AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आचार संहिता लागू झाल्यानंतर कोणाला मिळते सर्वाधिक पावर, पंतप्रधानांनी ही घ्यावी लागते परवानगी

Loksabha election 2024 : देशात लोकसभा निवडणूक काही दिवसांवर आली आहे. उद्या निवडणूक आयोग पत्रकार परिषदेत निवडणुकीची घोषणा करु शकतात. यानंतर संपूर्ण देशात आचार संहिता लागू होऊ शकते. या दरम्यान पंतप्रधान असो की मुख्यमंत्री सर्वांना कोणत्याही गोष्टीसाठी एका अधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागते.

आचार संहिता लागू झाल्यानंतर कोणाला मिळते सर्वाधिक पावर, पंतप्रधानांनी ही घ्यावी लागते परवानगी
| Updated on: Mar 15, 2024 | 8:15 PM
Share

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुका काही दिवसांवर आल्या आहेत. निवडणूक आयोग शनिवारी १६ मार्च रोजी पत्रकार परिषद घेणार असून यामध्येच निवडणुकांची घोषणा होऊ शकते. निवडणूक आयोग उद्या संपूर्ण कार्यक्रम जाहीर करणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे जर निवडणुकांची घोषणा झाली तर देशभरात आदर्श आचारसंहिता लागू होणार आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर सरकारला कोणतेही नवीन निर्णय घेता येणार नाहीये. त्यामुळे निवडणुक आयोगाच्या सूचनांवरच देश चालणार आहे.

जिल्हाधिकारी बनतील जिल्हा निवडणूक अधिकारी

पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि सर्व सरकारच्या मंत्र्यांना निवडणूक आयोगाच्या सूचनांचे पालन करावे लागते. त्यामुळे देशभरातील अधिकारी अधिक सक्षम होतात. या सर्वांमध्ये सर्वात शक्तिशाली असतात ते जिल्ह्याचे जिल्हा दंडाधिकारी. कारण ते जिल्हा निवडणूक अधिकारी पदाची सूत्रे स्वीकारतात. त्यांच्या संमतीशिवाय जिल्ह्यात एक पानही हालणार नाही. जिल्ह्यातील एखादा छोटासा कार्यक्रम किंवा पंतप्रधानांची सभाही जिल्ह्याच्या डीएमच्या आदेशाशिवाय घेऊ शकणार नाहीत. आचारसंहितेच्या काळात जिल्हा दंडाधिकारी म्हणजेच डीएम किती शक्तिशाली बनतात हे समजून घेऊया.

आचारसंहिता लागू होण्यापूर्वी निवडणूक आयोग संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेते. त्यानंतर आयोग सरकारला आपला अभिप्राय देते आणि त्यानंतर अधिकाऱ्यांच्या बदल्याही होतात. निवडणूक आयोग निवडणुकीपूर्वी अधिकारी स्तरावर सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करते. त्याचबरोबर निवडणुकीच्या काळातही अनेकवेळा अधिका-यांच्या तक्रारी आयोगाकडे येतात, तरीही आयोग योग्य ती कारवाई करतो आणि आवश्यकतेनुसार बदल्या करतो.

आता जर आपण आचारसंहितेच्या काळात डीएमची ताकद किती याबद्दल बोलायचे झाले तर सोप्या भाषेत तो जिल्ह्यातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती असतो. स्थानिक आमदार-खासदार सोडा, सरकारही डीएमच्या कामात हस्तक्षेप करू शकत नाही. जिल्हाध्यक्षांच्या संमतीशिवाय जिल्ह्यातील उमेदवारांना रॅली देखील काढता येत नाही.

पंतप्रधानांनी ही घ्यावी लागते डीएमची परवानगी

जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे ताकद या काळात इतकी असते की, पंतप्रधानांना देखील रॅली करायची असेल तर जिल्हा दंडाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागते. जाहीर सभा असो किंवा रोड शो जिल्हआधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय काहीच शक्य नाही. जिल्हा निवडणूक अधिकारी परवानगी देईल तरच रॅली काढता येते. उमेदवाराने किती खर्च करायचा, रॅली कशी काढायची, तो काय करू शकतो आणि काय करू शकत नाही हे ठरवण्याची जबाबदारीही डीएमची असते. थोडक्यात, आचारसंहिता लागू झाल्यापासून ते पुढचे सरकार स्थापन होईपर्यंत जिल्ह्याचे सर्व अधिकार जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे म्हणजेच जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे असतात.

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.