AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Wife Murder: शरीर संबंध ठेवण्यास नकार दिला म्हणून पत्नीची हत्या; बायको बेपत्ता असल्याची दिली तक्रार; कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह

बेंगळुरूमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या पत्नीने शरीर संबंध ठेवण्यास नकार दिला म्हणून तिची हत्या करून पत्नीचा मृतदेह शिर्डी घाटात फेकून दिल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता, मात्र पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्याने पत्नील का मारल्याचे सांगत गुन्हा कबूल केला आहे.

Wife Murder: शरीर संबंध ठेवण्यास नकार दिला म्हणून पत्नीची हत्या; बायको बेपत्ता असल्याची दिली तक्रार; कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह
दारु पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून नातवाने आजोबांना संपवलेImage Credit source: tv9
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Aug 19, 2022 | 10:30 AM
Share

बेंगळुरूः बिहारमधील इलेक्ट्रिशियन, जो बेंगळुरूमध्ये (Bengaluru) राहत होता, त्याच्या पत्नीने त्याच्यासोबत लैंगिक संबंध (physical relation) ठेवण्यास नकार दिला म्हणून त्याने पत्नीची हत्या करून तिचा मृतदेह शिराडी घाटात फेकून दिला होता. त्यानंतर पोलिसांपासून वाचण्यासाठी त्याने नंतर एक गोष्ट रचली आणि आपली पत्नी बेपत्ता (Wife missing) झाल्याची तक्रार पोलिसात दाखल केली. बेंगळुरूमध्ये घडलेल्या या धक्कादायक गुन्ह्यातील संशयित आरोपीचे नाव आहे पृथ्वीराज सिंग (Prithviraj Singh) असून त्याने नऊ महिन्यांपूर्वीच ज्योती कुमारीसोबत लग्न केले होते. लग्नानंतर मात्र आपल्या पत्नीने तिच्या वयाबद्दल आपल्याला खोटे सांगितल्याचा राग त्याच्या मनात होता. त्या दोघांमध्ये नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वाद होत होते, त्यामुळे पत्नीने त्याच्याबरोबर शरीरसंबंध ठेवण्यासही देत नेहमी नकार देत होती.

लग्नाच्या वेळी तिने नवऱ्याकडच्या कुटुंबीयांना सांगितले होते की ती 28 वर्षांची आहे, मात्र नंतर तिचे खरे वय हे 38 असल्याचे समजल्यानंत आणि दहा वर्षाचा फरक असल्याचे समजल्यानंतर मात्र त्यांच्यामध्ये नेहमीच वाद होत होते.

शरीरसंबंध ठेवण्यास कायम नकार

या दोघांच्या लग्नानंतर तिने त्याच्यासोबत कधीही शरीरसंबंध ठेवण्यास सहमती दर्शवली नव्हती. लग्नातही मानापमानाच्या गोष्टीमुळे आणि पत्नीच्या या वयाच्या गोष्टीमुळे त्यांच्यामध्ये नेहमीच वाद होत होते. लग्नानंतर आपल्या आईवडिलांचा अपमान करत असल्याचेही सिंगने पोलिसांना सांगितले.

…आणि पत्नीचा काटा काढला

कौटुंबीक वाद वाढत गेल्यानेच संतापलेल्या सिंगने ज्योतीला संपवण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर त्याने बिहारमधील आपला मित्र समीर कुमारला पत्नीचा काटा काढण्यासाठी बोलवून घेतले. त्यानंतर 3 ऑगस्ट रोजी दोघे उडापीला गेले, तेथे त्यांनी ज्योतीची गळा आवळून तिची हत्या केली आणि नंतर तिचा मृतदेह शिर्डी घाटात फेकून दिला. पत्नीचा खून करुन घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याने पोलिसांत पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.

नवऱ्याने सांगितले पत्नी बेपत्ता

याप्रकरणात सिंगने पोलिसांना सांगताना एक गोष्ट रचली होती, त्याने पोलिसांना सांगितले की, ज्योती अनेक वेळा घरातून न सांगताच निघून जायची आणि नंतर स्वतःच ती परत यायची. मात्र यावेळी तिचा मोबाईल बंद असल्याने तो तिचा शोध घेऊ शकला नाही असं त्याने पोलिसांना स्पष्टपणे सांगितले.

कारनामा उघडा पडला

मात्र, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास चालू केल्यानंतर मात्र सिंगच्या कारनामा उघडा पडला. आणि सिंगवर पोलिसांचा संशय बळावला, त्यामुळे कसून चौकशी केल्यानंतर पोलिसांनी पत्नीच्या हत्याप्रकरणी अटक केली. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर पत्नीची हत्या करून कुठे टाकलेले हे सांगितल्यानंतर पोलिसांनी कुजलेल्या अवस्थेत असलेला मृतदेह दरीतून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

Follow Us
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद.
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह...
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की.....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की......
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,.
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू.
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश...
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश....
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर...
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर....
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री...
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री....