AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नरेंद्र मोदींच्या विजयाने पाकिस्तानी व्यावसायिक खूश, त्यांच्याच पंतप्रधानांना सुनावलं

नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आल्याने काही पाकिस्तानच्या व्यावसायिकांना देखील आनंद व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हॅट्ट्रीकने देशातच नाही तर संपूर्ण जगात चर्चा मिळवली आहे. अनेक देशांच्या प्रमुखांनी मोदींचे अभिनंदन केले आहे. पाकिस्तानने मात्र वेगळीच भूमिका घेतली आहे.

नरेंद्र मोदींच्या विजयाने पाकिस्तानी व्यावसायिक खूश, त्यांच्याच पंतप्रधानांना सुनावलं
| Updated on: Jun 08, 2024 | 7:51 PM
Share

लोकसभा निवडणुकीत एनडीएने बहुमत मिळवल्यानंतर आता तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होणार आहेत. जगभरात मोदींच्या विजयाची चर्चा आहे. जागा कमी जिंकल्या असल्या तरी मित्रपक्षाच्या मदतीने पंतप्रधान मोदी सरकार स्थापन करणार आहेत. मोदींच्या विजयाचा डंका भारतातच नाही तर विदेशात ही आहे. कारण पाकिस्तानी वंशाच्या एका अमेरिकन व्यावसायिकाने जगातील सर्वात मोठ्या लोकशाही प्रक्रियेच्या शांततापूर्ण आणि यशस्वी वर्तनाबद्दल भारतीय जनतेचे अभिनंदन केले आहे. पाकिस्तानी व्यावसायिकाने म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण दक्षिण आशिया प्रदेशातील स्थिरतेची हमी आहेत.

पाकिस्तानी-अमेरिकन उद्योगपती साजिद तरार यांनी ‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “मी नेहमीच म्हटलंय की, भविष्यात भारताच्या स्थैर्यासाठी मोदींचे नेतृत्व आवश्यक आहे. त्यांच्यामुळे इतर अनेक पक्षांना येण्यापासून आणि संविधानाला अस्थिर करण्यापासून रोखता येऊ शकते. मोदींचे नेतृत्व ही भारताची स्थिरता आणि भारताचे भविष्य याची हमी आहे.

पुढे ते म्हणाले की, मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आले आहे त्यामुळे पाकिस्तानच्या जनतेच्या मनात एक आशेचा किरण आहे की त्यांचे भारतासोबत संबंध सुधारु शकतील. एका प्रश्नाला उत्तर देताना तरार म्हणाले की, ‘मोदींच्या शपथविधी सोहळ्याला पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ उपस्थित राहतील अशी मला आशा आहे. पण त्यांच्याकडून अद्याप मोदींचं अभिनंदत करणारा संदेश आलेला नाही ही निराशाजनक बाब आहे.’

ते म्हणाले, “मोदी केवळ भारतासाठीच नाही तर पाकिस्तानसाठी देखील महत्त्वाचे आहेत. त्यांच्यावर इस्लामविरोधी आणि पाकिस्तानविरोधी असल्याचा आरोप हा राजकीय हेतूने प्रेरित आहेत. मोदींच्या येण्याने जर पाकिस्तानसोबतचे संबंध सुधारले तर दोन दक्षिण आशियाई देशांमधील व्यापार वाढेल.

“मोदी हे अनुभवी नेते आहेत. त्यांनी आता ब्रिक्स आणि जी-20 सारख्या विविध आंतरराष्ट्रीय मंचांवर काम केले आहे. भारतातील सार्वत्रिक निवडणुका यशस्वीपणे पार पडल्याबद्दल अभिनंदन करताना ते म्हणाले, “ही एक उल्लेखनीय कामगिरी आहे आणि भारतीय लोकशाहीच्या सामर्थ्य आणि लवचिकतेचा दाखला आहे.” भारताच्या लोकशाही प्रक्रियेच्या ताकदीवर शंका घेणाऱ्या लोकांना या निवडणुकीने शांत केले आहे, असे ते म्हणाले. ते म्हणाले, “भारताची लोकशाही मजबूत आहे, अमेरिकेपेक्षाही मजबूत आहे,”

Follow Us
...म्हणून नसरापूर प्रकरणातील आरोपीनं मोबाईल वापरणं बंद केलं होतं,
...म्हणून नसरापूर प्रकरणातील आरोपीनं मोबाईल वापरणं बंद केलं होतं,.
मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार
मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार.
भोंदू खरातसाठी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी
भोंदू खरातसाठी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी.
अमित शहा ठरवणार बंगालचा मुख्यमंत्री, पक्षाने दिली सर्वात मोठी जबाबदारी
अमित शहा ठरवणार बंगालचा मुख्यमंत्री, पक्षाने दिली सर्वात मोठी जबाबदारी.
8 ग्रॅम सोनं, महिलांना 2500 रुपये, थलापती निवडणुकीत विजयी कसा झाला?
8 ग्रॅम सोनं, महिलांना 2500 रुपये, थलापती निवडणुकीत विजयी कसा झाला?.
तिला कॅफेमध्ये बोलवलं अन्...एका चुकीमुळे भांडाफोड; बीडमधील आक्षेपार्ह
तिला कॅफेमध्ये बोलवलं अन्...एका चुकीमुळे भांडाफोड; बीडमधील आक्षेपार्ह.
फडणवीस सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; नसरापूर प्रकरणानंतर नो पॅरोल धोरण लागू?
फडणवीस सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; नसरापूर प्रकरणानंतर नो पॅरोल धोरण लागू?.
मोठी अपडेट! अत्याचारानंतर मुलीचा मृत्यू ऑस्फक्सियामुळे, मेंदूसह इतर...
मोठी अपडेट! अत्याचारानंतर मुलीचा मृत्यू ऑस्फक्सियामुळे, मेंदूसह इतर....
दिवाळीआधीच शिंदेंचा मोठा डाव? शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची चर्चा.....
दिवाळीआधीच शिंदेंचा मोठा डाव? शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची चर्चा......
पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? 9 मे रोजी नवीन सरकारचा शपथविधी
पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? 9 मे रोजी नवीन सरकारचा शपथविधी.