AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Covid Updates: भारतात तिसऱ्या लाटेचा धोका टळलाय का?

100 कोटी लसीकरणामध्ये जवळपास 71 कोटी लोकांना पहिला डोस मिळालेला आहे आणि जवळपास 29 कोटी लोकांनाच दोनही डोस मिळून लसीकरण पूर्ण झाले आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने आणि अनेक तज्ञांने भारतात तिसऱ्या काटेचा धोका व्यक्त केला आहे आणि तो धोका टळलेला नाही. 

Covid Updates: भारतात तिसऱ्या लाटेचा धोका टळलाय का?
Covid
| Edited By: | Updated on: Oct 23, 2021 | 9:08 PM
Share

मुंबईः भारताने जरी 100 कोटी लसीकरणाचा टप्पा पूर्ण केला असला तरीही कोरोना महामारी काही संपलेली नाही. या 100 कोटी लसीकरणामध्ये जवळपास 71 कोटी लोकांना पहिला डोस मिळालेला आहे आणि जवळपास 29 कोटी लोकांनाच दोनही डोस मिळून लसीकरण पूर्ण झाले आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने आणि अनेक तज्ज्ञांनी भारतात तिसऱ्या लाटेचा धोका व्यक्त केला आहे आणि तो धोका टळलेला नाही.  भारतात तिसरी लाट आलीच तर ती दुसऱ्या लाटेसारखी भयावह असणार नाही, जर नवीन वेरिएंट आला नाही तर, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. ब्रिटेन, चीन सारख्या देशात जिथे मृत्यूंचा आकडा कमी होता आणि लसीकरणाची टक्केवारी जास्त आहे तिथे आता रुग्णसंख्या वाढली आहे. (100 crore covid vaccination done but third wave danger still exists)

भारतात सध्याची आकडेवारी

शनिवारी भारतात 16,326 नवीन रुग्णांची नोंद झाली. आता पर्यंत भारतात एकूण 3,41,59,56 रुग्णांची संख्या झाली आहे आणि आता सक्रिय रुगण 1,73,738 अहेत जे मागच्या 233 दिवसांसधील सर्वात कमी आहे. केंद्रीय आरोग्य खात्याने ही आकडेवारी जाहीर केली आहे. मृत्यूंचा आकडा 4,53,708 झाला आहे ज्यात काल 666 मृत्यूंची नोंद झाली. कोरोना रूणांची संख्या मागच्या 29 दिवसांपीसून प्रतिदिन 30,000 पेक्षा कमी नोंद होत आहे आणि मागच्या सलग 118 दिवसांपासून प्रतिदिन रुग्णांची नोंद 50,000 पेक्षा कमी आहे.

सक्रिय रुग्णांची संख्या ही एकूण रूणांमध्ये फक्त 0.51  टक्के आहे जी मार्च २०२० पासून सर्वात कमी आहे. रूगण बरे होण्याची टक्केवारी आता 98.16 आहे जी मार्च 2020 पासून सर्वात कमी आहे, केंद्रीय आरोग्य विभागाने ही आकडेवारी दिली आहे. मागच्या 24 तासांमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या देखील 2,017 ने कमी झाली आहे.

ब्रिटेन, चीन सारख्या देशात रुग्ण वाढ

भारतामध्ये कोरोनाची नवीन लाट आली तर ती दुसऱ्या लाटे एवढी भयावह नसेल जर नवीन वेरीएंट नाही आला तर. मात्र सद्ध्याचे कोरोना रुगणांचे आकडे कमी आहे म्हणून नवीन लाट येणारच नाही आसं नाही, आसं तज्ज्ञांनी सांगितले आहे. देशात आता दिवाळी सारखे मोठे सणवार येत आहेत त्यामूळे रुगणांची संख्या वाढण्याची भिती आहे. ब्रिटेन, चीन सारख्या देशात जीथे मृत्यूंचा आकडा कमी होता आणि लसीकरणाची टक्केवारी जास्त आहे तिथे आता नवीन कोरोना रुग्ण सापडण्याची संख्या वाढली आहे. हे नवीन रुग्ण वायरसच्या डेल्टा आणि डेल्टा प्लसचे असल्याचे मानलं जात आहे.

भारतात लसीकरणाचा 100 कोटीचा टप्पा पार केला म्हणून देश साजरा करत आहे पण अजून वेगाने लसीकरण होणे गरजेचे आहे आणि सर्व कोरोना प्रतिबंधक नियम पाळले जातील याची काळजी घेणे गरजेचे आहे.

इतर बातम्या

कोरोनाने मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना 50 हजारांचे अनुदान; नाशिकरांनी येथे साधावा संपर्क

ब्लॅक फंगसने महिलेचा मृत्यू, कुटुंबावर दु:खाचा डोंगर, खचलेल्या निवृत्त जवानाने तीन मुलांना विष पाजलं, नंतर स्वत:ला संपवलं

Raj Thackeray Corona Positive | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना कोरोनाची लागण

(100 crore covid vaccination done but third wave danger still exists)

Follow Us
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....