AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राहुल गांधी माफी मागता-मागता थकतील, पण त्यांच्या गुन्ह्यांची गणती संपणार नाही- मुख्तार अब्बास नक्वी

राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या चुकीची एकप्रकारे कबुलीच दिल्यानंतर आता त्यावरुन जोरदार राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे.

राहुल गांधी माफी मागता-मागता थकतील, पण त्यांच्या गुन्ह्यांची गणती संपणार नाही- मुख्तार अब्बास नक्वी
| Updated on: Mar 03, 2021 | 2:46 PM
Share

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा आणीबाणीचा निर्णय ही चूकच होती, असं काँग्रेसचे सध्याचे सर्वोच्च नेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. त्यावरुन आता भाजपमधून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ते माफी मागता मागता थकतील पण त्यांच्या चुकांची गणती संपणार नाही, असा टोला भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी लगावला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या चुकीची एकप्रकारे कबुलीच दिल्यानंतर आता त्यावरुन जोरदार राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे.(Mukhtar Abbas Naqvi criticizes Rahul Gandhi’s statement on Emergency)

“आणीबाणीत ज्या लोकांचे प्राण गेले, ज्या प्रकारे त्यांनी लोकशाहीची हत्या केली. ते माफीच्या लायक आहे का? चुकांच्या प्रत्येक वळणावर त्यांच्या गुन्ह्यांचा ढिग दिसेल”, असा घणाघात नक्वी यांनी केलाय. मंगळवारी अमेरिकेतील कॉर्नेल विश्वविद्यापीठातील पाध्यापक आणि भारताचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार कौशिक बसू यांनी राहुल गांधी यांच्याशी संवाद साधला होता. त्यावेळी राहुल गांधी यांनी आणीबाणीच्या मुद्द्यावर पहिल्यांदाच मोठं भाष्य केलं आहे.

नेमकं काय म्हणाले राहुल गांधी?

कॉर्नेल विद्यापीठात एका कार्यक्रमात राहुल गांधी सहभागी झाले होते. त्यावेळी बोलताना राहुल यांनी आणीबाणीबाबत मोठं वक्तव्य केलंय. प्राध्यापक कौशिक बसू यांनी राहुल गांधी यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना ‘आणीबाणी घोषित करणं ही इंदिरा गांधी यांची चूक होती. मात्र, काँग्रेसनं पक्ष म्हणून त्याचा कधीही फायदा करुन घेतला नाही. तेव्हा जे झालं आणि आज जे होत आहे, त्यात मोठा फरक आहे’, असं राहुल गांधी म्हणाले.

भाजपवर शरसंधान

‘संसदेत आम्हाला बोलण्यास परवानगी नाही, न्यायव्यवस्थेकडून आशा नाही, RSS आणि भाजपकडे मोठी आर्थिक ताकद आहे. व्यावसायिकांना विरोधी पक्षांसोबत उभं राहण्यास परवानगी नाही. लोकशाहीवर हा विचारपूर्वक केलेला हल्ला आहे. मणिपूरमध्ये राज्यपाल भाजपची मदत करत आहेत. पुद्दुचेरीत उपराज्यपालांनी अनेक बिल पास होऊ दिले नाहीत. कारण, त्या RSSशी जोडल्या गेलेल्या होत्या. काँग्रेसनं कधीच संस्थानांचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला नाही. सध्याचं सरकार लोकशाही व्यवस्थेला नुकसान पोहचवत आहे’, अशा शब्दात राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधलाय.

संबंधित बातम्या :

Rahul Gandhi : ‘होय, आणीबाणी चुकच होती!’, काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वाकडून पहिल्यांदाच जगजाहीर कबुली

गुजरातमध्ये काँग्रेसला अक्षरश: गाडलं, आप, एमआयएमची टक्कर, वाचा अंतिम निकाल सविस्तर

Mukhtar Abbas Naqvi criticizes Rahul Gandhi’s statement on Emergency

अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण.
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान.
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!.
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक...
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक....
अजितदादांचा मृतदेह...रोहित पवारांचा खळबळजनक दावा, दिल्लीत मोठं विधान!
अजितदादांचा मृतदेह...रोहित पवारांचा खळबळजनक दावा, दिल्लीत मोठं विधान!.
बाळासाहेबांना अपेक्षित प्रशासन चालवू, भाजपचा महापौर होताच....
बाळासाहेबांना अपेक्षित प्रशासन चालवू, भाजपचा महापौर होताच.....
तो पूर्व विदर्भातील नेता कोण? नाव जाहीर करा... संजय राऊत यांचं आवाहन
तो पूर्व विदर्भातील नेता कोण? नाव जाहीर करा... संजय राऊत यांचं आवाहन.
मुंबई महापालिकेत महापौर राज सुरू; रितू तावडे महापौर तर...
मुंबई महापालिकेत महापौर राज सुरू; रितू तावडे महापौर तर....
रितू तावडे यांनी सांगितला मास्टर प्लान, मुंबईतून या लोकांना...
रितू तावडे यांनी सांगितला मास्टर प्लान, मुंबईतून या लोकांना....
तो फोन, विदर्भातील नेता आणि... रोहित पवारांनी मांडल्या तीन मोठ्या शंका
तो फोन, विदर्भातील नेता आणि... रोहित पवारांनी मांडल्या तीन मोठ्या शंका.