AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! नदीत बोट उलटली, 10 जणांचा मृत्यू, 5 अजूनही बेपत्ता

मोठी बातमी समोर येत आहे, 30 भाविक असलेली बोट नदीत पलटी झाल्यामुळे मोठा अपघात घडला आहे. या अपघातामध्ये 10 जणांचा मृत्यू झाला असून, अजूनही 5 जण बेपत्ता आहेत.

मोठी बातमी! नदीत बोट उलटली, 10 जणांचा मृत्यू, 5 अजूनही बेपत्ता
Uttar Pradesh Boat AccidentImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 10, 2026 | 7:03 PM
Share

उत्तर प्रदेशमधील मथुरा येथे शुक्रवारी मोठी दुर्घटना घडली आहे. 30 भाविक असलेली बोट यमुना नदीत उलटली. या दुर्घटनेत दहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर अजूनही 5 जण बेपत्ता आहे. तर 15 भाविकांचा जीव वाचवण्यात यश आलं आहे. हे सर्व भाविक लुधियानामधून मथुरेला आले होते, अशी माहिती समोर येत आहे. दरम्यान बोट पलटी झाल्यानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला, आरडा -ओरड सुरू झाली. भाविकांचा आवाज ऐकून स्थानिकांनी नदीकडे धाव घेतली, पोलीस दल देखील तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं. मात्र तरी देखील या अपघातामध्ये 10 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांचे मृतदेह हाती लागले आहेत. तर अजूनही 5 जण बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. 15 जणांचा जीव वाचवण्यात यश आल्याची माहिती समोर येत आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी पंजाब राज्यातील लुधियाना येथील 30 भाविक मथुरा येथे आले होते. नौकाविहाराचा आनंद घेण्यासाठी 30 भाविक एका नावेमध्ये बसले, मात्र ही नाव यमुना नदीमध्ये उलटल्याची घटना घडली आहे. इतर दिवसाच्या तुलनेमध्ये आज हवेचा वेग जास्त होता. हवेचा वेग अधिक असल्यामुळे नावेचं संतुलन बिघडलं आणि ही नाव तिथे असलेल्या एका पुलाला धडकली, अपघातानंतर नाव नदीत पलटी झाली. नाव नदीत पलटी होताच बचावासाठी या नावेमध्ये जे लोक होते, त्यांनी आरडा-ओरड सुरू केली.

त्यांचा आवाज ऐकून स्थानिकांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच पोलीस देखील दाखल झाले. यातील 15 जणांचा जीव वाचवण्यात यश आलं आहे, तर 10 जणांचा मृत्यू झाला आहे. अजूनही 5 जण बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेबद्दल माहिती घेतली आहे. या अपघाताबद्दल त्यांनी दु:ख व्यक्त केलं असून, या घटनेतील जखमी लोकांना तातडीने रुग्णालयात दाखल करून उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Follow Us
NCP कोअर कमिटीच्या बैठकीनंतर जितेंद्र आव्हाड लाईव्ह; काय म्हणाले?
NCP कोअर कमिटीच्या बैठकीनंतर जितेंद्र आव्हाड लाईव्ह; नेमकं काय म्हणाले?
सोलापूरमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन: मंत्री बाबासाहेब पाटलांना अडवले
माढ्यात शेतकऱ्यांचे आंदोलन: मंत्री बाबासाहेब पाटलांसमोर २ लाखांच्या कर्जमाफीची मागणी
चिंचपोकळीच्या चिंतामणीचा फर्स्ट लुक समोर; पहा...
Chinchpoklicha Chintamani | चिंचपोकळीच्या चिंतामणीचा फर्स्ट लुक समोर; पहा व्हिडीओ
ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचे आगमन! चिंपोकळीतील चिंतामणीचं भव्य स्वागत
ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचे आगमन! चिंपोकळीतील चिंतामणीच्या भव्य स्वागताचा व्हिडीओ समोर
मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या चुकीच्या, गुणरत्न सदावर्तेंचा आरोप
मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या चुकीच्या आणि पूर्ण होऊ शकत नाहीत- गुणरत्न सदावर्ते
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अभिजीत दीपके यांचे समर्थन
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अभिजीत दीपके यांचे समर्थन
अशोक उईके: आदिवासी विद्यार्थ्यांची आंदोलने मागे, प्रमुख मागण्या मान्य
अशोक उईके: आदिवासी विद्यार्थ्यांची आंदोलने मागे, प्रमुख मागण्या मान्य; तीन महिन्यांनी पुन्हा चर्चा
सुभाष चंद्र यांचा रिलायन्स मीडिया नेटवर्कवर अफवा पसरवल्याचा आरोप
सुभाष चंद्र यांचा रिलायन्स मीडिया नेटवर्कवर अफवा पसरवल्याचा आरोप
22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरून वाद; सुभाष चंद्रां आणि रिलायन्स...
22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरून वाद; सुभाष चंद्रां आणि रिलायन्स मीडिया ग्रुप आमनेसामने
राहुल गांधींचा भाजपवर हल्ला, खर्गेंच्या सभास्थळ शुद्धीकरणावर संताप
Rahul Gandhi | राहुल गांधींचा भाजपवर हल्ला, खर्गेंच्या सभास्थळ शुद्धीकरणावर संताप