AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी स्फोटासारखा आवाज… 16 मिनिटात तीन वेळा धरणीकंप; भयभीत नागरिक जीवमूठीत घेऊन पळाले

जयपूरमध्ये पहिला भूकंपाचा धक्का पहाटे 4 वाजून 9 मिनिटांनी जाणवला. त्यानंतर 4 वाजून 23 मिनिटांनी दुसरा तर 4 वाजून 25 मिनिटांनी तिसरा भूकंपाचा धक्का जाणवला.

आधी स्फोटासारखा आवाज... 16 मिनिटात तीन वेळा धरणीकंप; भयभीत नागरिक जीवमूठीत घेऊन पळाले
earthquakesImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 21, 2023 | 6:55 AM
Share

जयपूर | 21 जुलै 2023 : आज सकाळी सकाळीच भूकंपाच्या जोरदार धक्क्यांनी राजस्थान आणि मणिपूरची धरती हलली. जयपूरमध्ये 16 मिनिटाच्या आत एकापाठोपाठ एक तीन भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची रिश्टर स्केलवर 4.4 एवढी तीव्रता नोंदवली गेली. सकाळी सकाळीच झालेल्या या भूकंपामुळे साखर झोपेत असलेले नागरिक चांगलेच हादरून गेले. लागोपाठ तीनवेळा जमीन हादरल्याने नागरिकांना जीवमूठीत घेऊन घरातून पळ काढला. या भूकंपाच्या धक्क्यामुळे जयपूरमधील लोक चांगलेच घाबरून गेले होते.

जयपूरमध्ये पहिला भूकंपाचा धक्का पहाटे 4 वाजून 9 मिनिटांनी जाणवला. त्यानंतर 4 वाजून 23 मिनिटांनी दुसरा तर 4 वाजून 25 मिनिटांनी तिसरा भूकंपाचा धक्का जाणवला. पहिल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.1 एवढी नोंदवली गेली. दुसऱ्या भूकंपाची तीव्रता 3.4 आणि तिसऱ्या भूकंपाची तीव्रता 4.4 एवढी नोंदवली गेली. भूकंपाचे धक्के जाणवताच लोक घरातून घाबरून बाहेर पळाले.

काही लोक पार्कमध्ये जाऊन बसले. तर काही लोक उघड्यावर जाऊन बसले. या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. सर्वाच जण भयभीत झाले होते. आपल्या चिल्यापिल्यांसह सुरक्षित ठिकाणी जाऊन बसले होते. काही मोठा अनुचित प्रकार तर घडणार नाही ना? हीच चिंता त्यांच्या चेहऱ्यावर होती.

स्फोटाचा आवाज झाला

दरम्यान, या भूकंपाच्या धक्क्यात कोणतीही जीवीत वा वित्त हानी झाल्याचं वृत्त नाही. भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की स्फोटासारखे आवाज ऐकू आल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. या घटनेनंतर लोक आता भूकंप आल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत. या व्हिडीओममध्ये भूकंपामुळे जमीन हलताना दिसत आहे.

वसुंधरा राजे यांचं ट्विट

राजस्थानाच्या माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे यांनी ट्विट करून भूकंपाची माहिती दिली. जयपूरमध्ये भूकंपाचे तीव्र झटके जाणवले आहेत. तुम्ही सर्व सुरक्षित असाल अशी आशा आहे, असं या ट्विटमध्ये वसुंधरा राजे यांनी म्हटलं आहे.

मणिपूरही हादरले

मणिपूरच्या उखरूल येथे पहाटे 5 वाजता भूकंपाचे झटके जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.5 एवढी नोंदवली गेली. या भूकंपाचा केंद्र बिंदू 20 किलोमीटर आत जमिनीत होता. उखरूलमध्ये काही दिवसांपूर्वीही भूकंपाचे धक्के जाणवले होते.

भाजपच्या मंत्र्याकडून शिंदेंकडच्या नगरविकास खात्यावर पुन्हा आरोप
भाजपच्या मंत्र्याकडून शिंदेंकडच्या नगरविकास खात्यावर पुन्हा आरोप.
Narhari Zirwal : अजित पवारांच्या राष्ट्रवादीतले तिसरे मंत्री वादात
Narhari Zirwal : अजित पवारांच्या राष्ट्रवादीतले तिसरे मंत्री वादात.
स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश
स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश.
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले...
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले....
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ.
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका.
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण...
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण....
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?.
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?.
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी...
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी....