AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरे यांच्या जळगावातील भाषणाचे पडसाद अयोध्येत; राम मंदिराच्या पुजाऱ्याने दिलं प्रत्युत्तर

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कालच्या वक्तव्यावर थेट अयोध्येतून प्रत्युत्तर आलं आहे. अयोध्येच्या राम मंदिराच्या मुख्य पुजाऱ्याने उद्धव ठाकरे यांना उत्तर देताना त्यांचं म्हणणं खोडून काढलं आहे.

उद्धव ठाकरे यांच्या जळगावातील भाषणाचे पडसाद अयोध्येत; राम मंदिराच्या पुजाऱ्याने दिलं प्रत्युत्तर
acharya satyendra dasImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 11, 2023 | 11:51 AM
Share

अयोध्या | 11 सप्टेंबर 2023 : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कालच्या जळगावातील भाषणाचे थेट अयोध्येत पडसाद उमटले आहेत. अयोध्येत राम मंदिराचं उद्घाटन केल्यानंतर हिंदू भाविक परतताना एखाद्या शहरात, वस्तीत गोध्रा घडवलं जाईल, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला होता. ठाकरे यांच्या या दाव्याचा अयोध्येतील राम मंदिराच्या मुख्य पुजाऱ्याने समाचार घेतला आहे. अयोध्येत कडेकोट सुरक्षा व्यवस्था आहे. इथे कोणी काहीच करू शकणार नाही, असं या पुजाऱ्याने म्हटलं आहे.

राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी टीव्ही9 भारतवर्षशी बोलताना उद्धव ठाकरे यांच्या दाव्यातील हवाच काढून घेतली. अयोध्येत प्रचंड सुरक्षा व्यवस्था आहे. इथे पान सुद्धा हलवू शकणार नाही. सतपाल मलिक, प्रशांत भूषण आणि उद्धव ठाकरे हे तिघेही घाबरवण्याचे काम करत आहेत. तिघांनीही अशाच प्रकारची विधाने केली आहे. तिघांनीही भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दंगली घडवून आणणार असल्याचं म्हटलं आहे. त्यांचं हे विधान चुकीचं आहे. इथे कुणी केसही वाकडा करू शकत नाही. साधं पानही कुणी हलवू शकणार नाही. या ठिकाणी प्रचंड सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे या तिघांच्याही म्हणण्यात काहीही तथ्य नाही, असं आचार्य सत्येंद्र दास यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे घाबरवत आहेत

यावेळी आचार्य सत्येंद्र दास यांनी उद्धव ठाकरे, प्रशांत भूषण आणि सतपाल मलिक या तिघांवरच उलटा आरोप केला आहे. हे तिघेच दंगे भडकवतील की काय अशी भीती आम्हाला आहे, असं सत्येंद्र दास म्हणाले. सर्व तयारी झाली आहे. राम लल्ला स्थानापन्न होतील. सर्व काही शांततेत पार पडेल. संपूर्ण कार्यक्रम 22 जानेवारी रोजी होणार आहे.

या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी येतील. सर्व लोक उत्साहीत आहेत. सर्व काही चांगलं होईल. कुणी कितीही भडकवलं तरी त्याचा भक्तांवर काही परिणाम होणार नाही. कुणी कितीही घाबरवण्याचा प्रयत्न केला तरी तसं काही होणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?

उद्धव ठाकरे काल जळगावात होते. त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुन्हा गोध्रा होण्याची भीती व्यक्त केली. राम मंदिराच्या उद्घटानाला देशभरातून हिंदूंना बोलावलं जाईल. रेल्वे, ट्रक, बसने भाविकांना अयोध्येत बोलावलं जाईल. सोहळ्यातून परतताना एखादं शहर किंवा वस्तीत गोध्रा घडवलं जाईल. बस जाळल्या जातील. राडा भडकवला जाईल. घरे पेटवली जातील आणि पेटलेल्या घरांवर हे लोक राजकीय पोळी भाजून घेतील, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता. त्यावर अयोध्येतील मुख्य पुजाऱ्याने प्रत्युत्तर दिलं आहे.

Follow Us
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
आदित्य ठाकरे यांच्याकडून त्र्यंबकेश्वरमधील पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.