AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेचा इराण युद्धादरम्यानच भारताला मोठा दणका, थेट चाैकशी सुरू, 16 देशांच्या यादीत…

भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध कायम चांगले राहिले आहेत. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून हे संबंध तणावात आहेत. अमेरिकेकडून भारतावर अनेक निर्बंध लादली जात आहेत. त्यामध्येच आता मोठ्या चाैकशीचे थेट आदेश देण्यात आली.

अमेरिकेचा इराण युद्धादरम्यानच भारताला मोठा दणका, थेट चाैकशी सुरू, 16 देशांच्या यादीत...
India and us
| Updated on: Mar 12, 2026 | 7:56 AM
Share

मागील काही दिवसांपासून भारत आणि अमेरिका संबंध तणावात आहेत. सतत भारतावर अनेक निर्बंध लादताना अमेरिका दिसत आहे. त्यामध्येच आता अमेरिकेकडून भारताला मोठा दणका देण्यात आला. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने परदेशी औद्योगिक उत्पादनाबाबत एक नवीन व्यापार चौकशी सुरू केली आहे. ही चौकशी सुरू करण्याची घोषणा बुधवारी करण्यात आली. हैराण करणारे म्हणजे या यादीत भारताच्या नावाचा देखील समावेश करण्यात आला. अमेरिकेने भारताने रशियाकडून तेल खरेदी करू नये, याकरिता अनेक मोठे निर्बंध भारतावर लादली. यामुळे भारत आणि रशियाची 70 वर्षांची मैत्री धोक्यात आली. इराणविरोधात अमेरिका थेट युद्ध करत आहे, याचा फटका फक्त इराणलाच नाही तर अनेक आखाती देशांना बसताना दिसत आहे. आखाती देशांवर मोठे हल्ले इराणकडून करण्यात आली. तेल रिफायनरीला या युद्धात टार्गेट केले जात आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये इराण हार स्वीकारताना दिसत नाही.

आर्थिक आणीबाणीचा हवाला देत ट्रम्प यांनी लादलेले मागील आयात शुल्क अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर आता थेट परदेशी औद्योगिक उत्पादनाबाबत एक नवीन व्यापार चौकशी सुरू अमेरिकेने सुरू केली. यादीत 16 देशांच्या नावाचा समावेश आहे आणि त्यापैकी एक भारत देखील आहे. भारताने अमेरिकेसोबत व्यापार करार केले, यासोबतच रशियाकडून तेल खरेदीही कमी केली होती. मात्र, अमेरिका भारताच्या विरोधात निर्णय घेताना दिसतच आहे.

भारत, चीन, जपान, दक्षिण कोरिया, तैवान, युरोपियन युनियन, मेस्किको, सिंगापूर, मलेशिया, बांगलादेश, थायलंड, कंबोडिया, व्हिएतनाम, स्वित्झर्लंड, नॉर्वे या देशांचा समावेश आहे. जेमिसन ग्रीर म्हणाले की, अमेरिकेचा असा विश्वास आहे की अनेक प्रमुख व्यापारी भागीदारांनी त्यांची उत्पादन क्षमता इतकी वाढवली आहे, त्यामुळे आमच्या देशांतर्गत उत्पन्नावर थेट याचा परिमाम होत आहे.

ग्रीर पुढे बोलताना म्हणाले की, अमेरिका यापुढे इतर देशांकडून आपला औद्योगिक पाया कमकुवत होऊ देणार नाही. म्हणजे आता ही चाैकशी पूर्ण झाल्यानंतर अमेरिका काही पाऊले व्यापाराबाबत या देशांविरोधात उचलू शकते. दुसरीकडे भारतासोबत मोठे व्यापार करार करत स्वत: च्या वस्तूंसाठी भारतीय बाजारपेठ अमेरिकेने खुली करून घेतली. मात्र, आता वेगळी चाल अमेरिकेकडून खेळली जात आहे.

Follow Us
धरणं 88% भरली... तरीही मुंबईत पाणीकपात! नेमकं कारण काय?
धरणं 88% भरली... तरीही मुंबईत पाणीकपात! नेमकं कारण काय?
कुणाल कामरा, सोनम वांगचुक, अभिजित दिपके अडचणीत; राम-सीता वक्तव्यावरून
मोठी बातमी! कुणाल कामरा, सोनम वांगचुक, अभिजित दिपके अडचणीत; राम-सीता वक्तव्यावरून कोर्टात याचिका दाखल
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी....
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले... नेमकी भानगड काय?
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या'
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? मोठा खुलासा
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? तुकाराम मुंडेंसोबतच्या भेटीबाबत रोहित पवारांचा खुलासा
फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका...
Bharat Gogawale | फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ