AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ड्रेस कोड, रोज 5 तासाचा ब्रेक, उत्सवाचा खास प्लान… राहुल गांधी यांची पदयात्रा अशी

भारत जोडो पदयात्रेला 150 दिवस लागणार असून राहुल गांधी या पदयात्रेच्या निमित्ताने सर्वसामान्य नागरिकांबरोबर संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहेत. पदयात्रा आल्यानंतर त्या मार्गातील अनेक नागरिक थेट राहुल गांधींना येऊन भेटत आहेत. त्यांच्याबरोबर संवाद साधत आहेत.

ड्रेस कोड, रोज 5 तासाचा ब्रेक, उत्सवाचा खास प्लान... राहुल गांधी यांची पदयात्रा अशी
| Updated on: Sep 10, 2022 | 5:19 PM
Share

कन्याकुमारीः काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेने (Bharat Jodo Yatra) साऱ्या देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. राहुल गांधी यांचा ड्रेस कोड, रोज पाच तासाचा ब्रेक आणि उत्सवाचा खास प्लान अशा पद्धतीने राहुल गांधी यांची पदयात्रा आता सुरु झाली आहे. राहुल गांधी यांच्या बरोबर काँग्रेसचे अनेक नेते, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने अनेक नागरिक या पदयात्रेत सामील झाले आहेत. कन्याकुमारीपासून (Kanyakumari) सुरू झालेली ही पदयात्रा काश्मिरला जाऊन थांबणार आहे. त्यामुळे हा दीर्घ प्रवासाला पाच महिन्याचा कालावधी लागणार असल्याचे सांगितले जात आहे, त्यामुळे या पदयात्रेसाठीही खास व्यवस्था करण्यात आली आहे.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी 7 सप्टेंबरपासून तामीळनाडूतील कन्याकुमारीपासून भारत जोडो यात्रेला सुरुवात केली आहे. काँग्रेसची ही पदयात्रा 12 राज्य आणि दोन केंद्र शासित प्रदेशातून जात काश्मीरमध्ये थांबणार आहे.

पदयात्रेला 150 दिवस लागणार

या पदयात्रेला 150 दिवस लागणार असून राहुल गांधी या पदयात्रेच्या निमित्ताने सर्वसामान्य नागरिकांबरोबर संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहेत. पदयात्रा आल्यानंतर त्या मार्गातील अनेक नागरिक थेट राहुल गांधींना येऊन भेटत आहेत. त्यांच्याबरोबर संवाद साधत आहेत.

जनमत जाणून घेणार

भारतात होणाऱ्या 2024 मधील लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून लोकमत जाणून घेण्यासाठी, जनमत आपल्या पारड्यात टाकण्यासाठी भारत जोडो यात्रेचे आयोजन करत असल्याचे सांगितले जात आहे.

3 हजारपेक्षा लांब पल्याचा प्रवास

कन्याकुमारीपासून सुरु झालेली काँग्रेसची भारत जोडो यात्रेत 3 हजार 500 किलो मीटरचा प्रवास केला जाणार आहे. या यात्रेच्या निमित्ताने राहुल गांधी काँग्रेस आणि स्वतः आपल्याला सर्वसामान्य नागरिकांसोबत जोडून घेण्यासाठी काँग्रेसची भारतातील सर्वसामान्य नागरिकांच्या मनात एक प्रतिमा उंचवण्यासाठी युवक, शेतकरी, महिला आणि सर्वसामान्य माणसांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी ही यात्रा करत आहेत. पाच महिने चालणाऱ्या या पदयात्रेत सहभागी नेत्यांना सर्व सुविधाही देण्यात येत आहेत.

पाच तासाचा ब्रेक

काँग्रेसच्या या भारत जोडो यात्रेत सहभागी होणाऱ्यासाठी ड्रेस कोडचाही विचार केला गेला आहे. त्याबरोबरच राहणे, जेवणाची व्यवस्थाही केली गेली आहे. पदयात्रा करणाऱ्यांसाठी पाच तासाचा ब्रेक, सणसमारंभासाठी सुट्टी, कपड्यांपासून ते अगदी बेडसीट धुण्यापर्यंतची व्यवस्था केली गेली आहे.

पदयात्रेसाठी 60 कंटेनरचा  ताफा

या पदयात्रेसाठी 60 कंटेनरचा एक ताफाच या भारत जोडो यात्रेबरोबर आहे. या पदयात्रेत सहभागी होणाऱ्या नेत्यांना हॉटेलची व्यवस्था मिळाली नाही मात्र त्यांना कोणत्याही सुविधांपासून लांबही ठेवण्यात आले नाही.

चीन सीमावादाच्या मुद्द्यावर लोकसभेत गदारोळ
चीन सीमावादाच्या मुद्द्यावर लोकसभेत गदारोळ.
चीन समोर असताना 56 इंच छातीला काय झाले होते? राहुल गांधींचा प्रश्न
चीन समोर असताना 56 इंच छातीला काय झाले होते? राहुल गांधींचा प्रश्न.
पार्थ पवारांना मोठा दिलासा! मुंढवा जमीन प्रकरणात अपडेट समोर
पार्थ पवारांना मोठा दिलासा! मुंढवा जमीन प्रकरणात अपडेट समोर.
जळगावमध्ये शेतकरी आक्रमक; L 53 महामार्गावर 3 तासांपासून रास्ता रोको
जळगावमध्ये शेतकरी आक्रमक; L 53 महामार्गावर 3 तासांपासून रास्ता रोको.
शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचा तो दावा खोडला; काय म्हणाले?
शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचा तो दावा खोडला; काय म्हणाले?.
मुंबई पालिकेत भाजपला समर्थन देण्याचं वृत्त; ठाकरेंनी दिलं स्पष्टीकरण
मुंबई पालिकेत भाजपला समर्थन देण्याचं वृत्त; ठाकरेंनी दिलं स्पष्टीकरण.
राज ठाकरे यांच्या सोबतच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांचा नाराजीचा सूर!
राज ठाकरे यांच्या सोबतच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांचा नाराजीचा सूर!.
विदिप जाधव कुटुंबियांना सुनेत्रा पवार यांची सांत्वनपर भेट
विदिप जाधव कुटुंबियांना सुनेत्रा पवार यांची सांत्वनपर भेट.
मद्यधुंद चालकाने 14-15 जणांना उडवलं, प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
मद्यधुंद चालकाने 14-15 जणांना उडवलं, प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार.
जल जीवन मिशन महाराष्ट्राचा निधी थांबला? संजय राऊतांचा राज्यसभेत सवाल
जल जीवन मिशन महाराष्ट्राचा निधी थांबला? संजय राऊतांचा राज्यसभेत सवाल.