AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनानंतर आता बर्ड फ्लूचं मोठं संकट; केरळमध्ये 40,000 पक्ष्यांना मारण्याची वेळ

बर्ड फ्लूची साथ ही अत्यंत वेगाने पसरते. H5N8 व्हायरसमुळे पक्ष्यांच्या श्वसनयंत्रणेत बिघाड होऊन त्यांचा मृत्यू होता. माणसांनाही याची लागण होऊ शकते. | Bird Flu H5N8

कोरोनानंतर आता बर्ड फ्लूचं मोठं संकट; केरळमध्ये 40,000 पक्ष्यांना मारण्याची वेळ
राजस्थान, केरळ, मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेशनंतर आता महाराष्ट्रातही ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव झाला आहे. याच पार्श्वभूमीवर ‘बर्ड फ्लू’पासून बचाव करण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
| Updated on: Jan 05, 2021 | 10:50 AM
Share

मुंबई: कोरोनाच्या साथीला उतार पडत नाही तोच आता महाराष्ट्रावर आणखी एक मोठं संकट ओढावण्याची शक्यता आहे. सध्या देशातील अनेक राज्यांमध्य बर्ड फ्लू ची (Bird Flu H5N8)  साथ पसरली आहे. या साथीत आतापर्यंत हजारो पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Kerala On High Alert As Bird Flu Scare Escalates 40 Thousand Birds To be Culled)

स्थलांतरित पक्षी, कावळे आणि कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण

राजस्थानात आतापर्यंत 245 कावळ्यांचा मृत्यू झाला आहे. तर हिमाचल प्रदेशात आलेले 1700 स्थलांतरित पक्षी या साथीमुळे मृत्यूमुखी पडले. परिणामी हिमाचल प्रदेशात चिकन आणि अंडी सेवनावर बंदी घालण्यात आली आहे. मध्य प्रदेशातही कोंबडी आणि कावळ्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राजस्थान, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश, झारखंडमधील यंत्रणा कमालीच्या सतर्क झाल्या आहेत. H5N8 व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी 40 हजार पक्ष्यांना मारण्याचे आदेश

केरळच्या कोट्टायम आणि अलप्पुझा जिल्ह्यातील काही भागांत बर्ड फ्लू (H5N8) वेगाने पसरत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे बर्ड फ्लूचा सर्वाधिक प्रभाव असलेल्या परिसरापासून एक किलोमीटर क्षेत्रातील बदक, कोंबड्या आणि पाळीव पक्ष्यांना मारण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. H5N8 व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी नाईलाजाने हे पाऊल उचलावे लागत असल्याची माहित अधिकाऱ्यांनी दिली.

कोट्टायम जिल्ह्यातील नीदूर येथे बदक पालन केंद्रातील 1500 पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. बर्ड फ्लूची साथ ही अत्यंत वेगाने पसरते. H5N8 व्हायरसमुळे पक्ष्यांच्या श्वसनयंत्रणेत बिघाड होऊन त्यांचा मृत्यू होता. माणसांनाही याची लागण होऊ शकते.

पोंग बांध अभयारण्यात 1800 स्थलांतरित पक्ष्यांचा मृत्यू

हिमाचल प्रदेशातील पोंग बांध जलाशयाच्या परिसरात असणाऱ्या अभयारण्यात 1800 स्थलांतरित पक्ष्यांचा मृत्यू झाला. या सर्व पक्ष्यांची तपासणी करण्यात आली असून त्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता हिमाचल प्रदेशात चिकन आणि अंड्याच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.

केरळमध्येही यंदा तब्बल 50 हजार स्थलांतरित पक्षी दाखल झाले आहेत. यापैकी काही पक्ष्यांचा मृत्यू झाला असून त्यांची तातडीने विल्हेवाट लावण्यात आली. राज्यातील इतर पाणथळ प्रदेशांत पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची माहिती अजूनतरी समोर आलेली नाही. मात्र, केरळमध्ये वन्यजीव आणि पशुपालन विभागाच्या अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 2016 मध्ये केरळमध्ये बर्ड फ्लूची मोठी साथ आली होती.

संबंधित बातम्या:

मध्य प्रदेशात 300 कावळ्यांचा मृत्यू, बर्ड फ्लूचं संकट, अलर्ट जारी

(Kerala On High Alert As Bird Flu Scare Escalates 40 Thousand Birds To be Culled)

Follow Us
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.