AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्लीनंतर मुंबईतही जीवघेणं प्रदूषण, मुंबईकरांचं आयुष्य नेमकं किती वर्षांनी घटणार? नव्या सर्व्हेत खुलासा

मध्य, पूर्व आणि उत्तर भारतात 48 कोटींहून अधिक लोक गंभीर पातळीच्या वायू प्रदूषणात राहत आहेत, जे त्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. अहवालात विशेषत: महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील परिस्थिती बद्दल सांगितली आहे की या भागांमध्ये सरासरी व्यक्ती 2.5 ते 2.9 वर्षे आयुष्य गमावत आहे. हा परिणाम दीर्घकाळ वायू प्रदूषणात राहिल्यानंतर दिसून येतो.

दिल्लीनंतर मुंबईतही जीवघेणं प्रदूषण, मुंबईकरांचं आयुष्य नेमकं किती वर्षांनी घटणार? नव्या सर्व्हेत खुलासा
Air pollution
| Edited By: | Updated on: Nov 26, 2021 | 4:49 PM
Share

नवी दिल्लीः भारतातील वायू प्रदूषण इतक्या गंभीर पातळीवर आहे की वायुप्रदूषणामुळे भारतीयांचे सरासरी आयुष्यातील 9.7 वर्षा कमी होत आहे, ज्यामध्ये दिल्ली, मुंबई आणि कोलकाता सारख्या प्रमुख शहरांचा समावेश आहे. एका सर्वेक्षणानुसार, देशातील 40 टक्के लोकसंख्या -विशेषत: उत्तर भारतातील लोक, नऊ वर्षांपेक्षा जास्त आयुष्य गमावतील जर प्रदूषण पातळी अशीच कायम राहिली. हे आकडे 2019 मध्ये नोंदवलेल्या हवेच्या गुणवत्तेच्या निर्देशांकानुसार (air quality index) आहेत. गेल्या दोन वर्षांत भारतातील हवेची गुणवत्ता सुधारण्याऐवजी अजूनच खराब झाली आहे. युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो (EPIC) च्या एनर्जी पॉलिसी इन्स्टिट्यूटने जारी केलेल्या एअर क्वालिटी लाइफ इंडेक्स (AQLI) मधील निष्कर्षांनुसार हे आकडे आहेत.

सर्वेक्षणानुसार, मध्य, पूर्व आणि उत्तर भारतात 48 कोटींहून अधिक लोक गंभीर पातळीच्या वायू प्रदूषणात राहत आहेत, जे त्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. अहवालात विशेषत: महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील परिस्थिती बद्दल सांगितली आहे की या भागांमध्ये सरासरी व्यक्ती 2.5 ते 2.9 वर्षे आयुष्य गमावत आहे. हा परिणाम दीर्घकाळ वायू प्रदूषणात राहिल्यानंतर दिसून येतो.

उत्तर भारतात सध्या परिस्थिती इतकी वाईट आहे की सरकारला शाळा बंद कराव्या लागल्या आणि लोकांना घरून काम करण्यास सांण्यात आले. दिल्ली आणि एनसीआरमधील वायू प्रदूषण पातळी पाहून सर्वोच्च न्यायालयाने ही लॉकडाऊन सारखी परिस्थिती असल्याचेही म्हटले. उत्तर भारतात वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक पावले उचलली गेली असली तरी त्यात यश मिळत नाहीये. आणि परिस्थिती दरवर्षी वाईट होत आहे.

WHO चे निरीक्षणं काय आहेत?

भारतातील वायू प्रदूषणाची उच्च पातळी कालांतराने भौगोलिकदृष्ट्या वाढत गेली आहे. काही दशकांपूर्वीच्या तुलनेत, भारतातील वायू किंवा जल प्रदूषण आता देशाच्या काही विशिष्ट भागांपुरते मर्यादित रोहिलेले नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मार्गदर्शक तत्त्वानुसार वायू प्रदूषणातील हानिकारक कण कमी न केल्यास, सरासरी व्यक्तीचे आयुष्य किमान  2.2 वर्षे कमी होईल. जगातील सर्वाधिक प्रदूषित भागात राहणाऱ्या लोकांचे आयुष्य किमान 5 वर्षेानी कमी झाल्याचे आढळले आहे. WHO नुसार दक्षिण आशियामध्ये लोकांचे एकूण 58 टक्के आयुष्य कमी झाले आहे. ही टक्केवारी या भागात उच्च प्रदूषणासह आणि जास्त लोकसंख्याेमुळे अधिक आहे.

इतर बातम्या –

26/11: धावत्या मुंबईला थांबायला लावणारा हल्ला! असंख्य जखमा, रक्तपात अन् दहशतवादाशी दोन-हात!

ED Raid: शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या घरावर ईडीचा छापा, आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी कारवाई!

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.