AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वेग अन् सुविधा वंदे भारतसारख्या, भाडेमात्र एक्सप्रेसपेक्षाही कमी अन् सुटसुद्धा मिळणार

vande bharat express | देशात सर्वसामान्य प्रवाशांसाठी नवीन ट्रेन सुरु झाली आहे. या ट्रेनच्या भाडे सर्वसामान्य ट्रेनपेक्षा कमी आहे. परंतु सुविधा मात्र वंदे भारत ट्रेनसारख्या आहेत. यामुळे या रेल्वेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळला आहे.

वेग अन् सुविधा वंदे भारतसारख्या, भाडेमात्र एक्सप्रेसपेक्षाही कमी अन् सुटसुद्धा मिळणार
| Updated on: Jan 08, 2024 | 2:48 PM
Share

नवी दिल्ली, दि. 8 जानेवारी 2024 | देशात सर्वात वेगाने बदल रेल्वे मंत्रालयात सुरु आहे. भारतीय रेल्वेचे आधुनिकीकरण सुरु आहे. रेल्वेने कात टाकत सेमीहायस्पीड असलेली वंदे भारत एक्स्प्रेस आणली आहे. ही रेल्वे कमालीची लोकप्रिय झाली आहे. परंतु या रेल्वेचे भाडे एक्स्प्रेसपेक्षा जास्त आहेत. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांसाठी अमृत भारत ट्रेन आणली आहे. देशातील पहिल्या अमृत भारत ट्रेनला सुरुवात अयोध्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. रेल्वे प्रवाशांसाठी ही रेल्वे म्हणजे ‘अमृत’ म्हटली जात आहे. या रेल्वेत अनेक प्रकारच्या सुट मिळणार आहे.

काय आहेत सुविधा

रेल्वे मंत्रालयाने प्रवाशांना नवीन रेल्वे उपलब्ध करुन दिली आहे. अमृत भारत नावाने धावणाऱ्या या एक्स्प्रेसचा वेग 130 किमी प्रती आहे. या रेल्वेमध्ये अनेक सुविधा वंदे भारत सारख्या आहेत. तिला दोन्ही बाजूला पॉवरफुल इंजिन आहे. यामुळे कमी वेळात तुमचा प्रवास पूर्ण होणार आहे. या ट्रेनच्या कोचची डिझाइन अशा पद्धतीने केली आहे की, प्रवाशांना धक्के बसणार नाही. या ट्रेनमध्ये एकूण 22 कोच आहेत.

सुविधा जास्त तिकीट कमी

अमृत भारत एक्स्प्रेस ट्रेनचे तिकीट इतर एक्स्प्रेसपेक्षा कमी आहे. या रेल्वेचे तिकीटच कमी नाही तर नवीन सुटही प्रवाशांना दिली आहे. या रेल्वेत ‘सुपरफास्‍ट चार्जेज’ लागणार नाही. प्रवाशांना ‘सुपरफास्‍ट चार्जेज’ म्हणून 30 ते 45 रुपये द्यावे लागतात. परंतु अमृत भारतमधून जाताना ‘सुपरफास्‍ट चार्जेज’ची सुट दिली आहे.

दरवर्षी येणार 400 अमृत भारत एक्स्प्रेस

देशात दरवर्षी 400 अमृत भारत एक्स्प्रेस येणार आहे. देशातील रेल्वे ट्रॅक सेमीहायस्पीड रेल्वेला अनुकूल केले जात आहेत. मागील 9.5 वर्षांत रेल्वेने 26 हजार किलोमीटर ट्रॅक वाढले आहेत. तसेच सरकारने 30,749 कोटी रुपये खर्च करुन रेल्वे ट्रॅकचे दुहेरीकरण केले आहे. देशातील 400 रेल्वे स्टेशन पूर्ण बदलले आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, अमृत भारत एक्स्प्रेसचे भाडे कमी आहे. सुविधा मात्र वंदे भारत ट्रेनसारख्या आहेत. या रेल्वेत बाहेरचा गोंधळ आणि हवेचाही त्रास होत नाही.

Follow Us
कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून पेट्रोल विक्रीबाबत मोठा निर्णय
कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून पेट्रोल विक्रीबाबत मोठा निर्णय.
भोंदू बाबा अशोक खरातला पहिला सर्वात मोठा दणका... अखेर...
भोंदू बाबा अशोक खरातला पहिला सर्वात मोठा दणका... अखेर....
चाकणकर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरून जाणार की राहणार?
चाकणकर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरून जाणार की राहणार?.
भोंदूबाबा खरात याच्या वडिलांच्या दशक्रिया पत्रिकेत रुपाली चाकणकरचे नाव
भोंदूबाबा खरात याच्या वडिलांच्या दशक्रिया पत्रिकेत रुपाली चाकणकरचे नाव.
राज्यसभेच्या सीटवरून प्रियंका चतुर्वेदी नाराज?, संजय राऊत काय म्हणाले?
राज्यसभेच्या सीटवरून प्रियंका चतुर्वेदी नाराज?, संजय राऊत काय म्हणाले?.
खरातच्या पेन ड्राईव्हमध्ये 3 मंत्री, म्हणून अशोक खरातचा एन्काऊंटर?
खरातच्या पेन ड्राईव्हमध्ये 3 मंत्री, म्हणून अशोक खरातचा एन्काऊंटर?.
दादांच्या घातपाताचा कट? मुडदाही खोदून काढू; मुख्यमंत्र्यांनी घेतला....
दादांच्या घातपाताचा कट? मुडदाही खोदून काढू; मुख्यमंत्र्यांनी घेतला.....
अजित पवार अपघात प्रकरण, कॅप्टनची बदली का झाली?, फडणवीसांनी सांगितलं...
अजित पवार अपघात प्रकरण, कॅप्टनची बदली का झाली?, फडणवीसांनी सांगितलं....
मुख्यमंत्री फडणवीस यांचे अशोक खरातबाबत कठोर वक्तव्य
मुख्यमंत्री फडणवीस यांचे अशोक खरातबाबत कठोर वक्तव्य.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र.