AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशातल्या महागाईला, बोरोजगारीला अकबर, शहाजहान, औरंगजेब जबाबदार आहेत का, ओवेसींचा सवाल, काश्मिरात 370 हटविले तरी टीव्ही स्टारची हत्या कशी?

सध्या देशात सगळीकडे मशिदी खोदण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. ताजमहाल, लाल किल्ला इथेही खोदकाम करण्याची मागणी होते आहे. तिथे भाजपा, संघवाले काय शोधत आहेत. भाजपा, संघ परिवार द्वेष पसरवून भारतीय मुसलमानांविरोधात युद्ध करत आहेत. मुस्लिमांच्या प्रत्येक निशाण हे मिटवू इच्छितात, अशी टीका त्यांनी केली

देशातल्या महागाईला, बोरोजगारीला अकबर, शहाजहान, औरंगजेब जबाबदार आहेत का, ओवेसींचा सवाल, काश्मिरात 370 हटविले तरी टीव्ही स्टारची हत्या कशी?
owaisi on ModiImage Credit source: TV 9 marathi
| Edited By: | Updated on: May 28, 2022 | 10:49 PM
Share

भिवंडी – देशातल्या महागाईला, (inflation)बेरोजगारीला अकबर, शहाजहान आणि औरंगजेब (Aurangjeb)जबाबदार आहेत का, असा प्रश्न असुदुद्दीन ओवेसी (AIMIM Asaduddin Owaisi )यांनी उपस्थित केला आहे. नरेंद्र मोदी सरकारची सत्तेत आठ वर्षे पूर्ण झाली आहेत, त्याचा आनंद साजरा करण्यात येत आहे. मात्र तरीही देशात होत असलेल्या हत्या, दंगलींना जबाबदार कोण, असा प्रश्न ओवेसी यांनी केला आहे. जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवण्यात आले, मात्र तरीही तिथल्या हत्या थांबलेल्या नाहीत. काश्मिरात नुकतीच एका टीव्ही स्टारची हत्या कशी झाली, काश्मिरी पंडितांची हत्या का होतायेत, असा सवालही त्यांनी विचारला आहे. काश्मिरात दहशतवाद वाढतोय, याला जबाबदार कोण आहे, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. देशात महागाई सर्वात जास्त असताना मोदी सरकारची आठ वर्ष पूर्ण होत आहेत. देशात बेरोजगारी खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, त्याकडे या सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचे त्यांनी सांगितले. देशातील महिलांचे काम करण्याचे प्रमाण १० टक्क्यांनी कमी झाले आहे. परदेशी गुंतवणूक, गुंतवणूकदार कमी होत आहेत, याला कोण जबाबदार आहे, असा प्रश्न त्यांनी विचारला.

हा देश आदिवासी आणि द्रविडींचा आहे

भारतावर मुसलमानांनी आक्रमण केले, पण ते मुघलांपासून सुरु झाले का, असा सवालही ओवेसी यांनी केला आहे. गेल्या ६५ हजार वर्षांपासून या देशात बाहेरुन लोक येत आहेत. ६५ हजार वर्षांपूर्वी इथे अफ्रिकन आले, तयानंतर ४५ हजार वर्षांपूर्वी इराणमधून शेतकरी इथे आले. मध्य आणि पूर्व आशियातूनही ४ हजार वर्षांपूर्वी आर्य आले, असे ओवेसी म्हणाले. हा भारत देश आपला, मोदी, शहा, ठाकरे यांचा नाही तर तो आदिवासी आणि द्रविडियनचा आहे, असा युक्तिवादही ओवेसींनी केला आहे. भारतातील मुसलमानांचा संबंध मुघलांशी नव्हता, ते बादशाहा होते त्यांचा संबंध जनतेशी नव्हता असे त्यांनी सांगितले.

सगळीकडे मशिदी खोदण्याचे काम सुरु

ज्ञानवापीवर जेव्हा प्रश्न उपस्थित केले तेव्हा आपले पूर्वज ब्राह्मण होते, अशी टीका संघ परिवारातून करण्यात आली होती. जर तुम्ही ७००, ८०० वर्षांपूर्वींची बाब काढत असाल तर मी ६५ हजार वर्षांपूर्वीच्या गोष्टी काढीन, असे त्यांनी सांगितले. आमच्या पूर्वजांनी इथेच जन्म घेतला त्यामुळे हा आमचाच देश आहे. त्यामुळे आम्ही इथलेच आहोत, असेही त्यांनी सांगितले. सध्या देशात सगळीकडे मशिदी खोदण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. ताजमहाल, लाल किल्ला इथेही खोदकाम करण्याची मागणी होते आहे. तिथे भाजपा, संघवाले काय शोधत आहेत. भाजपा, संघ परिवार द्वेष पसरवून भारतीय मुसलमानांविरोधात युद्ध करत आहेत. मुस्लिमांच्या प्रत्येक निशाण हे मिटवू इच्छितात, अशी टीका त्यांनी केली. त्यात मशीद, मिनारे, आनाज, बुरखा, दाढी यांचा समावेश आहे. आणि यावर काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, सपा, आप सगळ्यांचे मौन आहे. हे स्वताला धर्मनिरपेक्ष म्हणवतात, पण ते यावर बोलत नाहीत, कारण त्यांना हिंदू मते दूर जातील ही भीती आहे. असेच सुरु राहिले तर देशातील मुस्लीम आणि दलित तरुण त्यांच्या घरातच बसतील. या द्वेषाच्या अंधारातून बाहेर पडायचे असेल तर एमआयएम हाच पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले.

Follow Us
अजित पवार अपघात प्रकरण, कॅप्टनची बदली का झाली?, फडणवीसांनी सांगितलं...
अजित पवार अपघात प्रकरण, कॅप्टनची बदली का झाली?, फडणवीसांनी सांगितलं....
मुख्यमंत्री फडणवीस यांचे अशोक खरातबाबत कठोर वक्तव्य
मुख्यमंत्री फडणवीस यांचे अशोक खरातबाबत कठोर वक्तव्य.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र.
चंद्रकांत पाटील यांचे अशोक खरातसोबत जवळचे संबंध?
चंद्रकांत पाटील यांचे अशोक खरातसोबत जवळचे संबंध?.
अशोक खरातबाबत आणखी एक मोठा खुलासा, ईशान्येश्वर मंदिरासाठी दीड कोटीचा..
अशोक खरातबाबत आणखी एक मोठा खुलासा, ईशान्येश्वर मंदिरासाठी दीड कोटीचा...
महाराष्ट्रात पेट्रोल टंचाई, भंडाऱ्यात लांबच लांब रांगा
महाराष्ट्रात पेट्रोल टंचाई, भंडाऱ्यात लांबच लांब रांगा.
रुपाली चाकणकर यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी
रुपाली चाकणकर यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी.
अशोक खरात प्रकरणावर माजी मंत्री केसरकरांची प्रतिक्रिया
अशोक खरात प्रकरणावर माजी मंत्री केसरकरांची प्रतिक्रिया.
खरात प्रकरणी रुपाली चाकणकर आणि दीपक केसरकर यांची पोलिसांकडून चौकशी?
खरात प्रकरणी रुपाली चाकणकर आणि दीपक केसरकर यांची पोलिसांकडून चौकशी?.
अजितदादांची ताकद... रोहित पवार यांच्या संशयाने खळबळ
अजितदादांची ताकद... रोहित पवार यांच्या संशयाने खळबळ.