AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आपण टाळ्या-थाळ्या वाजवल्या, दिवे लावले; यामुळे देशाचा आत्मविश्वास वाढला : नरेंद्र मोदी

आपण सर्वांनी टाळ्या, थाळ्या वाजवल्या, दिवे लावले या सर्व गोष्टींमुळे देशाचा अत्मविश्वास वाढला असे नरेंद्र मोदी म्हणाले. (Thali tali campaign Narendra Modi)

आपण टाळ्या-थाळ्या वाजवल्या, दिवे लावले; यामुळे देशाचा आत्मविश्वास वाढला : नरेंद्र मोदी
टाळ्या वाजवणे, थाळ्या वाजवणे तसेच दिवे लावल्यामुेळे जनतेचा आत्मविश्वास वाढला, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
| Updated on: Jan 16, 2021 | 11:40 AM
Share

नवी दिल्ली : “जनता कर्फ्युने देशातील नागरिकांची सहनशीलता आणि शिस्तीची परीक्षा घेतली. या परिक्षेत सर्व देशवासी यशस्वी झाले. आपण सर्वांनी टाळ्या, थाळ्या वाजवल्या, दिवे लावले (Thali and tali campaign). या सर्व गोष्टींमुळे देशाचा अत्मविश्वास वाढला,” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले. कोरोनाला थोपवण्यासाठी आजपासून राष्ट्रीय पातळीवर लसीकरणाची मोहीम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन पद्धतीने केले. यावेळी त्यांनी जनेतशी संवाद साधताना वरील वक्तव्य केलं. (because of Thali and tali campaign indians courage has increased said Narendra Modi)

मागील काही दिवसांपासून कोरोना विषाणूचा संसर्ग थांबवण्यासाठी प्रतिबंधात्मक लस निर्मिती करण्यावर काम सुरु होतं. कित्येक संस्था, शास्त्रज्ञ लसनिर्मिती करण्यासाठी प्रयत्न करत होते. संशोधकांचे हे प्रयत्न यशस्वी झाले असून आता संपूर्ण देशात प्रत्यक्ष लसीकरणास सुरुवात झाली आहे. या लसीकरणाच्या कार्यक्रमाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उद्धाटन केले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी जनता कर्फ्युचा उल्लेख करत टाळ्या, थाळ्या आणि दिवे लावल्यामुळे देशाचा आत्मविश्वास वाढल्याचं म्हटलंय. या सर्व गोष्टींमुळे कोरोना विरोधात लढण्यासाठी देशाला मानसिक दृष्टीकोनातून तयारी करण्यास मदत झाली. तसेच, टाळ्या, थाळ्या वाजवणे आणि दिवे लावल्यामुळे देशाचा आत्मविश्वास वाढला असं मोदी म्हणाले.

अफवांना बळी पडू नका 

तसेच, पुढे बोलताना त्यांनी जनतेला कुठल्याही अफवांनी बळी न पडण्याचं आवाहन केलं. ठभारत लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यातच 3 कोटी लोकांना लस देणार आहे. दुसऱ्या टप्प्यात आपलल्याला ही मोहीम 30 कोटी लोकांपर्यंत घेऊन जायची आहे. दुसऱ्या टप्प्यात वृद्ध नागरिकांना आणि गरज असलेल्या लोकांनाच लस दिली जाईल. भारताची लसीकरण मोहीम खूप मोही आहे. त्यामुळे ही मोहीम म्हणजे भारताच्या सामर्थ्याचं दर्शन म्हणावी लागेल. भारतीय बनावटीच्या लसीबाबत खात्री पटल्यानंतरच आपत्कालीन लसीला मंजुरी दिली आहे. त्यामुळे कुठल्याही अफवांना बळी पडू नका,” असे मोदी म्हणाले. तसेच, जगभरातील 60 टक्के बालकांना ज्या लस दिल्या जातात; त्याची निर्मिती ही भारतातच होते. त्यामुळे भारतीय बनावटीच्या कोरोना प्रतिबंधक लस विश्वासार्ह असल्याचंही त्यांनी सांगितलं.

संंबंधित बातम्या :

PM Narendra Modi : भारताची लसीकरण मोहीम म्हणजे प्राणाची आहुती दिलेल्या कोरोना योद्ध्यांना श्रद्धांजली- पंतप्रधान मोदी

Corona Vaccination : जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम, पहिल्या टप्प्यात कोणत्या राज्यांना किती लस?

(because of Thali and tali campaign indians courage has increased said Narendra Modi)

Follow Us
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
Eknath Shinde | चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीचा आदेश!
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा
Raj Thackeray | राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा; मोदींच्या मौनावर गंभीर सवाल
आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधान
Rohit Pawar | 'आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधानाने खळबळ
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात
मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात; विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी
मुंबईत भीषण दुर्घटना! शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; सचिन अहिरांच्या प्रवेशानंतर शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही?
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
सोबत असलो तर चांगले, नाहीतर नालायक?; सचिन अहिरांचा ठाकरेंवर पलटवार
Sachin Ahir | सोबत असलो तर चांगले, नाहीतर नालायक?; शिंदे गटात जाताच सचिन अहिरांचा ठाकरेंवर पलटवार
पत्रकार परिषदेच्या पहिल्या वाक्यातच शिंदे म्हणाले 'असं काही' अन् पिकला
Eknath Shinde | पत्रकार परिषदेच्या पहिल्या वाक्यातच शिंदे म्हणाले 'असं काही' अन् पिकला हशा... सचिन अहिरदेखील... पहा व्हिडीओ
जे कधीच नव्हते आमचे, त्यांची वाट का पहावी?; राऊतांची पहिली प्रतिक्रिया
Sanjay Raut Post | जे कधीच नव्हते आमचे, त्यांची वाट का पहावी?; सचिन अहिरांच्या निर्णयानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया