोष असल्याने त्यांचं नाव घेतलं जात आहे. काळकुटे यांच्याशी बोलणं झालं आहे.  त्यांनी मला सांगावं, त्यांच्या काय समस्या आहेत, त्यावर तोडगा काढला जाईल. एवढे मराठा समाजाचे नेते झाले, मुख्यमंत्री झाले त्यांनी का आरक्षण दिलं नाही? प्रत्येक गोष्ट मनोज दादांच्या मनासारखी होणार नाही, काही गोष्टी सरकारला नियमात बसून कराव्या लागतात, त्यामुळे ऊन्हाळ्याच्या दिवसात मराठा समाजाची हेळसांड होऊ नये, असं प्रसार लाड यांनी म्हटलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us