अर्थसंकल्पामध्ये शिवसेनेला मान मिळणार की भाजप करणार कुरघोडी ? काय ठरलंय ?

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्री विधानसभेत तर अर्थ राज्यमंत्री विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर करतात. मात्र, यावेळी परिस्थिती काही वेगळीच दिसणार आहे.

अर्थसंकल्पामध्ये शिवसेनेला मान मिळणार की भाजप करणार कुरघोडी ? काय ठरलंय ?
BUDGET SESSIONImage Credit source: TV9 NETWORK
Follow us
| Updated on: Feb 24, 2023 | 3:09 PM

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्री विधानसभेत तर अर्थ राज्यमंत्री विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर करतात. मात्र, यावेळी परिस्थिती काही वेगळीच दिसणार आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे – फडणवीस सरकारचे हे पहिलेच अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. 27 फेब्रुवारीपासून सुरू होणारी या अधिवेशनात उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हे 9 तारखेला अर्थसंकल्प सादर करणार आहे. अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा हा पहिला अर्थसंकल्प असणार आहे. जनतेच्या मनातील अर्थसंकल्प असावा यासाठी त्यांनी जनतेकडून सूचना मागविल्या आहेत. त्यानुसार हा अर्थसंकल्प असणार आहे, असे भाजपच्यावतीने सांगण्यात येत आहे.

केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाचे प्रतिबिंब फडणवीस यांच्या अर्थसंकल्पातून दिसेल. मात्र, विधान परिषद सभागृहात अर्थसंकल्प कोण सादर करणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. शिंदे – फडणवीस सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य १९ मंत्री यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार अशी अनेकदा चर्चा रंगली. पण, ठाकरे – शिंदे गटाच्या न्यायालयात सुरु असलेल्या याचिकेवर निर्णय येईपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार न करण्याची भूमिका सरकारने घेतली आहे.

हे सुद्धा वाचा

विधिमंडळात विधानसभेत अर्थमंत्री तर विधान परिषदेत अर्थ राज्यमंत्री अर्थसंकल्प सादर करत असतात. मात्र, राज्य मंत्रिमंडळात विद्यमान परिस्थितीत एकही राज्यमंत्री नसल्यामुळे विधान परिषदेत अर्थसंकल्प कोण मांडणार याची चर्चा सुरु झाली आहे. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये अर्थसंकल्प सादर करण्यासाठी मंत्र्यांचे नाव प्राधिकृत करावे लागते.

विधानसभेसाठी अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव प्राधिकृत करण्यात आले आहे. मात्र, विधान परिषदेसाठी अर्थसंकल्प सादर करण्यासाठी विद्यमान मंत्र्यांपैकी कुणाचे नाव प्राधिकृत करावे यावर चर्चा करण्यात येत आहे. भाजप – शिवसेना युती काळात भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थमंत्री तर दीपक केसरकर यांनी राज्य अर्थमंत्री म्हणून पदभार सांभाळलेला आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात अजित पवार अर्थमंत्री आणि शिवसेनेचे शंभूराज देसाई यांनी अर्थ राज्यमंत्री होते. आता सत्ताबदल झाल्यानंतर दीपक केसरकर आणि शंभूराज देसाई यांनी एकनाथ शिंदे गटात सामील होत कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आहे.

शिंदे फडणवीस सरकारमध्ये भाजपचे सुधीर मुनगंटीवार आणि शिवसेनेचे दीपक केसरकर, शंभूराज देसाई हे अनुभवी आहेत. त्यामुळे या तिन्ही मंत्र्यांपैकी एका मंत्र्यांचे नाव विधान परिषदेसाठी अर्थसंकल्प सादर करण्यासाठी प्राधिकृत करावे लागणार आहे. मात्र, नेमके कुणाचे नाव प्राधिकृत करावे याबाबत अद्याप सरकारचा निर्णय झालेला नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

यानिमित्ताने विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर करण्याचा मान शिवसेनेच्या मंत्र्यांना मिळणार की सुधीर मुनगंटीवार यांचे नाव प्राधिकृत करून भाजप शिवसेनेवर कुरघोडी करणार अशीही आणखी एक चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.