AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

१९८४ च्या शीख दंगल: बाप लेकाला जीवंत जाळले, सज्जन कुमार यांना जन्मठेपेची शिक्षा, काय नेमके प्रकरण?

दिल्ली विधानसभेचे सत्र दोन दिवसांसाठी वाढविले आहे. आमदारांनी केलेल्या मागणी नंतर असे करण्यात आले आहे. आमदारांना CAG रिपोर्ट आणखी चर्चा हवी आहे. कोटाने १२ फेब्रुवारीला सज्जन कुमार याला या गुन्ह्यांसाठी दोषी ठरविले आहे.

१९८४ च्या शीख दंगल: बाप लेकाला जीवंत जाळले, सज्जन कुमार यांना जन्मठेपेची शिक्षा, काय नेमके प्रकरण?
| Updated on: Feb 25, 2025 | 4:37 PM
Share

पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर १९८४ साली दिल्लीत उसळलेल्या शीख दंगल प्रकरणात काँग्रेसचे नेते सज्जन कुमार यांना जन्मठेपेची सजा सुनावण्यात आली आहे. कोर्टाने सज्जन कुमार यांना दोषी ठरवल्यानंतर २१ फेब्रुवारीपर्यंत निकाल राखून ठेवला होता. या प्रकरणात पीडित अर्जदारांनी सज्जन यांना फाशीच्या शिक्षेची मागणी केली होती. सज्जन कुमार यांना १२ फेब्रुवारी रोजी दोषी ठरविण्यात येऊन तिहार सेंट्रल जेलच्या अधिकाऱ्यांकडून त्यांच्या मानसिकस्थितीचा अहवाल मागितला होता. मृत्यू दंडाच्या प्रकरणात असा अहवाल मागितला जातो. हत्येचा प्रकरणात किमान शिक्षा जन्मठेप तर कमाल शिक्षा मृत्यूदंड आहे.

तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दिल्लीत उसळलेल्या शीख दंगलीत सरस्वती विहार परिसरात जसवंत सिंह आणि त्यांचा मुलगा तरुणदीप सिंह यांच्या हत्येच्या संदर्भातले हे प्रकरण आहे. या वेळी काँग्रेसचे नेते सज्जन कुमार बाहेरील दिल्ली लोकसभेचे खासदार होते. ते दंगलीच्या अन्य एका प्रकरणात तिहार तुरुंगात बंदी असून जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत.

जसवंत सिंह आणि त्यांचा मुलगा तरुणदीप सिंह यांची हत्या १ नोव्हेंबर १९८४ साली झाली होती. दिल्ली छावणीतील राजनगर विभागात झालेल्या अन्य दंगलीच्या प्रकरणात सज्जन सिंग यांना पाच जणांच्या हत्येच्या प्रकरणात दोषी ठरवित जन्मठेप दिली असल्याचे तक्रारदाराचे वकील एच.एस. कुल्का यांनी म्हटले आहे. आरोपीने जमावला भडकावून अन्य निष्पाप नागरिकांचा नरसंहार, अमानवी कृत्य करण्यास उकसवले असल्याचेही तक्रारदाराच्या वकील कुल्का यांनी म्हटले आहे.

शीख दंगल: नानावटी आयोग स्थापना – फक्त २८ प्रकरणांमध्ये दोषी ठरविले

शीख दंगलीत ५८७ एफआयआर दाखल केले होते. या दंगलीत २,७३३ लोकांचा मृत्यू झाला होता. या दंगलीतील २४० प्रकरणे “अज्ञात” म्हणून फाईल बंद केली होती. तर २५० प्रकरणात लोकांना निर्दोष सोडण्यात आले होते. केवळ २८ प्रकरणात शिक्षा झाली होती. सुमारे ४०० जणांना शिक्षा सुनावण्यात आले होते. त्यातील ५० जणांवर हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे. तत्कालिन काँग्रेस नेते आणि खासदार सज्जन कुमार यांच्यावर १ आणि २ नोव्हेंबर १९८४ रोजी दिल्लीच्या पालम कॉलनीत पाच जणांची हत्या केल्याचा आरोप होता. या प्रकरणात सज्जन कुमार यांना दिल्ली हायकोर्टाने जन्मठेप सुनावली होती. या शिक्षेविरोधातील त्यांचे अपिल सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.

४०० लोकांना शिक्षा

हिंसाचार आणि त्यानंतरच्या घटनांची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या नानावटी आयोगाने सांगितले की, दंगलींसंदर्भात दिल्लीत ५८७ एफआयआर नोंदवण्यात आले होते, ज्यामुळे २,७३३ लोकांचा मृत्यू झाला होता. यापैकी २४० प्रकरणे “अज्ञात” म्हणून बंद करण्यात आली आणि २५० प्रकरणांमध्ये लोकांना निर्दोष सोडण्यात आले. फक्त २८ प्रकरणांमध्ये शिक्षा झाली, त्यापैकी जवळपास ४०० लोकांना शिक्षा झाली, त्यापैकी ५० जणांना हत्येचा आरोप होता. त्यावेळचे शक्तिशाली काँग्रेस नेते आणि खासदार सज्जन कुमार यांच्यावर १ आणि २ नोव्हेंबर १९८४ रोजी दिल्लीच्या पालम कॉलनीत पाच जणांची हत्या केल्याचा आरोप होता. त्या प्रकरणात, त्यांना दिल्ली उच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती आणि त्यांची अपील अजूनही सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.

गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.
भाजपकडून धंगेकरांची कोंडी? मुलगा अपक्ष निवडणूक लढणार; सुत्रांची माहिती
भाजपकडून धंगेकरांची कोंडी? मुलगा अपक्ष निवडणूक लढणार; सुत्रांची माहिती.
त्यांचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही! अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य
त्यांचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही! अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य.
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?.
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा.
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.