आसाममध्ये पुराचा हाहा: कार, 62 जणांचा मृत्यू, 32 जिल्ह्यात पाणीच पाणी…

सध्या पावसाचा जोर वाढतोय. अश्यात आता आसाममध्ये पूर आलाय. तसंच भूस्खलनाच्याही घटना घडत आहेत. यात आतापर्यंत 62 जणांचा मृत्यू झाला आहे.

आसाममध्ये पुराचा हाहा: कार, 62 जणांचा मृत्यू, 32 जिल्ह्यात पाणीच पाणी...
Follow us
| Updated on: Jun 19, 2022 | 4:58 PM

आसाम : सध्या पावसाचा जोर वाढतोय. अश्यात आता आसाममध्ये पूर (Assam Flood) आलाय. तसंच भूस्खलनाच्याही घटना घडत आहेत. यात आतापर्यंत 62 जणांचा मृत्यू झाला आहे. मागच्या 24 तासात आठ जणांचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. बारपेटा आणि करीमगंज जिल्ह्यात प्रत्येकी दोन, दारंग, हैलाकांडी, नलबारी आणि सोनितपूर जिल्ह्यात प्रत्येकी एक जण अद्याप बेपत्ता आहेत. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (ASDMA) च्या मते, आतापर्यंत 62 लोकांपैकी 51 जणांचा पुरामुळे मृत्यू झाला आहे. तर 11 जण भूस्खलनामध्ये मृत्यूमुखी पडले आहेत.

कुठे-कुठे पुरस्थिती?

बजाली, बक्सा, बारपेटा, बिस्वनाथ, बोंगाईगाव, कचार, दारंग, धेमाजी, धुबरी, दिब्रुगढ, दिमा हासाओ, गोलपारा, होजाई, कामरूप, कामरूप, कार्बी आंगलाँग पश्चिम, करीमगंज, कोकराज, 32 जिल्ह्यांतील सुमारे 31 लाख लोक पुरामुळे अस्वस्थ आहेत. तसंच लखीमपूर, माजुली, मोरीगाव, नागाव, नलबारी, शिवसागर, सोनितपूर, शिवसागर, दक्षिण सलमारा, तामुलपूर, तिनसुकिया, उदलगुरी या भागात महापुराचा फटका बसला आहे.

बारपेटा जिल्ह्यात 7.31 लाखांहून अधिक लोक बाधित आहेत. दारंग जिल्ह्यात 3.54 लाख, बजालीमध्ये 3.52 लाख, नागावमध्ये 2.41 लाख, गोलपारामध्ये 2.21 लाख, कामरूपमध्ये 2.18 लाख, नलबारीमध्ये 1.65 लाख, लाखीमपूरमध्ये 1.14 लाख लोक बाधित झाले आहेत. , होजईमध्ये 1.25 लाख आणि बोंगईगावमध्ये 1.13 लाख लोकांच्या जगण्यावर या पुराचा परिणाम झाला आहे.

जनावरांचे हाल

या पुरामध्ये 25.54 लाखांहून अधिक जनावरांच्या जीविताचा प्रश्न निर्माण झाला आहे. मागच्या 24 तासात भारतीय लष्कर, NDRF, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा आणि जिल्हा प्रशासनाच्या माध्यामातून बचाव कार्य सुरू आहे. या बचाव कार्यातून 9,102 जणांची सुटका करण्यात आली आहे.

शिवाय आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि शेजारील देश भूतानमध्ये मुसळधार पाऊस होतोय. त्यामुळे सर्व प्रमुख नद्यांच्या पाण्याची पातळी वाढत आहे. अनेक नद्या अनेक ठिकाणी धोक्याच्या पातळीच्या वर वाहत आहेत. बेकी, मानस, पगलाडिया, पुथिमारी, कोपिली, जिया-भरली आणि ब्रह्मपुत्रा नदीच्या पाण्याची पातळी धोक्याच्या पातळीच्या वर वाहत आहे.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.