AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

950 कोटींचा चारा घोटाळा, 28 वर्षांनंतर रिकव्हरी, लालू यादव असो की अन्य कोणी, संपत्ती जप्त…

Lalu Prasad Yadav chara ghotala scam: चारा घोटाळ्याशी संबंधित लोकांची मालमत्ता जप्त केली जाईल. घोटाळ्याची 950 कोटींची रक्कम जप्त करून सरकारी तिजोरीत जमा करण्यात येणार आहे. सरकारचा पैसा सरकारकडे परत आणावा लागेल.

950 कोटींचा चारा घोटाळा, 28 वर्षांनंतर रिकव्हरी, लालू यादव असो की अन्य कोणी, संपत्ती जप्त...
Lalu Prasad Yadav Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Mar 28, 2025 | 3:38 PM
Share

Lalu Prasad Yadav chara ghotala scam: बिहारमध्ये आता विधानसभेच्या निवडणुका होणार आहे. या निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी चारा घोटाळ्यातील रक्कम 950 कोटी रुपयांची वसुली करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ही रक्कम वसूल करुन सरकारच्या तिजोरीत भरण्यात येणार आहे. या प्रकरणात बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आरजेडी पक्षाचे नेते लालूप्रसाद यादव यांनी शिक्षा झाली आहे.

काय म्हणाले उपमुख्यमंत्री

बिहारचे उपमुख्यमंत्री अन् अर्थमंत्री सम्राट चौधरी म्हणाले की, चारा घोटाळ्याशी संबंधित लोकांची मालमत्ता जप्त केली जाईल. घोटाळ्याची 950 कोटींची रक्कम जप्त करून सरकारी तिजोरीत जमा करण्यात येणार आहे. सरकारचा पैसा सरकारकडे परत आणावा लागेल. न्यायालयाचा हा निर्णय असून त्याआधारे कारवाई केली जाणार असल्याचे सम्राट चौधरी यांनी सांगितले..

उपमुख्यमंत्री चौधरी म्हणाले, लालू यादव असोत की अन्य कोणीही, ज्यांनी घोटाळा केला आहे, त्यांची मालमत्ता जप्त करून त्यांच्यावर कारवाई केली जाईल. हा न्यायालयाचा निर्णय आहे, सरकारचा निर्णय नाही. त्यावर कारवाई करायचीच असेल तर सरकार त्यावर कारवाई करेल, असे न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले होते, आता त्याला 28 वर्षे झाली आहेत. सर्वोच्च न्यायालयानेही या प्रकरणात शिक्षा दिली आहे. न्यायालयाने मालमत्ता जप्त केली आहे. आता ती संपत्ती सरकारी तिजोरीत टाकले जाईल.

चारा घोटाळा हा स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे. जेव्हा बिहार आणि झारखंड एकच राज्य होते तेव्हाचे हे प्रकरण आहे. हा प्रकार पशुसंवर्धन विभागाशी संबंधित होते. या घोटाळ्यात पशुखाद्य आणि पशुसंवर्धनाशी संबंधित खोट्या दाव्यांद्वारे सरकारी तिजोरीतून मोठ्या रकमेचा अपहार करण्यात आला. 940-950 कोटी रुपयांचा हा घोटाळा असल्याचे सांगितले जाते. हा घोटाळा प्रामुख्याने 1990 च्या दशकात झाला होता. यावेळी लालू प्रसाद यादव बिहारचे मुख्यमंत्री होते. हे प्रकरण 1996 मध्ये उघड झाले होते. या प्रकरणाचा तपास सीबीआयने केला होता. या प्रकरणात 66 खटले दाखल करण्यात आले होते. त्यात 170 आरोपी होते.

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.