AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चंद्राबाबू नायडूंकडून पंतप्रधान मोदींचं भरभरुन कौतुक, या खास कारणामुळे त्यांच्या मनात मोदींच विशिष्ट स्थान

"आधी लिकेज आणि मध्यस्थांमुळे कल्याणकारी योजनांचा लाभ थेट गरीबांपर्यंत पोहोचत नव्हता. पण टेक्नोलॉजीच्या मदतीने मध्यस्थांना हटवून 51 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिकची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यात हस्तांतरीत केली. हे एक क्रांतीकारी परिवर्तन आहे" असं चंद्राबाबू नायडू यांनी लिहिलय.

चंद्राबाबू नायडूंकडून पंतप्रधान मोदींचं भरभरुन कौतुक, या खास कारणामुळे त्यांच्या मनात मोदींच विशिष्ट स्थान
Chandrababu naidu praise pm Narendra modiImage Credit source: PTI
| Updated on: Jun 09, 2026 | 1:06 PM
Share

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या इतिहासात नवीन कीर्तिमान स्थापित केला आहे. भारताची सर्वाधिक काळ सेवा करणाऱ्या पंतप्रधानांमध्ये त्यांचा समावेश झाला आहे. देश प्रथम हा त्यांचा सिद्धांत आहे. मागच्या 12 वर्षाच्या शासन काळात भारतीय जनतेने त्यावर विश्वास दाखवला आहे. प्राचीन सभ्यता आणि संस्कृतीला आधुनिक प्रशासनासोबत जोडत त्यांनी जागतिक मंचावर भारताचा आत्मविश्वास पुनर्स्थापित केला आहे. मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. पायाभूत सुविधांचा विकास आणि सहकारी संघवादाच्या माध्यमातून 2047 पर्यंत एक विकसित राष्ट्र बनण्याचं लक्ष्य ठेऊन नव्या स्वर्णिम युगाच्या दिशेने वाटचाल सुरु आहे.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलगु देसम पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष एन चंद्राबाबू नायडू यांचा एक विशेष लेख नुकताच एक वर्तमानपत्रात प्रकाशित झाला. त्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांचा दीर्घ कार्यकाळाचा रेकॉर्ड मागे टाकल्याचा उल्लेख केला. मोदी यांचं नेतृत्व आणि त्यांच्या दूरदृष्टीचं हे यश असून भारतीय जनतेचा अतूट विश्वास हा त्याचा पुरावा आहे असं चंद्राबाबू नायडू यांनी लेखात म्हटलं आहे.

योग्य नेत्याच्या रुपात नरेंद्र मोदी मिळाले

देश प्रथम या सिद्धांतावर आधारित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शासन शैलीचं चंद्रबाबू नायडू यांनी कौतुक केलं. “मी अनेकदा म्हणतो की, भारताला योग्यवेळी, योग्य नेत्याच्या रुपात नरेंद्र मोदी मिळाले आहेत. मागच्या 12 वर्षात हा विश्वास अधिक मजबूत झाला आह. इतिहास केवळ आर्थिक विकास आणि राजकीय स्थिरतेसाठी नाही, तर भारताचा आत्मविश्वास पुनर्जीवित करण्याचा कालखंड म्हणून लक्षात ठेवेल” असं चंद्रबाबू नायडू म्हणाले.

चंद्रबाबू यांच्या मनात मोदींबद्दल विशिष्ट स्थान का?

चंद्राबाबू नायडू यांनी त्यांच्या पाच दशकाच्या सार्वजनिक जीवनात अनेक पंतप्रधानांना जवळून बघितलं, यात नरेंद्र मोदी यांचं विशिष्ट स्थान असल्याचं नायडू म्हणाले. याच कारण म्हणजे त्यांनी प्राचीन भारतीय सभ्यतेला आधुनिक प्रशासनिक व्यवस्थेशी यशस्वीरित्या जोडलं. स्वातंत्र्यानंतर अनेक दशकं भारताच्या मनात आपल्या ओळखी बद्दल संकोच होता. पण मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपली सांस्कृती गौरव भावना आणि राष्ट्रीय आत्मविश्वास परत मिळवला आहे असं नायडू यांनी लेखात लिहिलय.

रणनितीक परिवर्तनाचं उदहारण

“प्राणायाम आणि ध्यान या भारताच्या प्राचीन ज्ञान परंपरांना आधुनिक टेक्नोलॉजी आणि डिजिटल प्रशासनाशी जोडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 व्या दशकाला नवी दिशा प्रदान केली आहे. मागच्या एका दशकात भारत 11 व्या क्रमांकावरुन चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला हे रणनितीक परिवर्तनाचं उदहारण आहे” असं चंद्रबाबू नायडू यांनी म्हटलय.

Follow Us
इथेच घोडं अडलं! इकडे महाजन म्हणतात आज गुडन्युज मिळणार, तिकडे गिते काही
इथेच घोडं अडलं! इकडे महाजन म्हणतात आज गुडन्युज मिळणार, तिकडे गिते काही ऐकेना, महायुतीत मोठी खलबत
नाशिकच्या राजकारणात खलबतं! गितेंच्या पाठिंब्यासाठी दराडेंची गुप्त भेट
Narendra Darade | नाशिकच्या राजकारणात मोठी खलबतं! गोकुळ गितेंच्या पाठिंब्यासाठी दराडेंची गुप्त भेट
मोठी बातमी! दुचाकीवरून आले अन् थेट गोळ्या... एकनाथ शिंदेंच्या नेत्यावर
मोठी बातमी! दुचाकीवरून आले अन् थेट गोळ्या... एकनाथ शिंदेंच्या पदाधिकाऱ्यावर जीवेघणा हल्ला, धक्कादायक व्हिडीओ समोर
विखे पाटलांच्या बंगल्याबाहेर मराठा आंदोलकांचा थेट ठिय्या!
Maratha Reservation | सरकारच्या आश्वासनांचा भंग? विखे पाटलांच्या बंगल्याबाहेर मराठा आंदोलकांचा थेट ठिय्या!
मुख्यमंत्र्यांच्या सुचनेवरून मी... राष्ट्रवादीकडील राज्यसभेच्या जागेवर
मुख्यमंत्र्यांच्या सुचनेवरून मी... राष्ट्रवादीकडील राज्यसभेच्या जागेवरून नवनीत राणांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाल्या?
सरकार OBC जनगणनेला घाबरतंय? वडेट्टीवारांचा हल्लाबोल; जेल भरो.....
Vijay Wadettiwar | सरकार OBC जनगणनेला घाबरतंय? वडेट्टीवारांचा हल्लाबोल; जेल भरो आंदोलनाचा थेट इशारा!
60 दिवसांचा तेलसाठा....म्हणत हरदीप सिंह पुरी यांचा मोठा खुलासा!
Hardeep Singh Puri | हार्मूज संकटावर भारताची तयारी; 60 दिवसांचा तेलसाठा....म्हणत हरदीप सिंह पुरी यांचा मोठा खुलासा!
पंतप्रधानांनी आता केदारनाथच्या गुहेत... संजय राऊत हे काय बोलून गेले?
पंतप्रधानांनी आता केदारनाथच्या गुहेत... संजय राऊत हे काय बोलून गेले? पंडित नेहरूंचाही उल्लेख
पण देशाचे 12 वाजलेत! विजय वडेट्टीवारांचा केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबो
....पण देशाचे 12 वाजलेत! विजय वडेट्टीवारांचा केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल
कोट्यवधी कुटुंबांना झटका! 9 नाही आता किती सिलेंडर मिळणार?
Pradhan Mantri Ujjwala Yojana | कोट्यवधी कुटुंबांना झटका! सरकारच्या निर्णयामुळे उज्ज्वला लाभार्थ्यांमध्ये नाराजी; 9 नाही आता किती सिलेंडर मिळणार?