AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पूर्वी जनाजे निघायचे, आता मारला की तिथेच… हे मोदी सरकार आहे; अमित शाह यांनी ठणकावले

Amit Shah on J&K Situation : अमित शाह यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. ऑपरेशन सिंदूरबद्दल ते बोलतान दिसले. दहशतवाद्यांचे समर्थक आणि नातेवाईक आम्ही शोधून काढले. पासपोर्ट रद्द केले. काही संघटनांवर बंदी आणल्याचेही अमित शाह यांनी म्हटले. पहलगाममध्ये दहशतावद्यांनी पर्यटकांना टार्गेट केले.

पूर्वी जनाजे निघायचे, आता मारला की तिथेच... हे मोदी सरकार आहे; अमित शाह यांनी ठणकावले
amit shah
| Updated on: Jul 29, 2025 | 2:04 PM
Share

पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर यावर लोकसभेत कालपासून चर्चा सुरू आहे. आज दुसऱ्या दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाषण करत महत्वाची माहिती दिली. पहलगाम हल्ल्यानंतर काय काय घडले हे त्यांनी सविस्तरपणे सांगत विरोधकांवर जोरदार टीका केली. पहलगाममध्ये भारतीय पर्यटकांचा जीव घेणारे दहशतवादी मारले गेले आणि पहलगामचा बदला घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पहलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट ही बघायला मिळाली.

अमित शाहांनी काल करण्यात आलेल्या ऑपरेशन महादेव बद्दलही माहिती दिली. अमित शाह बोलताना म्हटले की, पूर्वी जनाजे निघायचे. बुऱ्हाण वाणी मेला. जनाजाला हजारो लोक यायचे. आता जनाजे काढण्यास परवानगी नाही. अतिरेकी मेल्यावर त्याला तिथेच दफन केले जाते. हे आमचे सरकार आहे. नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये जनाजे काढण्याची परवानगी नाहीये. विरोधकांना दहशतवादावर बोलण्याचा अधिकार नसल्याचेही अमित शाह यांनी म्हटले.

दहशतवाद्यांचे समर्थक आणि नातेवाईक आम्ही शोधून काढले. पासपोर्ट रद्द केले. काही संघटनांवर बंदी आणल्याचेही अमित शाह यांनी म्हटले. पहलगाममध्ये दहशतावद्यांनी पर्यटकांना टार्गेट केले. धर्म विचारून कुटुंबियांसमोर पुरूषांवर गोळ्या झाडल्या. या दहशतवादी हल्ल्यात फक्त हिंदू पर्यटकांना अतिरेक्यांनी टार्गेट केले. या दहशतवादी हल्ल्याचे अनेक धक्कादायक व्हिडीओही पुढे आली. पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशात एक संतापाची लाट आली.

पहलगामवरील हल्ल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये अमित शाह हे पहलगामकडे रवाना झाले आणि त्यांनी ज्याठिकाणी हल्ला झाला तिथे भेट दिली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. ज्यावेळी पहलगामवर झाला झाला, त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी ही विदेश दाैऱ्यावर होते आणि त्यांनी आपला विदेश दाैरा रद्द करत भारतात दाखल झाले. पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी देशभरातून करण्यात आली. काही महिन्यांपासून या दहशतवादी हल्ल्याची प्लॅनिंग सुरू असल्याची माहिती तपासात मिळाली. भारताने जगभरात पाकिस्तानचा बुरखा फाडला. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला मोठा धडा शिकवला.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.