AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GPS च्या नादात कार पुढे गेली आणि पुलावरुन कोसळली, तीन जण ठार

जीपीएसचा वापर केल्याने कार थेट अर्धवट पुलावरुन नदीत कोसळून तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणाने जीपीएसवर जास्त विसंबने किती धोक्याचे आहे हे स्पष्ट झाले आहे.

GPS च्या नादात कार पुढे गेली आणि पुलावरुन कोसळली, तीन जण ठार
| Updated on: Nov 24, 2024 | 8:31 PM
Share

जीपीएस सिस्टीमच्या भरोशावर तुम्ही तुमचा रस्ता शोधत असाल तर तो तुमच्या जीवनाचा अखेरचा दिवस देखील ठरू शकतो अशी भयानक घटना घडली आहे. लग्नाच्या सोहळ्याला जात असलेल्या तिघा मित्रांचा एका विचित्र कार अपघातात मृत्यू झाला आहे.यांच्या कुटुंबियांनी हा अपघात जीपीएस यंत्रणेमुळे झाला असल्याचा दावा केला आहे. कारण हे मित्र जीपीएसचा वापर करुन कार चालवत होते.

उत्तर प्रदेशातील खालपूर – दातागंज मार्गावर सकाळी दहाच्या सुमारास हा कार अपघात घडला. या कारमधून हे तरुण बरेलीहून बदायू जिल्ह्यातील दातागंज येथे जात असताना एका बांधकाम अर्धवट असलेल्या पुलावर कार गेली आणि पुल संपल्यानंतर थेट रामगंगा नदीत कार कोसळली. या दुर्घटनेत तीन तरुणाचा मृत्यू झाला आहे. कारचा चालक नेव्हीगेशन सिस्टीमचा वापर करत होता असे पोलिसांनी सांगितले.त्याला पुल अर्धवट असल्याचे माहिती नव्हते आणि त्यांची कार ५० फूटावरुन कोसळली आहे.

नातेवाईकांचा आरोप

हा अपघात रामगंगा नदीवर फरीदपूर – बदायूँच्या दातागंजला जोडणाऱ्या अर्धवट पडलेल्या पुलावर झाली. या पुलाला अर्धवट ठेवल्याने त्याच्या कडेला बॅरिकेट्स देखील लावलेले नव्हते, त्यामुळे पुल अर्धवट पडलेला आहे हे चालकाला कळले नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या अपघातात मैनपुरी येथे राहणारे कौशल कुमार,फर्रुखाबादचे विवेक कुमार आणि अमित यांचा मृत्यू झाला आहे. ही कार दातागंजच्या दिशेने येत होती. आणि अर्धवट पुलावर चढली आणि पुल समाप्त होताच नदीत कोसळली.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...