AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ड्रेस कोड, रोज 5 तासाचा ब्रेक, उत्सवाचा खास प्लान… राहुल गांधी यांची पदयात्रा अशी

भारत जोडो पदयात्रेला 150 दिवस लागणार असून राहुल गांधी या पदयात्रेच्या निमित्ताने सर्वसामान्य नागरिकांबरोबर संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहेत. पदयात्रा आल्यानंतर त्या मार्गातील अनेक नागरिक थेट राहुल गांधींना येऊन भेटत आहेत. त्यांच्याबरोबर संवाद साधत आहेत.

ड्रेस कोड, रोज 5 तासाचा ब्रेक, उत्सवाचा खास प्लान... राहुल गांधी यांची पदयात्रा अशी
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Sep 10, 2022 | 5:19 PM
Share

कन्याकुमारीः काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेने (Bharat Jodo Yatra) साऱ्या देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. राहुल गांधी यांचा ड्रेस कोड, रोज पाच तासाचा ब्रेक आणि उत्सवाचा खास प्लान अशा पद्धतीने राहुल गांधी यांची पदयात्रा आता सुरु झाली आहे. राहुल गांधी यांच्या बरोबर काँग्रेसचे अनेक नेते, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने अनेक नागरिक या पदयात्रेत सामील झाले आहेत. कन्याकुमारीपासून (Kanyakumari) सुरू झालेली ही पदयात्रा काश्मिरला जाऊन थांबणार आहे. त्यामुळे हा दीर्घ प्रवासाला पाच महिन्याचा कालावधी लागणार असल्याचे सांगितले जात आहे, त्यामुळे या पदयात्रेसाठीही खास व्यवस्था करण्यात आली आहे.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी 7 सप्टेंबरपासून तामीळनाडूतील कन्याकुमारीपासून भारत जोडो यात्रेला सुरुवात केली आहे. काँग्रेसची ही पदयात्रा 12 राज्य आणि दोन केंद्र शासित प्रदेशातून जात काश्मीरमध्ये थांबणार आहे.

पदयात्रेला 150 दिवस लागणार

या पदयात्रेला 150 दिवस लागणार असून राहुल गांधी या पदयात्रेच्या निमित्ताने सर्वसामान्य नागरिकांबरोबर संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहेत. पदयात्रा आल्यानंतर त्या मार्गातील अनेक नागरिक थेट राहुल गांधींना येऊन भेटत आहेत. त्यांच्याबरोबर संवाद साधत आहेत.

जनमत जाणून घेणार

भारतात होणाऱ्या 2024 मधील लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून लोकमत जाणून घेण्यासाठी, जनमत आपल्या पारड्यात टाकण्यासाठी भारत जोडो यात्रेचे आयोजन करत असल्याचे सांगितले जात आहे.

3 हजारपेक्षा लांब पल्याचा प्रवास

कन्याकुमारीपासून सुरु झालेली काँग्रेसची भारत जोडो यात्रेत 3 हजार 500 किलो मीटरचा प्रवास केला जाणार आहे. या यात्रेच्या निमित्ताने राहुल गांधी काँग्रेस आणि स्वतः आपल्याला सर्वसामान्य नागरिकांसोबत जोडून घेण्यासाठी काँग्रेसची भारतातील सर्वसामान्य नागरिकांच्या मनात एक प्रतिमा उंचवण्यासाठी युवक, शेतकरी, महिला आणि सर्वसामान्य माणसांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी ही यात्रा करत आहेत. पाच महिने चालणाऱ्या या पदयात्रेत सहभागी नेत्यांना सर्व सुविधाही देण्यात येत आहेत.

पाच तासाचा ब्रेक

काँग्रेसच्या या भारत जोडो यात्रेत सहभागी होणाऱ्यासाठी ड्रेस कोडचाही विचार केला गेला आहे. त्याबरोबरच राहणे, जेवणाची व्यवस्थाही केली गेली आहे. पदयात्रा करणाऱ्यांसाठी पाच तासाचा ब्रेक, सणसमारंभासाठी सुट्टी, कपड्यांपासून ते अगदी बेडसीट धुण्यापर्यंतची व्यवस्था केली गेली आहे.

पदयात्रेसाठी 60 कंटेनरचा  ताफा

या पदयात्रेसाठी 60 कंटेनरचा एक ताफाच या भारत जोडो यात्रेबरोबर आहे. या पदयात्रेत सहभागी होणाऱ्या नेत्यांना हॉटेलची व्यवस्था मिळाली नाही मात्र त्यांना कोणत्याही सुविधांपासून लांबही ठेवण्यात आले नाही.

Follow Us
सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच
Sindhudurg | सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच, शेतकरी चिंतेत!
विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....
Vilas Ghule Case | विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....हत्येचं मूळ कारण आलं समोर
फुटीर खासदारांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची एंट्री!
Uddhav Thackeray | फुटीर खासदारांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची एंट्री! आज शिर्डीत मोठं शक्तिप्रदर्शन
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं