BJP: भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत निवडणुका, आर्टिकल 370 सह ‘या’ मुद्द्यांवर चर्चा

| Updated on: Nov 07, 2021 | 6:36 PM

राजकीय ठरावात (Political Resolution) 18 विषयांवर चर्चा करण्यात आली. राजकीय ठरावाच्या चर्चेदरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नमूद केलं की, 2004 ते 2014 या काळात जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाशी संबंधित घटनांमध्ये 2081 जणांचा मृत्यू झाला, तर 2014 ते सप्टेंबर 2021 पर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये 239 जणांचा मृत्यू झाला आहे.

BJP: भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत निवडणुका, आर्टिकल 370 सह या मुद्द्यांवर चर्चा
BJP National Excecutive Comittee meeting
Follow us on

नवी दिल्लीः आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनीही हजेरी लावली. या बैठकीत आगामी सात राज्यांच्या निवडणुकांच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली. 2022 मध्ये उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, मणिपूर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि गुजरात या सात राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. (BJP Excecutive committee meeting topics discussed includes Jammu Kashmir Article 70 elections 2022 win)

यासह भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत, राजकीय ठरावात (Political Resolution) 18 विषयांवर चर्चा करण्यात आली. राजकीय ठरावाच्या चर्चेदरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नमूद केलं की, 2004 ते 2014 या काळात जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाशी संबंधित घटनांमध्ये 2081 जणांचा मृत्यू झाला, तर 2014 ते सप्टेंबर 2021 पर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये 239 जणांचा मृत्यू झाला आहे. जम्मू-काश्मीर आता विकासकाडे वाटचाल करत आहे, त्या म्हणाल्या.

 बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली?

– कोरोना लसीकरण कार्यक्रमाबाबत जगात भारताच्या भूमिकेवर आणि चर्चा झाली.
– कोरोनाच्या काळात आरोग्य सुविधांबाबत केंद्र सरकारच्या कामाची चर्चा.
– 80 कोटी लोकांना मोफत अन्न, कोरोनामुळे मृतांची मुले दत्तक घेण्याच्या मुद्द्यावरही चर्चा झाली.
– COP26 मध्ये पंतप्रधानांनी हवामान बदलाबाबत भारताच्या वचनबद्धतेवर कौतुक करण्यात आले.
– जनऔषधी योजनेवर, राष्ट्रीय पाम ऑइल मिशनवर चर्चा झाली.
– भारतीय तरुणां नोकरी शोधणाऱ्यांऐवजी नोकऱ्या निर्माण करणारे म्हणून तयार करण्यासाठी केंद्राची मदत यावर चर्चा झाली.
– जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर विकासाला गती देण्याच्या मुद्द्यावर चर्चा झाली.
– डिजिटल कार्यक्रम, स्वच्छ भारत, आयुष्मान भारत योजना यांसारखे कार्यक्रम जमिनीवर आणण्याची चर्चा होती.
– महिलांच्या नेतृत्वाखालील विकास आणि प्रगतीसाठी कार्यक्रमांवर चर्चा.
– सामाजिक न्याय कार्यक्रमाची चर्चा.
– संरक्षण क्षेत्रातील बदलांवर चर्चा.
– एमएसपी 5 पट वाढविण्यावर चर्चा, कृषी पायाभूत सुविधा निर्माण करण्यात एफपीओच्या भूमिकेवर चर्चा.
– सेवा संस्थेवर चर्चा, ज्यामध्ये 1 दशलक्ष स्वयंसेवकांनी भाग घेतला.
– येत्या निवडणुकीत विजयाच्या ध्येयावर चर्चा.
– गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या कामगिरीवर चर्चा.
– पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या हिंसाचारावर.

Other News

किरीट सोमय्या यांच्याविरोधात काँग्रेस गुन्हा दाखल करणार, नाना पटोले यांची माहिती

Air Pollution: दिल्ली ‘डार्क रेड झोन’ मध्ये; “दिल्लीत कोरोनापेक्षा वायू प्रदूषणामुळे जास्त मृत्यू झाले”- डॉ अरविंद कुमार

पंतप्रधानांच्या प्रयत्नामुळे भारत मजबूत स्थितीमध्ये; जागतिक आरोग्य संघटनेनेही घेतली दखल, नड्डांनी केले मोदींचे कौतुक