तिला गावानं भूताळीन म्हंटलं, जगणंही मुश्किल केलं, पण…नंतर जे काही घडलं ते पाहून तिला…

नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील भोरवाडी गावातील अंधश्रद्धेचे भूत उतरले आहे. अंधश्रद्धा निर्मूलत समितीने याबाबत पुढाकार घेतला होता.

तिला गावानं भूताळीन म्हंटलं, जगणंही मुश्किल केलं, पण...नंतर जे काही घडलं ते पाहून तिला...
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Feb 07, 2023 | 4:55 PM

नाशिक : पुरोगामी महाराष्ट्रातील आदिवासी बांधवांच्या (Tribal society) मानगुटीवरील अंधश्रद्धेचे भूत अजूनही खाली उतरलेले नाही. नाशिकच्या इगतपुरी (Nashik Igatpuri News) तालुक्यातील भोरवाडी पाड्यावरील घटनेने हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. एका महिलेला संपूर्ण गावाने भूताळीन (Superstition) असल्याचं ठरवत तीचं जगणं मुश्किल केलं होतं. गावात घडणाऱ्या प्रत्येक दुर्दैवी घटनेला त्या महिलेला जबाबदार धरलं जात होतं. त्यामुळे गावात अंधश्रद्धेचं भूत किती मोठ्या प्रमाणात पसरलं होतं हे समोर आले होते. यातील काही नागरिकांनी घर सोडून स्थलांतरही केलं होतं. यानंतर अंनिसने यामध्ये हस्तक्षेप करत महिलेला न्याय मिळवून दिला आहे.

संपूर्ण महाराष्ट्राला काळिमा फासला जाईल अशीच घटना इगतपुरीच्या भोरवाडी पाड्यावर घडला होता. त्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. त्यानंतर यामध्ये अंनिसने उडी घेतली आहे.

भोरवाडी पाड्यावरील एका महिलेला काही व्यक्तींनी भूताळीण ठरवलं होतं, गावात घडलेल्या घटनांना तिलाच जबाबदार धरलं जात होतं, त्यामुळे तिचे जगणं अक्षरशः जगणं मुश्किल झाले होते.

हे सुद्धा वाचा

त्यानंतर संबंधित महिलेलाही राग आल्याने इतरांना दोष देण्यास सुरू केले होते, त्यावरून गावातील वातावरण चांगलेच गढूळ झाले होते, अंधश्रद्धेबाबत मोठा गैरसमज निर्माण झाला होता.

भुताटकी आणि जादूटोणावरुण भोरवाडीत मोठा गैरसमज आहे. महिलांमध्ये यावरून मोठ्या प्रमाणात भांडणे होत असत. त्यामुळे एका गावात राहणं सुद्धा अवघड झाले होते.

हीच बाब ओळखून अंधश्रद्धा निर्मूलन समितीने थेट भोरवाडी पाडा गाठून सर्व प्रकार जाणून घेतला. त्याआधी मात्र घोटी पोलिसांत विनंती अर्ज दिला आणि सोबत एक पोलीस कर्मचारी गावात आले होते.

गावातील सर्व मंडळींना एकत्र आणण्यात आले होते. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. त्यानंतर अंनिसने प्रबोधन करत अंधश्रद्धा आहे हे पटवून दिले. गावकऱ्यांचे गैरसमजही दूर केले.

अंनिस इथवरच न थांबता महिलेच्या हातचे जेवण केले, तिच्या घरातील पाणीही पिऊन दाखविले. त्यानंतर गावकऱ्यांनी ते कबूल करत महिलेच्या घरातील अन्नही खाल्ले. यापुढे भांडण करणार नाही, एकोप्याने राहू असं आश्वासित केलं.

पुढील काळात कुणाला भुताळीन ठरवणारी नाही, असेही मान्य केले. यावेळी अंनिसने घेतलेली भूमिका गावकऱ्यांना पटली आणि त्यानंतर गावानेही अंधश्रद्धेवरुन वाद होणार नाही याचीही हमी दिली.

अंनिसचे राज्य सचिव डॉ. टी. आर. गोराणे, राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे, नाशिकचे कोमल वर्दे, सचिन महिरे, पोलीस हवालदार बी. आर. जगताप यांनी हा पुढाकार घेतला होता.

Non Stop LIVE Update
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.