‘बत्ती गुल’ होण्यामागे घातपाताची शक्यता- ऊर्जामंत्री, तर जबाबदारी कशी टाळाल? राम कदमांचा सवाल

मुंबई: मुंबईचा वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता खुद्द उर्जामंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केल्यानंतर मोठी खळबळ माजली आहे. मुंबईतील वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता नाकारता येत नाही, असं ट्विट नितीन राऊत यांनी केलंय. राऊतांच्या या ट्विटला आता भाजपनंही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. घातपाताची शक्यता म्हणून राज्य सरकारला जबाबदारी कशी टाळता येईल? असा सवाल […]

'बत्ती गुल' होण्यामागे घातपाताची शक्यता- ऊर्जामंत्री, तर जबाबदारी कशी टाळाल? राम कदमांचा सवाल
Follow us
| Updated on: Oct 14, 2020 | 11:12 AM

मुंबई: मुंबईचा वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता खुद्द उर्जामंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केल्यानंतर मोठी खळबळ माजली आहे. मुंबईतील वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता नाकारता येत नाही, असं ट्विट नितीन राऊत यांनी केलंय. राऊतांच्या या ट्विटला आता भाजपनंही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. घातपाताची शक्यता म्हणून राज्य सरकारला जबाबदारी कशी टाळता येईल? असा सवाल भाजपचे आमदार राम कदम यांनी विचारलाय. (BJP MLA Ram Kadam questioning to Nitin Raut)

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता व्यक्त केल्यानंतर आता आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झालीय. भाजप आमदार राम कदम यांनी ऊर्जामंत्र्यांना प्रश्न विचारताना सरकार आपली जबाबदारी कशी झटकू शकतं? असा सवाल केलाय. त्याचबरोबर ‘कोट्यवधी लोकांची गैरसोय झाली, त्यांना त्रास झाला, संपत्तीपासून सर्वच गोष्टींचं नुकसान झालं. याला जबाबदार तुमच्या सरकारचा नाकर्तेपणा आहे, त्यामुळं उगाच अशी वक्तवंय करुन तुम्हाला लोकांची दिशाभूल करता येणार नाही,’ असं प्रत्युत्तर कदम यांनी दिलंय.

सोमवारी नेमकं काय घडलं?

सोमवारी मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईच्या काही भागातील वीज पुरवठा तब्बल तीन तास खंडित झाला होता. त्यामुळं जनजीवन विस्कळीत झालं होतं. लोकल वाहतूक, कार्यालयीन कामकाज, रुग्णालयातील यंत्रणा, कोविड सेंटर आणि दैनंदिन कामांवर त्याचा मोठा परिणाम झाला होता. देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत जवळपास तीन तास वीज नव्हती. त्यामुळे विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चौकशीचे आदेश

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत तातडीची बैठक बोलावली होती. यानंतर तांत्रिक बिघाडाची चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले होते.  या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशीही चर्चा केली. भविष्यात पुन्हा अशी घटना होऊ नये यासाठी सर्वतोपरी उयापयोजना करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी ऊर्जा खात्याला दिले आहेत. त्याचबरोबर मुंबईतील वीज जाण्यामागील तांत्रिक दोष आणि जबाबदार व्यक्ती शोधण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

गेल्या दशकभरात मुंबईत इतक्या दीर्घकाळ वीज पुरवठा खंडित होण्याची ही चौथी वेळ होती. आगामी काळात असे प्रकार घडणार नाहीत, यासाठी आता सरकारी पातळीवर हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. त्यासाठी कोणत्सुया धारणा करण्याची गरज आहे, याबाबतच्या सर्पव र्यायांवर आता नव्याने चर्चा सुरु झाली आहे.

संबंधित बातम्या: 

मुंबईतील वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता- नितीन राऊत

Mumbai Power Cut : मुंबईतील लालबाग, परळ भागात गेलेली वीज तासाभरानं परतली; अखेर नागरिकांकडून सुटकेचा निःश्वास

मुंबईचा वीज पुरवठा खंडित का झाला? तातडीने चौकशी करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश

BJP MLA Ram Kadam questioning to Nitin Raut

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.