मन स्वच्छ ठेऊन 100 विद्यार्थ्यांना परीक्षेबाबत विचारा, मग टीका करा, उदय सामंतांचं भाजपला उत्तर

सर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करता येणार नाहीत, त्या घ्याव्याच लागतील असा निर्णय दिल्यानंतर, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधला.

मन स्वच्छ ठेऊन 100 विद्यार्थ्यांना परीक्षेबाबत विचारा, मग टीका करा, उदय सामंतांचं भाजपला उत्तर
Follow us
| Updated on: Aug 28, 2020 | 2:20 PM

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करता येणार नाहीत, त्या घ्याव्याच लागतील असा निर्णय दिल्यानंतर, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधला. मन स्वच्छ ठेऊन 100 विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भात मत विचारावं, त्यानंतर टीका करावी. स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी युवा सेनेवर टीका केली जाते, असं म्हणत उदय सामंत यांनी भाजप नेत्यांवर निशाणा साधला. (Uday Samant on Supreme court decision)

राज्य सरकारने अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षांबाबत आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन त्या रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. प्रतिज्ञापत्रात आम्ही या परिस्थितीत परीक्षा घेऊ शकत नाही असं कळवले होते. तसेच विद्यार्थ्यांना परीक्षेचा निर्णय घेण्याबाबत ऐच्छिक मुभा द्यावी अशी मागणी केली होती. मात्र तसे करता येणार नाही हे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे, असं उदय सामंत म्हणाले.

परीक्षा न घेण्याचा निर्णय विद्यार्थी आणि पालक यांचा विचार करुन घेतला होता. याबाबत आरोप -प्रत्यारोप करण्यापेक्षा सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन करुन यातून मार्ग काढावा लागेल. निर्णयाचा आदर सर्वांनाच करावा लागेल, असं उदय सामंत यांनी नमूद केलं.

राज्यात प्रत्येक विद्यापीठात जाऊन मी कुलगुरुंशी चर्चा करणार आहे. उपाय-योजनांबाबत चर्चा करणार आहे. महाराष्ट्रभर विद्यापीठांचा दौरा करणार असल्याची माहिती यावेळी सामंत यांनी दिली.

साडे आठ लाख विद्यार्थ्यांच्या भावितव्यासोबतच त्यांच्या आरोग्य आणि जीवनाचा प्रश्न महत्वाचा आहे. परीक्षा न घेण्याबाबत मत असलेल्या इतर राज्यांशी चर्चा करण्याआधी राज्याचे महाधिवक्ता आणि न्याय व विधी विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करु, असं सामंत म्हणाले.

ट्विटच्या माध्यमातून जे टीकाटिप्पणी करत आहेत, त्यांनी भान ठेवावं. 30 सप्टेंबरच्या डेडलाईनबाबत बंधन नाही. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन याबाबत राज्याची भूमिका UGC समोर मांडेन. मन स्वच्छ ठेऊन 100 विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भात मत विचारावं, त्यानंतर टीका करावी. स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी युवा सेनेवर टीका केली जाते, असं म्हणत उदय सामंत यांनी भाजप नेत्यांवर निशाणा साधला.

संबंधित बातम्या 

UGC | अंतिम वर्षाच्या परीक्षा होणारच, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, तारखा निश्चित करण्याचा अधिकार राज्यांना

Non Stop LIVE Update
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.