AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ओडिशामध्ये 3 रेल्वे गाड्यांची टक्कर, भारतीयांच्या डोळ्यांमध्ये पाणी आणणारा सर्वात मोठा भीषण अपघात

चेन्नई येथून कोरोमंडल एक्सप्रेस ही पश्चिम बंगालच्या हावडा रेल्वे स्थानकाच्या दिशेला निघाली होती. या दरम्यान ओडिशाच्या बहनागा रेल्वे स्थानकाजवळ मोठी दुर्घटना घडली. तब्बल तीन रेल्वे गाड्यांची टक्कर झालीय. त्यामुळे मोठा हाहाकार उडाला आहे.

ओडिशामध्ये 3 रेल्वे गाड्यांची टक्कर, भारतीयांच्या डोळ्यांमध्ये पाणी आणणारा सर्वात मोठा भीषण अपघात
| Updated on: Jun 02, 2023 | 11:50 PM
Share

बालासोर : ओडिशाच्या बालासोर येथे आज खूप मोठा रेल्वे अपघात घडलाय. सुरुवातीला कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडी यांच्यात टक्कर झाल्याने हा अपघात घडला अशी माहिती समोर येत होती. पण आता जसजसी वेळ पुढे सरकत जातेय तसतशी वेगवेगळी महत्त्वपूर्ण नवी माहिती समोर येऊ लागली आहे. बालासोरमध्ये दोन गाड्यांची टक्कर नाही तर तब्बल तीन रेल्वे गाड्यांची टक्कर झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे प्रचंड मोठा हाहाकार उडाला आहे. आतापर्यंत 50 जणांच्या मृत्यूची माहिती समोर येते. घटनास्थळी प्रचंड खळबळ उडाली आहे.

बचाव पथकाचं कार्य युद्ध पातळीवर सुरु आहे. शेकडो जखमींना रुग्णालयात नेलं जात आहे. अनेक रुग्णवाहिका घटनास्थळी काम करत आहेत. देशभरातून वेगवेगळी पथक ओडिशाला मदतीसाठी रवाना झाले आहेत. दुर्घटना खूप मोठी आहे. एका गाडीत 1600 प्रवाशी होते, अशी माहिती मिळत आहे. अपघात तीन रेल्वे गाड्यांचा आहे. त्यामुळे नुकसान खूप मोठं आहे. भारताच्या इतिहासातील ही सर्वात भयानक रेल्वे दुर्घटना आहे.

संबंधित घटना ही शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास घडली. ओडिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी या घटनेची सविस्तर माहिती दिली. चेन्नई येथून कोरोमंडल एक्सप्रेस ही पश्चिम बंगालच्या हावडा रेल्वे स्थानकाच्या दिशेला निघाली होती. या दरम्यान ओडिशाच्या बहनागा रेल्वे स्थानकाजवळ आधी हावडा एक्सप्रेस ही मालगाडीला धडकली. ही दुर्घटना खूप मोठी होती. त्यानंतर लगेच मागून आलेली कोरोमंडल एक्सप्रेस या दोन अपघातग्रस्त गाड्यांना धडकली. त्यामुळे घटनास्थळी मोठा हाहाकार उडाला. कोरोमंडल एक्सप्रेसचे अनेक डब्बे रुळाखाली घसरले. चार ते पाच रेल्वे डब्बे अक्षरश: पलटी झाले.

मृतकांच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत जाहीर

दरम्यान, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव गोवा येथून ओडिशा येथे अपघातस्थळी रवाना झाले आहेत. त्यांनी मृतकांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केलीय. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील या घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे. या घटनेमुळे उद्याचा मुंबई-गोवा वंदे भारत ट्रेन लोकार्पण कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 300 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमींच्या मदतीसाठी प्रशासनाचे युद्ध पातळीवर काम सुरु आहे.

हेल्पलाईन नंबर जारी

रेल्वेने वेगवेगळ्या स्थानकांवरून हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. या क्रमांकांमध्ये, 033 26382217, खरगपूर हेल्पलाइन क्रमांक 8972073925/9332392339, बालासोर हेल्पलाइन क्रमांक – 8249591559/7978418322 आणि शालीमार हेल्पलाइन क्रमांक 9903370746 हावरा स्टेशनवरून जारी करण्यात आला आहे.

चेन्नई सेंट्रलने हेल्पलाइन क्रमांकही जारी केले आहेत, प्रवाशांच्या मदतीसाठी विशेष बूथही उघडले जात आहेत. या क्रमांकांवर संपर्क साधला जाऊ शकतो – 044- 25330952, 044-25330953 आणि 044-25354771.

या अपघातावर शोक व्यक्त करत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन हे हेल्पलाइन क्रमांक कार्यान्वित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.