AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुन्हेगारी बाबत राज्य आणि केंद्राची जबाबदारी काय?; अमित शहांनी उपायच सांगितला…

देशाच्या सीमेपलीकडून करण्यात येणाऱ्या गुन्हेगारीविषयी केंद्रानी आणि राज्यांनी ठोस पावले उचलणे गरजचे आहे.

गुन्हेगारी बाबत राज्य आणि केंद्राची जबाबदारी काय?; अमित शहांनी उपायच सांगितला...
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Oct 27, 2022 | 9:39 PM
Share

नवी दिल्लीः देशाच्या सीमेपलीकडे असणाऱ्या गुन्हेगारी समूळ उच्चाटन करुन टाकणे हीच केंद्र आणि राज्य सरकारची सामूहिक जबाबदारी असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज सांगितले. आपल्या राज्यघटनेत कायदा आणि सुव्यवस्था हा राज्यांचा विषय आहे, पण सीमेपलीकडे घडणारे गुन्हे किंवा सीमेबाहेरील गुन्ह्येगारी आपण थांबवू शकतो. मात्र त्यासाठी सर्व राज्यांनी एकत्र बसून त्यावर विचार विनिमय केला पाहिजे.

त्यासाठी आणि एक समान धोरण राबवले गेले पाहिजे तरच अशा सीमेबाहेरील गुन्हेगारीवर आवर घालता येईल असंही त्यांनी सांगितले.

अमित शहा म्हणाले की, देशाच्या सीमेपलीकडून करण्यात येणाऱ्या गुन्हेगारीविषयी केंद्रानी आणि राज्यांनी ठोस पावले उचलणे गरजचे आहे.

त्यांच्यावर जर सामुहिक आणि संयुक्तपणे कारवाई केली गेली तर देशातील वातावरण चांगले राखता येणार आहे. अशा कारवायांवर संयुक्त कारवाया केल्या गेल्या तरच देशात होणारी घुसखोरी थांबली जाईल असंही त्यांनी सांगितले.

अमित शहा यांनी बोलताना सांगितले की, जम्मू-काश्मीर असो की ईशान्य किंवा अंमली पदार्थांची तस्करी असो. यांच्यावर कारवाई करण्यात मोदी सरकार यशस्वी ठरले आहे.

गृहमंत्र्यांनी सांगितले की, दहशतवादविरोधी धोरणांतर्गत सर्व राज्यांमध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणांची कार्यालयं असणार आहेत. आपल्या देशाची अंतर्गत सुरक्षा मजबूत मानली जाते.

त्यामुळे देशाची एकता आणि अखंडता अबाधित ठेवण्यासाठी आपले 35 पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील जवानांनी बलिदान दिले आहे.

अमित शहा यांनी सांगितलेल्या केंद्र आणि राज्याच्या सुरक्षिततेसंदर्भात जबाबदाऱ्यांचे पालन केले तर राज्यासह देश सुरक्षित राहिल असं मतही त्यांनी व्यक्त केले.

Follow Us
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
Girish Mahajan | रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? गिरीश महाजनांचा मोठा दावा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
Gondia Rain | गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक शेतकरी चिंतेत
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
Mumbai | नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! 13 एप्रिलला अटक, आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
Thane Assault Case | ठाण्यातील वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
Buldhana | लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर; कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी जप्त
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड