AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवदीप लांडेंच्या मनाचा मोठेपणा, वॉचमनच्या हस्ते पोलीस इमारतीचं उद्घाटन, वॉचमनचे डोळे पाणावले, सर्वच स्तरातून कौतुक

Shivdeep Lande : जेव्हा शिवदीप यांनी उद्घाटन करायला सांगितलं तेव्हा या वॉचमनच्या डोळ्यात पाणी आलं. शिवदीप लांडे यांच्या या निर्णयाचं सर्वत्र सर्वत्र कौतुक होतंय.

शिवदीप लांडेंच्या मनाचा मोठेपणा, वॉचमनच्या हस्ते पोलीस इमारतीचं उद्घाटन, वॉचमनचे डोळे पाणावले, सर्वच स्तरातून कौतुक
| Edited By: आयेशा सय्यद | Updated on: Jun 15, 2022 | 4:03 PM
Share

मुंबई : आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे (IPS Shivdeep Lande) हे त्यांच्या वर्दीतल्या साधेपणासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांचे अनेक किस्से आपण वाचले, ऐकले आहेत. आताही असाच एक प्रसंग समोर आला आहे. नुकतंच डीआयजी शिवदीप लांडे यांच्या हस्ते सहरसा इथल्या पोलीस स्टेशनच्या इमारतीचं उद्घाटन (Inauguration) केलं.पण या प्रसंगी शिवदीप यांनी जे केलं त्याची सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शिवदीप यांच्या हस्ते पोलीस स्टेशनच्या इमारतीचं उद्घाटन ठेवण्यात आलं होतं. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या वॉचमनच्या हस्ते पोलीस स्टेशनचं उद्घाटन करण्याचा निर्णय शिवदीप लांडे यांनी घेतला. महिला कॉन्स्टेबल बबिता कुमारी आणि वॉचमन कबीर आलम यांच्या हस्ते हे उद्घाटन झालं. शिवदीप यांनी जेव्हा या दोघांना उद्घाटन करण्यास सांगितलं तेव्हा या दोघांसह उपस्थितांना आश्चर्याचा धक्का बसला.

शिवदीप लांडे यांच्या मनाचा मोठेपणा

डीआयजी शिवदीप लांडे यांच्या हस्ते सहरसा इथल्या पोलीस स्टेशनच्या इमारतीचं उद्घाटन केलं.पण या प्रसंगी शिवदीप यांनी जे केलं त्याची सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शिवदीप यांच्या हस्ते पोलीस स्टेशनच्या इमारतीचं उद्घाटन ठेवण्यात आलं होतं. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या वॉचमनच्या हस्ते पोलीस स्टेशनचं उद्घाटन करण्याचा निर्णय शिवदीप लांडे यांनी घेतला. महिला कॉन्स्टेबल बबिता कुमारी आणि वॉचमन कबीर आलम यांच्या हस्ते हे उद्घाटन झालं. शिवदीप यांनी जेव्हा या दोघांना उद्घाटन करण्यास सांगितलं. त्यांच्या मनाचा मोठेपणा पाहून या दोघांसह उपस्थितांना आश्चर्याचा धक्का बसला.

कौतुकाचा वर्षाव

जेव्हा शिवदीप यांनी उद्घाटन करायला सांगितलं तेव्हा या वॉचमनच्या डोळ्यात पाणी आलं. शिवदीप लांडे यांच्या या निर्णयाचं सर्वत्र सर्वत्र कौतुक होतंय. त्यांच्या कृतीने समाजात एक चांगला संदेश जात असल्याचं म्हटलं जात आहे.

शिवदीप लांडे कोण आहेत?

बिहार केडरमधून शिवदीप लांडे डिसेंबर 2016 मध्ये महाराष्ट्र पोलीस दलात दाखल झाल्यानंतर त्यांच्याकडे मुंबई गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोथी पथकाची जबाबदारी देण्यात आली होती. साडे तीन वर्षाच्या कालावधीत त्यांनी अनेक ड्रग्ज माफियांचे कंबरडे मोडले. अमंली पदार्थ विरोधी पथकातील कामगिरीच्या जोरावर शिवदीप लांडे यांना एटीएसची जबाबदारी देण्यात आली होती. एटीएसमध्येही शिवदीप लांडे यांनी चांगली कामगिरी केली होती. युरेनियमचा साठा पकडणे, असो की मनसुख हिरेन ह्त्या प्रकरणाचा छडा लावण्याचं काम शिवदीप लांडे यांच्या टीमनं केलं होतं. मनसूख हिरेन प्रकरणही शिवदीप लांडे यांनीच उघड केलं आहे.

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.