AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सत्तासंघर्षावरील निकाल कधी येणार?; अनिल देसाई यांची सर्वात मोठी माहिती

समता पार्टीला कोण खतपाणी घालतं? आम्हाला मशाल चिन्ह दिलं. आम्ही मशाल चिन्हावर पोटनिवडणूक लढवली आणि जिंकली. पण लोकशाहीत कोणी आडकाठी करणार असेल, त्यांच्यामागे कोणती शक्ती असेल...

सत्तासंघर्षावरील निकाल कधी येणार?; अनिल देसाई यांची सर्वात मोठी माहिती
anil desaiImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Feb 23, 2023 | 10:56 AM
Share

नवी दिल्ली : राज्यातील सत्तासंघर्षावर आज पुन्हा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल आज युक्तिवादास सुरुवात करतील. त्यानंतर ठाकरे गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी आणि देवदत्त कामत युक्तिवाद करणार आहेत. पुढच्या आठवड्यात शिंदे गटाचे वकील आपली बाजू मांडणार आहे. त्यामुळे या खटल्याचा निकाल फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत येण्याची शक्यता कमी आहे. ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी तर या प्रकरणाचा निकाल मार्चच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता वर्तवली आहे.

आज सकाळी कपिल सिब्बल युक्तिवाद सुरू करतील. पण नंतर अभिषेक मनु सिंघवी आणि देवदत्त कामत सुरू करतील. पुढच्या आठवड्यात शिंदे गटाचा युक्तिवाद होईल. त्यानंतर कोर्ट ठरवेल तशी आखणी होईल. पुढच्या आठवड्यात त्यांच्या वकिलांनी युक्तिवाद लवकर संपवला तर त्यानंतर निर्णय होईल. एवढ्या लवकर निर्णय होणार नाही असं वाटतं. मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत निकाल लागेल असं वाटतं, असं अनिल देसाई यांनी सांगितलं.

विधानसभेच्या उपाध्यक्षांना अपात्र ठरवण्यात आलं. त्यांचे अधिकार अबाधित ठेवले असते तर त्यांनी हा निर्णय दिला असता. उपाध्यक्षांनी शिंदे गटाला म्हणणं मांडण्यासाठी वेळ दिला होता. पण त्यांना ते करता आलं नाही. त्यांना डिसेबल केलं गेलं, असं देसाई म्हणाले.

कायदेशीर पेच निर्माण झालाय

निवडणूक आयोगाने चिन्ह आणि पक्षाच्या नावाबाबत निकाल दिला आहे. त्यामुळे कायदेशीर पेच निर्माण झाला आहे. लोकशाही जिवंत राहिली पाहिजे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय त्यावर कसा मार्ग काढेल हे पाहावं लागेल, असंही त्यांनी सांगितलं.

समता पार्टीला कोण खतपाणी घालतं?

समता पार्टीला कोण खतपाणी घालतं? आम्हाला मशाल चिन्ह दिलं. आम्ही मशाल चिन्हावर पोटनिवडणूक लढवली आणि जिंकली. पण लोकशाहीत कोणी आडकाठी करणार असेल, त्यांच्यामागे कोणती शक्ती असेल, ही शक्ती खतपाणी घातलं जात असेल तर ते कितपत योग्य आहे? समता पार्टी डी रजिस्टर झाली. त्यांचं चिन्ह फ्रि कधी झालं? यावर निवडणूक आयोगाकडे दस्ताऐवज आहेत. असं असतानाही कृत्रिमरित्या समता पार्टीला चिन्ह मिळण्यासाठी धडपड सुरू झाली आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालय ते खपवून घेणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

सुनावणी महत्त्वाची

लोकशाहीसाठी सत्तासंघर्षाची सुनावणी महत्त्वाची आहे. राज्यातील सत्तासंघर्ष हा घटनात्मक पेच आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालय कसा मार्ग काढतं आणि काय निकाल देतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Follow Us
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम.
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा.
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका.
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार.
अर्थसंकल्पात खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा; 12 खेळांसाठी....
अर्थसंकल्पात खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा; 12 खेळांसाठी.....
अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाबाबत मोठी घोषणा, फडणवीस नेमकं काय म्हणाले
अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाबाबत मोठी घोषणा, फडणवीस नेमकं काय म्हणाले.
नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काय मिळणार?
नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काय मिळणार?.
वडाळा ते गेट-वे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो होणार! मुख्यमंत्र्यांची घोषणा
वडाळा ते गेट-वे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो होणार! मुख्यमंत्र्यांची घोषणा.
प्रतीक्षा संपली! अखेर शेतकरी कर्जमाफीची घोषणा; काय म्हणाले फडणवीस?
प्रतीक्षा संपली! अखेर शेतकरी कर्जमाफीची घोषणा; काय म्हणाले फडणवीस?.
राज्याच्या बजेटमध्ये 10 महत्वाच्या घोषणा कोणत्या? पाहा व्हिडीओ
राज्याच्या बजेटमध्ये 10 महत्वाच्या घोषणा कोणत्या? पाहा व्हिडीओ.