AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खऱ्या शेतकऱ्यांनी दिल्लीतून सीमांवर परत यावं, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचं आवाहन

पंजाबचे मुख्यंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग (Captian Amarinder Singh)यांनी शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमांवर परतण्याचं आवाहन केले आहे.

खऱ्या शेतकऱ्यांनी दिल्लीतून सीमांवर परत यावं, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचं आवाहन
अमरिंदर सिंग यांनी केली नव्या पक्षाची घोषणा
| Updated on: Jan 26, 2021 | 7:30 PM
Share

नवी दिल्ली : पंजाबचे मुख्यंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग (Captian Amarinder Singh)यांनी शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमांवर परतण्याचं आवाहन केले आहे. दिल्लीत आज जे घडलं ते चकित करणार दृश्य होते. ट्रॅक्टर रॅली दरम्यान समाजकंटकांनी केलेली हिंसा कधीही स्वीकारली जाणार नाही. शांततेच्या मार्गानं सुरु असलेल्या आंदोलनाला आजच्या घटनेने छेद गेला आहे. शेतकरी नेते आणि शेतकरी संघटनांनी हिंसक घटनेपासून दूर ठेवलं आहे. ट्रॅक्टर रॅली स्थगित करण्यात आली आहे. सर्व खऱ्या शेतकऱ्यांनी दिल्लीमधून परत सीमांवर यावं, असं आवाहन कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केलेय. (Captian Amarinder Singh urge all genuine farmers to vacate Delhi & return to borders )

पंजाबमध्ये हाय अ‌ॅलर्ट

दिल्लीत शेतकरी आंदोलनात झालेल्या हिसांत्मक घटनेच्या पार्श्वभूमीवर अमरिंदरसिंग यांनी पंजाबमध्ये हाय अ‌ॅलर्ट जारी केला आहे. राज्याचे DGP दिनकर गुप्ता यांना आदेश देत राज्यात हिंसात्मक घटना होऊ नयेत, याची दक्षता घेण्यास सांगण्यात आले आहे. शेतकरी आंदोलनामध्ये झालेली हिंसा काही घटकांकडून करण्यात आली असावी, असा संशय ही त्यांनी व्यक्त केला. दिल्ली पोलीस आणि शेतकरी संघटनांमध्ये सहमतीनं ठरलेल्या नियमांचं उल्लंघन त्याच शक्तींकडून झालं असावं, असं पंजाबचे मुख्यमंत्री म्हणाले. समाजकटकांच्या आंदोलनामुळे शेतकऱ्यांनी आतापर्यंत केलेल्या शांततापूर्ण आंदोलनाला ठेच पोहोचल्याचं अमरिंदरसिंग म्हणाले. ऐतिहासिक लाल किल्ल्यावर घडलेल्या घटनेबद्दल अमरिंदरसिंग यांनी निषेध व्यक्त केला आहे.

केंद्राशी चर्चा सुरु ठेवा

अमरिंदरसिंग यांनी शेतकऱ्यांना दिल्लीतून परतण्याचं आवाहन केले. दिल्लीच्या सीमांवर असलेल्या तंबूत परतावं आणि शेतकऱ्यांशी चर्चा सुरु ठेवण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. शेतकऱ्यांचं आतापर्यंत लोकशाही पद्धतीनं सुरु असलेल्या शांततेतील आंदोलनाला भारत आणि देशातील शेतकऱ्यांकडून समर्थन मिळत असल्याचं पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग म्हणाले.

राहुल गांधींचे शांततेचे आवाहन

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या आंदोलनावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कोणतीही समस्या सोडण्यासाठी हिंसा हा त्याचा पर्याय असूच शकत नाही. कुणालाही मार लागला तरी आपल्या देशाचंच नुकसान होणार आहे, असं राहुल गांधी यांनी सांगितलं. मोदी सरकारनं तात्काळ तीन कायदे मागे घ्यावेत, असं राहुल गांधी म्हणाले.

संबंधित बातम्या:

हा माणूस कृषी मंत्री होता याचं आश्चर्य, इतकं निर्लज्जपणे कसं बोलू शकतो, भाई जगताप कडाडले

Delhi Farmers Tractor Rally: हिंसा हा पर्याय नाही; शेतकरी आंदोलनावर राहुल गांधींसह कोण काय म्हणालं?

(Captian Amarinder Singh urge all genuine farmers to vacate Delhi & return to borders )

हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.