AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रानंतर आणखी एका राज्यात येणार भाजप युतीचं सरकार, कोणतं आहे ते राज्य?

BJP-JDU government : महाराष्ट्रात महाविकासआघाडीतून शिवसेना बाहेर पडल्यानंतर राज्यात महायुतीचं सरकार आलं आहे. एकनाथ शिंदे यांच्यानंतर अजित पवार देखील महायुतीत सरभागी झाले आहेत. आता आणखी एका राज्यात अशीच परिस्थिती आहे. येथे देखील भाजप युतीचं सरकार येण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रानंतर आणखी एका राज्यात येणार भाजप युतीचं सरकार, कोणतं आहे ते राज्य?
shailesh musale
shailesh musale | Updated on: Jan 26, 2024 | 5:07 PM
Share

JDU-BJP : बिहारमधील राजकीय हालचालींवर आरजेडी लक्ष ठेवून आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार पुन्हा एकदा एनडीएमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आणखी एका राज्यात भाजप युतीचं सरकार येण्याची शक्यता आहे. आरजेडीचे खासदार मनोज झा म्हणाले की, मी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना राजकीय गोंधळ संपवण्याची विनंती करतो. राजदने असे कधीच केले नाही. सायंकाळपर्यंत संभ्रम दूर होईल, अशी आशा आहे. नितीशकुमार एनडीएमध्ये गेल्यास इंडिया आघाडीला मोठा धक्का बसू शकतो. कारण आधीच दोन पक्षांनी स्वबळावर निवडणुका लढवणार असल्याचं स्पष्ट केले आहे.

नितीन कुमार यांनी भाजपसोबत आधी सत्ता स्थापन केली होती. पण नंतर त्यांनी आरजेडी सोबत हात मिळवणी करत सत्ता स्थापन केली. आता पुन्हा एकदा ते भाजपसोबत सत्तेत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि भाजपचे ज्येष्ठ नेते विजय कुमार सिन्हा यांनी शुक्रवारी सांगितले की, आमचे केंद्रीय नेतृत्व राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवून आहे. नेतृत्व गांभीर्याने विचार करूनच कोणताही निर्णय घेईल.

चिराग पासवान काय म्हणाले

लोजपचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान म्हणाले की, सध्याच्या परिस्थितीतही बिहारमध्ये एनडीए इतका मजबूत आहे की आम्ही 40 पैकी 40 जागा जिंकू शकतो. मला माहित नाही की नितीश कुमार एनडीएचा भाग बनतील की इंडिया आघाडीत राहतील. परिस्थिती पूर्णपणे स्पष्ट झाल्यावरच आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू.

Follow Us
‘स्कूल ठीक करो’ मोहिमे अंतर्गत CJP पदाधिकारी आणि दादा भुसे यांची भेट
मंत्री दादा भुसे आणि कॉकरोच जनता पार्टीची भेट
OBC आश्रमशाळांना इशारा; मूलभूत सुविधा न दिल्यास मान्यता रद्द
राज्यातील जिल्हा परिषद शाळा आणि आश्रमशाळांच्या दयनीय स्थितीवर मंत्र्यांची कठोर भूमिका
आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय, वयोमर्यादेचा नियम शिथिल
आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय, वयोमर्यादेचा नियम शिथिल
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट