AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video – Maha Infra Conclave टाटांच्या पुढाकाराने 1.75 हजार लोकांना रोजगार देणारं संकूल नवी मुंबईत उभं राहणार, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची माहिती

नवी मुंबईत आयटी पार्क उभारण्यात येत आहे. टाटा आणि अॅक्टिस कंपनीनं यासाठी सहकार्य करार केलाय. यामधून एक लाख 75 हजार रोजगार निर्मिती होईल, असं उद्योगमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी सांगितलं. टीव्ही 9 मराठीच्या महा-इन्फा कॉन्क्लेव्हमध्ये देसाई बोलत होते.

Video - Maha Infra Conclave टाटांच्या पुढाकाराने 1.75 हजार लोकांना रोजगार देणारं संकूल नवी मुंबईत उभं राहणार, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची माहिती
टीव्ही 9 मराठीच्या महा-इन्फा कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना उद्योगमंत्री सुभाष देसाई.
| Updated on: Feb 22, 2022 | 2:14 PM
Share

मुंबई : 2025 मध्ये महाराष्ट्र हा संपन्न आणि समृद्ध असेल. गेल्या दोन वर्षांमध्ये आम्ही बरेच प्रयत्न केलेत. त्याची फळ येत्या काही दिवसांत महाराष्ट्राला मिळतील. टीव्ही 9 मराठीच्या महा-इन्फा कॉन्क्लेव्हमध्ये उद्योगमंत्री सुभाष देसाई आज बोलत होते. कोरोना काळात काही काळ वाया गेला. पण, सरकार हातावर हात ठेऊन स्वस्थ बसले नाही. महाराष्ट्र थांबला नाही, महाराष्ट्र थांबणार नाही (Maharashtra will not stop ) . या कठीण काळातही आम्ही देशातील तसेच विदेशातील गुंतवणूक आणली. यासंदर्भात करार केले. दोन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात (Investment in Maharashtra) नव्याने येत आहे. हे सगळे प्रकल्प प्रत्यक्षात सुरू होताहेत. हे सर्व काही फक्त कागदावरचे सामंजस्य करार नाहीत. प्रकल्प येणार, ते सुरू होणार, याची खात्री करूनचं या करारांवर सह्या केलेल्या आहेत. त्यामुळं यातून आपले अर्थकारण मजबूत (Economy Strong) होईल. राज्याचा महसूल वाढेल. तीन लाख युवकांना यातून रोजगार मिळेल, असंही देसाई म्हणाले.

गुंतवणूकदारांना पुरविल्या सुविधा

सुभाष देसाई पुढं म्हणाले, बंदर, आंतरराष्ट्रीय विमानतळ किती लांब आहे, हे सार गुंतवणूकदार बघत असतात. रस्त्यांचं जाळ, रेल्वेची सुविधा, या सुविधा असल्यामुळं गुंतवणूकदाराचं मनोधैर्य यामुळं वाढतं. पायाभूत सुविधांचे प्रकल्पांचे वेगाने सुरू आहेत. त्यामुळं गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली. उद्योगांची काही क्षेत्र आधुनिक पद्धतीनं कसे विकसित होतील, हे पाहिलं. औरंगाबाद आणि तळेगावला इलेक्ट्रानिक्सचा औद्योगिक पार्क तयार करत आहोत. कारण केंद्र सरकारला इलेक्ट्रानिक्सच्या क्षेत्रामध्ये जास्तीत-जास्त उद्योजकांचं जाळ विकसित करायचं आहे. पेट्रोल, डिझेलनंतर आपण इलेक्ट्रानिक्सच्या वस्तू आयात करत आहेत. त्यामुळं इलेक्ट्रानिक्सच्या वस्तू निर्माण करायच्या आहेत. काही रसायन चीनमधून आयात करावी लागतात. ते अवलंबित्व कमी करावं आणि आपल्याकडं या वस्तू तयार व्हाव्यात. यासाठी हे पार्क तयार करण्यात येतंय.

औद्योगिकदृष्ट्या फार मोठी झेप

नवी मु्ंबईत देशाचं जेम ज्वेलरी एक्सपोर्ट काउंसिल आहे. याठिकाणी एका कंपनीला एक अॅक्टिस या समूहाला दिला. मोठा भूखंड दिला. त्यांना सर्व सुविधा दिलेल्या आहेत. त्याचं काम आता सुरू झालेलं आहे. त्यामध्ये साधारणपणे दीड लाख कर्मचाऱ्यांना तिथं काम मिळेल. इतकं हे जागतिक दर्जाचं जेम ज्वेलरीचं हे पार्क याठिकाणी विकसित होतंय. याच उद्योगसमूहात टाटा उद्योग समूहानं अॅक्टिस या कंपनीसोबत संयुक्त प्रकल्प योजलेला आहे. नवी मुंबईत इंडस्ट्रीयल मिनरल आणि केमिकलची कंपनी बऱ्याच वर्षांपासून बंद पडली होती. त्यामध्ये मध्यस्ती करून भूखंड काढून घेतला. हा भूखंड आता टाटा समूह आणि अॅक्टिस या कंपनीला दिलाय. त्यामधून मोठा माहिती तंत्रज्ञानावर आधारित आयटी पार्क, डेटा सेंटर, कमर्सीअल काम्प्लेक्स उभारण्यात येतोय. यामधून एक लाख 75 हजार रोजगाराची क्षमता आहे. त्यामुळं औद्योगिकदृष्ट्या फार मोठी झेप रोजगार निर्मितीच्या दृष्टीने होत आहे, असंही सुभाष देसाई यांनी सांगितलं.

VIDEO | नागपूर – मुंबई समृद्धी महामार्ग वर्षभरात होणार सुरू; शेतकऱ्यांच्या घरी कशी आली समृद्धी, कसा आहे प्रकल्प?

Sunil gavaskar: गावस्करांची ‘ती’ भविष्यवाणी खरी ठरली, तर विराट कोहलीचं काय होणार?

किंगखानचा मुलगा आर्यन बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार, पण अभिनय करणार नाही; मग काय करणार?

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.